शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Indian Railway: 'राम-सेतू'साठी भारतीय रेल्वेची मोठी योजना, समुद्रात 80 किमी प्रति तास वेगाने धावणार ट्रेन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 18:11 IST

Indian Railways: दक्षिण रेल्वे समुद्रामार्गे जाणारा एक आधुनिक पूल बांधणार आहे. यामुळे रामेश्वर ते धनुषकोडी अंतर आणखी जवळ होईल.

Indian Railways: भारतीय रेल्वे वेळोवेळी तंत्रज्ञानाच्या बाबतीत अनेक बदल करत आहे. देशात रेल्वेने अनेक भव्य पूल बांधले आहेत, ज्यांची जगभरात वेगळी ओळख आहे. असाच एक पूल दक्षिण रेल्वे बांधत आहे. हा पूल पाण्याचे जहाज जवळ आल्यावर पाण्यावरुन वर येईल. रामेश्वरमला जाणारे भाविक येत्या काळात या अभियांत्रिकी आश्चर्याचे साक्षीदार होतील. सुमारे 560 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या पंबन पुलावर लिफ्ट सिस्टिम वापरून ट्रॅक टाकण्यात येणार असून, त्यावरून ताशी 80 किमी वेगाने ट्रेन धावणार आहे.

धनुषकोडीसाठी पुन्हा रेल्वे मार्ग सुरू होईलरामेश्वरम आणि धनुषकोडी यांना पुन्हा एकदा रेल्वेमार्गाने जोडले जाणार आहे. यातून रामेश्वरमला भेट देणाऱ्या पर्यटकांना धनुषकोडीला जाण्याचा सोपा पर्याय उपलब्ध होईल. या पुलाच्या निर्मितीमुळे रेल्वेला रामेश्वरमपर्यंत अनेक नवीन गाड्या चालवता येणार आहेत.

समुद्री वादळात रेल्वे मार्ग उद्ध्वस्त झाला होताधनुषकोडीमध्ये पूर्वी एक रेल्वे स्टेशन होते, तेथून पुढे श्रीलंकेला माल जात असे. पण साठच्या दशकात आलेल्या भीषण सागरी वादळात हे रेल्वे स्थानक आणि रेल्वे मार्ग उद्ध्वस्त झाला. तेव्हापासून ते बनवण्यात कोणीही रस दाखवला नाही. साठ वर्षांनंतर पुन्हा एकदा ही रेल्वे लाईन सुरू होणार आहे. या स्थानकाला पर्यटन आणि धार्मिक दोन्ही दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे.

18 किमी रेल्वे मार्गमदुराई विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता आनंद यांच्या मते, रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास करून ते नवीन ब्रॉडगेज आणि इलेक्ट्रिक लाईन्सने जोडण्याची योजना आखत आहे. ही रामेश्वरमपासून 18 किमीची लाईन असेल आणि तिला 3 थांबे असतील. यामुळे पर्यटकांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा आहे. सध्या असलेला पूल 120 वर्षे जुना असल्याने सध्या या पुलावरून केवळ डझनभर गाड्या जातात. त्याचा वेग ताशी 10 किलोमीटर इतका आहे. एवढेच नाही तर जुन्या पंबन पुलावरून मालगाड्याही धावत नाहीत. अशा परिस्थितीत सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वेने पंबन पुलासह नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

लिफ्ट सिस्टम वापरुन पुलाची पुनर्बांधणी केली जाणारसमुद्रातून जहाज आल्यावर पूल आपोआप वर जाईल यासाठी लिफ्ट सिस्टिम वापरून पंबन पुलाची पुनर्बांधणी केली जात आहे. या आधी बांधलेल्या पुलांना स्वतंत्र ट्रॅक असायचे. जहाज आल्यानंतर ट्रॅक वर जायचे आणि जहाज गेल्यावर पुन्हा एकमेकांशी जोडायचे. याला सुमारे अर्धा तास लागत असे. पण, आता पंबन पुलातील लिफ्ट सिस्टिमचा वापर केल्यानंतर जहाज आल्यानंतर ट्रॅक लिफ्टप्रमाणे वर जातील आणि जहाज सुटल्यानंतर जागेवर परत येतील. या प्रक्रियेस फक्त 10 मिनिटे लागतील. विशेष म्हणजे, जुना पंबन पूल समुद्राच्या मध्यभागी बांधला गेला आहे.

धनुषकोडीला पोहोचणे सोपे होईलरेल्वेच्या म्हणण्यानुसार, धनुषकोडी ते रामेश्वरमपर्यंत 18 किमी, सिंगल लाइन रेल्वे ट्रॅक टाकण्यात येणार आहे. यामुळे रामेश्वरमला भेट देणाऱ्या पर्यटकांना धनुषकोडीला जाण्याचा सोपा पर्याय उपलब्ध होईल. राम-सेतू रामेश्वरमपासून सुरू होतो. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राजवळ बांधले जाणारे हे रेल्वे स्थानक खास असेल. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, हा प्रकल्प 700 कोटी रुपये खर्चून पूर्ण केला जाणार असून, 18 किमीपैकी 13 किमीचा रेल्वे ट्रॅक एलिव्हेटेड असेल. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेRameshwar mandir Achraरामेश्वर मंदिर आचऱाTamilnaduतामिळनाडू