शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

फक्त एवढ्या पैशात रेल्वेने करा परदेशवारी; भारताच्या 'या' स्थानकातून जाता येते दुसऱ्या देशात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 17:23 IST

बाहेरच्या देशात जायच म्हटलं की आपल्या समोर विमान हा पर्याय असतो. परदेशात फिरायला जाण्याची अनेकांची इच्छा असते.

Railway Stations of India runs across border: बाहेरच्या देशात जायच म्हटलं की आपल्या समोर विमान हा पर्याय असतो. परदेशात फिरायला जाण्याची अनेकांची इच्छा असते. पण, तिकिटाच्या खर्चामुळे अनेकांना ते शक्य नसते. मात्र भारतातून रेल्वेनेही काही देशात जाता येते. यासाठी खर्चही कमी येतो. भारताच्या सीमा आज अनेक देशांना मिळतात. सीमेला लागून असणाऱ्या काही देशात आजही आपल्याला रेल्वेने जाता येतं. बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, चीन, भूतान हे देश आपल्या देशाच्या सीमेजवळ आहेत. 

पश्चिम बंगालमध्ये सिंघाबाद रेल्वे स्थानक मालदा जिल्ह्यात आहे. जुन्या मालदा रेल्वेस्थानकावर सिंघाबाद रेल्वे स्थानकावरुन फक्त एक रेल्वे चालते. ही गाडी सीमाभागातील दोन्ही हद्दीत माल निर्यात करण्याचे काम आजही करते. याला देशातील शेवटचे रेल्वेस्थानकही म्हटले जात. सिंहाबाद रेल्वे स्थानक रोहनपूर स्थानकाद्वारे बांगलादेशशी जोडलेले आहे.

IAS चायवाला! डिप्रेशनमधून सावरण्यासाठी सुरू केलं चहाचं दुकान; निर्माण केली नवी ओळख

नेपाळला जाणार्‍या रेल्वेगाड्याही येथून जातात

२०११ नंतर फक्त बांगलादेशच नाही तर नेपाळकडे जाणाऱ्या गाड्या सिंगाबादमधून जातात. बांगलादेशातून नेपाळमध्ये खतांची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते. रोहनपूर-सिंहाबाद मालवाहू गाड्यांची खेप घेऊन ट्रांझिट प्वाइंटवरुन जाते. 

पेट्रापोल रेल्वेस्थानक 

हे रेल्वेस्थानक बंगालच्या उत्तरी २४ परगना जिल्ह्यातील भारत बांगलादेश सीमेजवळ आहे. हे स्थानक बांगलादेश आणि भारतामध्ये आयात-निर्यातीसाठी महत्वाची भूमिका सांभाळते. कोलकातापासून बांगलादेश जाण्यासाठी आपल्याला अगोदर बंधन एक्सप्रेस पकडावी लागेल. या रेल्वेसाठी तुमच्याकडे पासपोर्ट आणि व्हीजा असणे बंधनकारक आहे. ही रेल्वे बांगलादेश पोहचण्याअगोदर पेट्रापोल स्थानकावर थांबते.

बंधन एक्सप्रेस

बंधन एक्स्प्रेस ९ नोव्हेंबर २०१७ रोजी कोलकाता येथून सुरू होऊन बांगलादेशातील खुलना शहरात जाणार होती. बारिशाल एक्स्प्रेस मार्गावर फक्त एक्स्प्रेस धावते.

हल्दीबारी रेल्वे स्थानक

हल्दीबारी रेल्वे स्टेशन बांगलादेश सीमेपासून सुमारे ४.५ किमी अंतरावर आहे, हे स्थानक एक ट्रांझिट पॉइंट म्हणून देखील काम करते. हल्दीबारी हे चिल्हाटी स्टेशनद्वारे बांगलादेशशी जोडलेले आहे, जे भारतीय सीमेपासून ६ किमी अंतरावर आहे. हळदीपूर-चिल्हाटी रेल्वे मार्गाचे उद्घाटन डिसेंबर २०२० मध्ये होणार आहे. यानंतर २६ मार्च २०२१ रोजी रोझी मिताली एक्सप्रेस सुरू झाली. न्यू जलपाईगुडी जंक्शनवरून निघणाऱ्या गाड्या ढकियालाला पोहोचण्यापूर्वी हल्दीबारी येथे थांबतात.

जयनगर रेल्वे स्थानक

बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात स्थित, हे स्टेशन भारत-नेपाळ सीमेजवळ आहे. जे शेजारील देशापासून ४ किमी दूर आहे. जनकपूरच्या कुर्था स्टेशनवरून हा मार्ग नेपाळशी जोडला गेला आहे. या दोन रेल्वे स्थानकांदरम्यान आंतर भारत नेपाळ सीमा प्रवासी ट्रेन धावते. या ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी दोन्ही देशांतील लोकांना पासपोर्ट आणि व्हिसाची गरज नाही.

तसेच पूर्वी पाकिस्तानलाही ट्रेनमध्ये बसून जाता येत होतं. मात्र सध्या पाकिस्तानच्या कारवायांमुळे त्यासोबतची रेल्वे वाहतूक बंद आहे.

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे