शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

फक्त एवढ्या पैशात रेल्वेने करा परदेशवारी; भारताच्या 'या' स्थानकातून जाता येते दुसऱ्या देशात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 17:23 IST

बाहेरच्या देशात जायच म्हटलं की आपल्या समोर विमान हा पर्याय असतो. परदेशात फिरायला जाण्याची अनेकांची इच्छा असते.

Railway Stations of India runs across border: बाहेरच्या देशात जायच म्हटलं की आपल्या समोर विमान हा पर्याय असतो. परदेशात फिरायला जाण्याची अनेकांची इच्छा असते. पण, तिकिटाच्या खर्चामुळे अनेकांना ते शक्य नसते. मात्र भारतातून रेल्वेनेही काही देशात जाता येते. यासाठी खर्चही कमी येतो. भारताच्या सीमा आज अनेक देशांना मिळतात. सीमेला लागून असणाऱ्या काही देशात आजही आपल्याला रेल्वेने जाता येतं. बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, चीन, भूतान हे देश आपल्या देशाच्या सीमेजवळ आहेत. 

पश्चिम बंगालमध्ये सिंघाबाद रेल्वे स्थानक मालदा जिल्ह्यात आहे. जुन्या मालदा रेल्वेस्थानकावर सिंघाबाद रेल्वे स्थानकावरुन फक्त एक रेल्वे चालते. ही गाडी सीमाभागातील दोन्ही हद्दीत माल निर्यात करण्याचे काम आजही करते. याला देशातील शेवटचे रेल्वेस्थानकही म्हटले जात. सिंहाबाद रेल्वे स्थानक रोहनपूर स्थानकाद्वारे बांगलादेशशी जोडलेले आहे.

IAS चायवाला! डिप्रेशनमधून सावरण्यासाठी सुरू केलं चहाचं दुकान; निर्माण केली नवी ओळख

नेपाळला जाणार्‍या रेल्वेगाड्याही येथून जातात

२०११ नंतर फक्त बांगलादेशच नाही तर नेपाळकडे जाणाऱ्या गाड्या सिंगाबादमधून जातात. बांगलादेशातून नेपाळमध्ये खतांची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते. रोहनपूर-सिंहाबाद मालवाहू गाड्यांची खेप घेऊन ट्रांझिट प्वाइंटवरुन जाते. 

पेट्रापोल रेल्वेस्थानक 

हे रेल्वेस्थानक बंगालच्या उत्तरी २४ परगना जिल्ह्यातील भारत बांगलादेश सीमेजवळ आहे. हे स्थानक बांगलादेश आणि भारतामध्ये आयात-निर्यातीसाठी महत्वाची भूमिका सांभाळते. कोलकातापासून बांगलादेश जाण्यासाठी आपल्याला अगोदर बंधन एक्सप्रेस पकडावी लागेल. या रेल्वेसाठी तुमच्याकडे पासपोर्ट आणि व्हीजा असणे बंधनकारक आहे. ही रेल्वे बांगलादेश पोहचण्याअगोदर पेट्रापोल स्थानकावर थांबते.

बंधन एक्सप्रेस

बंधन एक्स्प्रेस ९ नोव्हेंबर २०१७ रोजी कोलकाता येथून सुरू होऊन बांगलादेशातील खुलना शहरात जाणार होती. बारिशाल एक्स्प्रेस मार्गावर फक्त एक्स्प्रेस धावते.

हल्दीबारी रेल्वे स्थानक

हल्दीबारी रेल्वे स्टेशन बांगलादेश सीमेपासून सुमारे ४.५ किमी अंतरावर आहे, हे स्थानक एक ट्रांझिट पॉइंट म्हणून देखील काम करते. हल्दीबारी हे चिल्हाटी स्टेशनद्वारे बांगलादेशशी जोडलेले आहे, जे भारतीय सीमेपासून ६ किमी अंतरावर आहे. हळदीपूर-चिल्हाटी रेल्वे मार्गाचे उद्घाटन डिसेंबर २०२० मध्ये होणार आहे. यानंतर २६ मार्च २०२१ रोजी रोझी मिताली एक्सप्रेस सुरू झाली. न्यू जलपाईगुडी जंक्शनवरून निघणाऱ्या गाड्या ढकियालाला पोहोचण्यापूर्वी हल्दीबारी येथे थांबतात.

जयनगर रेल्वे स्थानक

बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात स्थित, हे स्टेशन भारत-नेपाळ सीमेजवळ आहे. जे शेजारील देशापासून ४ किमी दूर आहे. जनकपूरच्या कुर्था स्टेशनवरून हा मार्ग नेपाळशी जोडला गेला आहे. या दोन रेल्वे स्थानकांदरम्यान आंतर भारत नेपाळ सीमा प्रवासी ट्रेन धावते. या ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी दोन्ही देशांतील लोकांना पासपोर्ट आणि व्हिसाची गरज नाही.

तसेच पूर्वी पाकिस्तानलाही ट्रेनमध्ये बसून जाता येत होतं. मात्र सध्या पाकिस्तानच्या कारवायांमुळे त्यासोबतची रेल्वे वाहतूक बंद आहे.

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे