शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

फक्त एवढ्या पैशात रेल्वेने करा परदेशवारी; भारताच्या 'या' स्थानकातून जाता येते दुसऱ्या देशात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 17:23 IST

बाहेरच्या देशात जायच म्हटलं की आपल्या समोर विमान हा पर्याय असतो. परदेशात फिरायला जाण्याची अनेकांची इच्छा असते.

Railway Stations of India runs across border: बाहेरच्या देशात जायच म्हटलं की आपल्या समोर विमान हा पर्याय असतो. परदेशात फिरायला जाण्याची अनेकांची इच्छा असते. पण, तिकिटाच्या खर्चामुळे अनेकांना ते शक्य नसते. मात्र भारतातून रेल्वेनेही काही देशात जाता येते. यासाठी खर्चही कमी येतो. भारताच्या सीमा आज अनेक देशांना मिळतात. सीमेला लागून असणाऱ्या काही देशात आजही आपल्याला रेल्वेने जाता येतं. बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, चीन, भूतान हे देश आपल्या देशाच्या सीमेजवळ आहेत. 

पश्चिम बंगालमध्ये सिंघाबाद रेल्वे स्थानक मालदा जिल्ह्यात आहे. जुन्या मालदा रेल्वेस्थानकावर सिंघाबाद रेल्वे स्थानकावरुन फक्त एक रेल्वे चालते. ही गाडी सीमाभागातील दोन्ही हद्दीत माल निर्यात करण्याचे काम आजही करते. याला देशातील शेवटचे रेल्वेस्थानकही म्हटले जात. सिंहाबाद रेल्वे स्थानक रोहनपूर स्थानकाद्वारे बांगलादेशशी जोडलेले आहे.

IAS चायवाला! डिप्रेशनमधून सावरण्यासाठी सुरू केलं चहाचं दुकान; निर्माण केली नवी ओळख

नेपाळला जाणार्‍या रेल्वेगाड्याही येथून जातात

२०११ नंतर फक्त बांगलादेशच नाही तर नेपाळकडे जाणाऱ्या गाड्या सिंगाबादमधून जातात. बांगलादेशातून नेपाळमध्ये खतांची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते. रोहनपूर-सिंहाबाद मालवाहू गाड्यांची खेप घेऊन ट्रांझिट प्वाइंटवरुन जाते. 

पेट्रापोल रेल्वेस्थानक 

हे रेल्वेस्थानक बंगालच्या उत्तरी २४ परगना जिल्ह्यातील भारत बांगलादेश सीमेजवळ आहे. हे स्थानक बांगलादेश आणि भारतामध्ये आयात-निर्यातीसाठी महत्वाची भूमिका सांभाळते. कोलकातापासून बांगलादेश जाण्यासाठी आपल्याला अगोदर बंधन एक्सप्रेस पकडावी लागेल. या रेल्वेसाठी तुमच्याकडे पासपोर्ट आणि व्हीजा असणे बंधनकारक आहे. ही रेल्वे बांगलादेश पोहचण्याअगोदर पेट्रापोल स्थानकावर थांबते.

बंधन एक्सप्रेस

बंधन एक्स्प्रेस ९ नोव्हेंबर २०१७ रोजी कोलकाता येथून सुरू होऊन बांगलादेशातील खुलना शहरात जाणार होती. बारिशाल एक्स्प्रेस मार्गावर फक्त एक्स्प्रेस धावते.

हल्दीबारी रेल्वे स्थानक

हल्दीबारी रेल्वे स्टेशन बांगलादेश सीमेपासून सुमारे ४.५ किमी अंतरावर आहे, हे स्थानक एक ट्रांझिट पॉइंट म्हणून देखील काम करते. हल्दीबारी हे चिल्हाटी स्टेशनद्वारे बांगलादेशशी जोडलेले आहे, जे भारतीय सीमेपासून ६ किमी अंतरावर आहे. हळदीपूर-चिल्हाटी रेल्वे मार्गाचे उद्घाटन डिसेंबर २०२० मध्ये होणार आहे. यानंतर २६ मार्च २०२१ रोजी रोझी मिताली एक्सप्रेस सुरू झाली. न्यू जलपाईगुडी जंक्शनवरून निघणाऱ्या गाड्या ढकियालाला पोहोचण्यापूर्वी हल्दीबारी येथे थांबतात.

जयनगर रेल्वे स्थानक

बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात स्थित, हे स्टेशन भारत-नेपाळ सीमेजवळ आहे. जे शेजारील देशापासून ४ किमी दूर आहे. जनकपूरच्या कुर्था स्टेशनवरून हा मार्ग नेपाळशी जोडला गेला आहे. या दोन रेल्वे स्थानकांदरम्यान आंतर भारत नेपाळ सीमा प्रवासी ट्रेन धावते. या ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी दोन्ही देशांतील लोकांना पासपोर्ट आणि व्हिसाची गरज नाही.

तसेच पूर्वी पाकिस्तानलाही ट्रेनमध्ये बसून जाता येत होतं. मात्र सध्या पाकिस्तानच्या कारवायांमुळे त्यासोबतची रेल्वे वाहतूक बंद आहे.

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे