शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

38 वर्षानंतर सापडला जवानाचा मृतदेह; सियाचीनमध्ये ऑपरेशन 'मेघदूत'दरम्यान झाले होते शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 21:15 IST

1984 मध्ये सियाचिन ग्लेशियरमध्ये पेट्रोलिंग करण्यासाठी गेलेली एक टीम हिमस्खलनानत बेपत्ता झाली होती. त्यातील एका जवानाचा मृतदेह तब्बल 38 वर्षानंतर सापडला आहे.

नवी दिल्ली: सध्या देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र स्वातंत्रदिनाची धामधुम आहे. पण, स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सियाचीनमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. ऑपरेशन मेघदूतमध्ये शहीद झालेले लान्स नाईक चंद्रशेखर हरबोला (बॅच क्रमांक 5164584) यांचा मृतदेह तब्बल 38 वर्षानंतर सापडला आहे. 13 ऑगस्ट रोजी एका जुन्या बंकरमध्ये हरबोला यांचा मृतदेह सापडला. सोमवारी किंवा मंगळवारी त्यांचे पार्थिव हल्द्वानी येथील घरी पोहोचेल.

लान्स नाईक चंद्रशेखर हे त्या टीमचा भाग होते, ज्यांना पॉइंट 5965 कॅप्चर करण्याचे काम देण्यात आले होते. त्यावर पाकिस्तानची नजर होती. ऑपरेशन मेघदूत दरम्यान अनेक सैनिकांना हिमस्खलनाचा फटका बसला होता. यापैकी अनेकांचे अवशेष यापूर्वीच सापडले होते पण, चंद्रशेखर हरबोला आणि एका जवानाचा मृतदेह सापडला नव्हता. तो आता तब्बल 38 वर्षांनंतर सापडला आहे.

13 ऑगस्ट रोजी मृतदेह सापडला ऑपरेशन मेघदूतमध्ये टीमचे नेतृत्व करणारे लेफ्टनंट पीएस पुंडिर यांच्यासह 18 भारतीय लष्कराचे जवान शहीद झाले होते. यापूर्वी 14 जवानांचे मृतदेह सापडले, तर पाच बेपत्ता आहेत. यापैकी लान्स नाईक चंद्रशेखर हरबोला यांचा मृतदेह 13 ऑगस्ट रोजी सियाचीनमध्ये 16,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर एका बंकरमध्ये सापडला आहे. त्यांच्या शरीराचा आता सांगाडा झाला आहे. अवशेषांसह सैन्य क्रमांक असलेली डिस्कदेखील सापडली, ज्यावरून मृतदेहाची ओळख पटली. ही माहिती ऐकून हरबोलांच्या कुटुंबात दुःख आणि आनंद दोन्ही आहे. 

आजही लोक सैनिकांचे शौर्य विसरलेले नाहीतऑपरेशन मेघदूतमधील जवानांचे शौर्य आणि अदम्य साहस आजही लोक विसरलेले नाहीत. जगातील सर्वात दुर्गम रणांगणावर भारतीय जवानांच्या पराक्रमाची शौर्यगाथा आजही लोकांच्या मनात जिवंत आहे. भारतीय लष्कराने 13 एप्रिल 1984 रोजी सियाचीन ग्लेशियरमध्ये ऑपरेशन मेघदूत राबवले होते.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनIndian Armyभारतीय जवानMartyrशहीद