शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 14:35 IST

Operation Sindoor: जम्मू आणि काश्मीरमधील प्रवाशांच्या परतीसाठी भारतीय रेल्वेने तीन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला.

Operation Sindoor: पहलगाम हल्ल्याला उत्तर म्हणून भारताने दिलेल्या प्रत्युत्तराचा बदला घेण्यासाठी जम्मू शहर व अन्य ठिकाणी हल्ले करण्याचा पाकिस्तानचा डाव भारताने उधळून लावला. पाकिस्तानची आठ क्षेपणास्त्रे व सुमारे ५० ड्रोन भारताने पाडले. त्यानंतर भारताने मध्यरात्री पाकच्या अनेक शहरांवर हल्ला केल्याचे वृत्त होते. यानंतर देशपातळीवर हालचालींना वेग आला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तीनही दलांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. यातच भारतीय रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वेकडून उधमपूर-जम्मू-दिल्ली या मार्गावर विशेष ट्रेन सेवा सुरू करण्यात येणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वेने म्हटले आहे की, उधमपूर, जम्मू आणि दिल्ली या मार्गावर तीन विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत. या तिन्ही गाड्या अनारक्षित असतील. ज्या प्रवाशांना आरक्षण मिळालेले नाही. ते या ट्रेन सेवांचा लाभ घेऊ शकतात. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तान भारतीय निवासी क्षेत्रे आणि लष्करी आस्थापनांवर सतत हल्ले करत आहे, ज्यामुळे या भागातील धोका थोडा वाढला आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील प्रवाशांच्या परतीसाठी ट्रेन सेवा

जम्मू आणि काश्मीरमधील प्रवाशांच्या परतीसाठी भारतीय रेल्वेने तीन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला. ज्या जम्मू, उधमपूर आणि पठाणकोट येथून धावतील. रेल्वेने याबाबतची माहिती दिली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानचा चांगलाच तिळपापड झाला आहे. पाक अनेक ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे. पाकने जम्मू विमानतळाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. सरकारने सीमावर्ती भागात विमान सेवांवर बंदी घातली होती. याशिवाय अनेक भागात शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत.

दरम्यान, भारतीय रेल्वेकडून कर्मचाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रेल्वे बोर्डाने सर्व कर्मचाऱ्यांना अलर्ट केले आहे की, पाकिस्तानी गुप्तचर संस्था या भारतीय लष्करी ट्रेनसेवांबाबत माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndian Railwayभारतीय रेल्वेJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला