शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

फक्त एवढ्या पैशात रेल्वेने करा परदेशवारी; भारताच्या 'या' स्थानकातून जाता येते दुसऱ्या देशात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 17:23 IST

बाहेरच्या देशात जायच म्हटलं की आपल्या समोर विमान हा पर्याय असतो. परदेशात फिरायला जाण्याची अनेकांची इच्छा असते.

Railway Stations of India runs across border: बाहेरच्या देशात जायच म्हटलं की आपल्या समोर विमान हा पर्याय असतो. परदेशात फिरायला जाण्याची अनेकांची इच्छा असते. पण, तिकिटाच्या खर्चामुळे अनेकांना ते शक्य नसते. मात्र भारतातून रेल्वेनेही काही देशात जाता येते. यासाठी खर्चही कमी येतो. भारताच्या सीमा आज अनेक देशांना मिळतात. सीमेला लागून असणाऱ्या काही देशात आजही आपल्याला रेल्वेने जाता येतं. बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, चीन, भूतान हे देश आपल्या देशाच्या सीमेजवळ आहेत. 

पश्चिम बंगालमध्ये सिंघाबाद रेल्वे स्थानक मालदा जिल्ह्यात आहे. जुन्या मालदा रेल्वेस्थानकावर सिंघाबाद रेल्वे स्थानकावरुन फक्त एक रेल्वे चालते. ही गाडी सीमाभागातील दोन्ही हद्दीत माल निर्यात करण्याचे काम आजही करते. याला देशातील शेवटचे रेल्वेस्थानकही म्हटले जात. सिंहाबाद रेल्वे स्थानक रोहनपूर स्थानकाद्वारे बांगलादेशशी जोडलेले आहे.

IAS चायवाला! डिप्रेशनमधून सावरण्यासाठी सुरू केलं चहाचं दुकान; निर्माण केली नवी ओळख

नेपाळला जाणार्‍या रेल्वेगाड्याही येथून जातात

२०११ नंतर फक्त बांगलादेशच नाही तर नेपाळकडे जाणाऱ्या गाड्या सिंगाबादमधून जातात. बांगलादेशातून नेपाळमध्ये खतांची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते. रोहनपूर-सिंहाबाद मालवाहू गाड्यांची खेप घेऊन ट्रांझिट प्वाइंटवरुन जाते. 

पेट्रापोल रेल्वेस्थानक 

हे रेल्वेस्थानक बंगालच्या उत्तरी २४ परगना जिल्ह्यातील भारत बांगलादेश सीमेजवळ आहे. हे स्थानक बांगलादेश आणि भारतामध्ये आयात-निर्यातीसाठी महत्वाची भूमिका सांभाळते. कोलकातापासून बांगलादेश जाण्यासाठी आपल्याला अगोदर बंधन एक्सप्रेस पकडावी लागेल. या रेल्वेसाठी तुमच्याकडे पासपोर्ट आणि व्हीजा असणे बंधनकारक आहे. ही रेल्वे बांगलादेश पोहचण्याअगोदर पेट्रापोल स्थानकावर थांबते.

बंधन एक्सप्रेस

बंधन एक्स्प्रेस ९ नोव्हेंबर २०१७ रोजी कोलकाता येथून सुरू होऊन बांगलादेशातील खुलना शहरात जाणार होती. बारिशाल एक्स्प्रेस मार्गावर फक्त एक्स्प्रेस धावते.

हल्दीबारी रेल्वे स्थानक

हल्दीबारी रेल्वे स्टेशन बांगलादेश सीमेपासून सुमारे ४.५ किमी अंतरावर आहे, हे स्थानक एक ट्रांझिट पॉइंट म्हणून देखील काम करते. हल्दीबारी हे चिल्हाटी स्टेशनद्वारे बांगलादेशशी जोडलेले आहे, जे भारतीय सीमेपासून ६ किमी अंतरावर आहे. हळदीपूर-चिल्हाटी रेल्वे मार्गाचे उद्घाटन डिसेंबर २०२० मध्ये होणार आहे. यानंतर २६ मार्च २०२१ रोजी रोझी मिताली एक्सप्रेस सुरू झाली. न्यू जलपाईगुडी जंक्शनवरून निघणाऱ्या गाड्या ढकियालाला पोहोचण्यापूर्वी हल्दीबारी येथे थांबतात.

जयनगर रेल्वे स्थानक

बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात स्थित, हे स्टेशन भारत-नेपाळ सीमेजवळ आहे. जे शेजारील देशापासून ४ किमी दूर आहे. जनकपूरच्या कुर्था स्टेशनवरून हा मार्ग नेपाळशी जोडला गेला आहे. या दोन रेल्वे स्थानकांदरम्यान आंतर भारत नेपाळ सीमा प्रवासी ट्रेन धावते. या ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी दोन्ही देशांतील लोकांना पासपोर्ट आणि व्हिसाची गरज नाही.

तसेच पूर्वी पाकिस्तानलाही ट्रेनमध्ये बसून जाता येत होतं. मात्र सध्या पाकिस्तानच्या कारवायांमुळे त्यासोबतची रेल्वे वाहतूक बंद आहे.

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे