शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Indian Railway: प्रवाशांसाठी बंद होणार हे रेल्वेस्टेशन, मंदिर ठरणार कारण, नेमका काय प्रकार? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 15:31 IST

Indian Railway: एका मंदिरामुळे रेल्वे स्टेशन बंद करावे लागणार असल्याचे विचित्र प्रकरण सध्या उत्तर प्रदेशमध्ये चर्चेत आहे. आग्रा येथील राजा की मंडी रेल्वे स्टेशन प्रवाशांसाठी बंद करण्यात येणार आहे. स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर असलेल्या एका मंदिरावरून चाललेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर डीआरएमनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

लखनौ - एका मंदिरामुळे रेल्वे स्टेशन बंद करावे लागणार असल्याचे विचित्र प्रकरण सध्या उत्तर प्रदेशमध्ये चर्चेत आहे. आग्रा येथील राजा की मंडी रेल्वे स्टेशन प्रवाशांसाठी बंद करण्यात येणार आहे. स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर असलेल्या एका मंदिरावरून चाललेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर डीआरएमनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. डीआरएमनी सांगितले की, जर चामुंडा देवी मंदिर हटवण्यात आलं नाही तर स्टेशनचा उपयोग प्रवासी वाहतुकीसाठी करता येणार नाही. प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर असलेलं हे मंदिर अनधिकृतरीत्या बांधण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.

डीआरएमच्या या भूमिकेवरून भक्तांकडून संताप व्यक्त होत आहे. त्यांनी सांगितले की, मंदिराला हटवण्यावरून विनाकारण बहाणेबाजी केली जात आहेत. तर रेल्वेने सांगितले की, मंदिरामुळे प्रवाशांना ये जा करण्यात अडथळे येत आहेत. तसेच त्यामुळे ट्रेनचा वेगही कमी होतो. आता हे मंदिर स्थलांतरीत करावे यासाठी मंदिर प्रशासनाला नोटिसही देण्यात आली आहे.

आग्रा रेल्वे मंडळाने सांगितले की, मंदिरामुळे रेल्वे लाइनला वक्राकार करण्यात आले आहे. परिणामी कुठलीही ट्रेन येथून ३० किमी प्रतितास वेगापेक्षा अधिक वेगाने जाऊ शकत नाही. एवढंच नाही तर हायस्पीड ट्रेननाही येथून जाणे कठीण होते. त्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच त्यांचा वेळही वाया जातो. त्यामुळे मंदिर येथून स्थलांतरित करणे आवश्यक आहे.

रेल्वे  अधिकाऱ्यांनी सांगितले की, राजा मंडी स्टेशनच्या काही भागावर चामुंडा देवीचं मंदिर बांधलेलं आहे. त्याचं क्षेत्रफळ हे सुमारे १७१६ चौमीटर आहे. त्याचं क्षेत्रफळ ६०० चौमीटर भागात मंदिर आहे. त्याचा ७२ चौमीटर भाग हा प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर आहे. ही बाब रेल्वेच्या शेड्युल ऑफ डायमेंशनचं उल्लंघन आहे, तसेच सुरक्षेच्या दृष्टीने चुकीचे आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेल्वे केवळ अतिक्रमण हटवण्याचे करत आहे. जर या कामामध्ये काही अडचण आली तर प्रवाशांच्या सुरक्षेची बाब विचारात घेऊन हे स्टेशन प्रवासी उपयोगासाठी बंद करण्यात आले आहे.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेUttar Pradeshउत्तर प्रदेश