शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

Indian Railway: प्रवाशांसाठी बंद होणार हे रेल्वेस्टेशन, मंदिर ठरणार कारण, नेमका काय प्रकार? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 15:31 IST

Indian Railway: एका मंदिरामुळे रेल्वे स्टेशन बंद करावे लागणार असल्याचे विचित्र प्रकरण सध्या उत्तर प्रदेशमध्ये चर्चेत आहे. आग्रा येथील राजा की मंडी रेल्वे स्टेशन प्रवाशांसाठी बंद करण्यात येणार आहे. स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर असलेल्या एका मंदिरावरून चाललेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर डीआरएमनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

लखनौ - एका मंदिरामुळे रेल्वे स्टेशन बंद करावे लागणार असल्याचे विचित्र प्रकरण सध्या उत्तर प्रदेशमध्ये चर्चेत आहे. आग्रा येथील राजा की मंडी रेल्वे स्टेशन प्रवाशांसाठी बंद करण्यात येणार आहे. स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर असलेल्या एका मंदिरावरून चाललेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर डीआरएमनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. डीआरएमनी सांगितले की, जर चामुंडा देवी मंदिर हटवण्यात आलं नाही तर स्टेशनचा उपयोग प्रवासी वाहतुकीसाठी करता येणार नाही. प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर असलेलं हे मंदिर अनधिकृतरीत्या बांधण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.

डीआरएमच्या या भूमिकेवरून भक्तांकडून संताप व्यक्त होत आहे. त्यांनी सांगितले की, मंदिराला हटवण्यावरून विनाकारण बहाणेबाजी केली जात आहेत. तर रेल्वेने सांगितले की, मंदिरामुळे प्रवाशांना ये जा करण्यात अडथळे येत आहेत. तसेच त्यामुळे ट्रेनचा वेगही कमी होतो. आता हे मंदिर स्थलांतरीत करावे यासाठी मंदिर प्रशासनाला नोटिसही देण्यात आली आहे.

आग्रा रेल्वे मंडळाने सांगितले की, मंदिरामुळे रेल्वे लाइनला वक्राकार करण्यात आले आहे. परिणामी कुठलीही ट्रेन येथून ३० किमी प्रतितास वेगापेक्षा अधिक वेगाने जाऊ शकत नाही. एवढंच नाही तर हायस्पीड ट्रेननाही येथून जाणे कठीण होते. त्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच त्यांचा वेळही वाया जातो. त्यामुळे मंदिर येथून स्थलांतरित करणे आवश्यक आहे.

रेल्वे  अधिकाऱ्यांनी सांगितले की, राजा मंडी स्टेशनच्या काही भागावर चामुंडा देवीचं मंदिर बांधलेलं आहे. त्याचं क्षेत्रफळ हे सुमारे १७१६ चौमीटर आहे. त्याचं क्षेत्रफळ ६०० चौमीटर भागात मंदिर आहे. त्याचा ७२ चौमीटर भाग हा प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर आहे. ही बाब रेल्वेच्या शेड्युल ऑफ डायमेंशनचं उल्लंघन आहे, तसेच सुरक्षेच्या दृष्टीने चुकीचे आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेल्वे केवळ अतिक्रमण हटवण्याचे करत आहे. जर या कामामध्ये काही अडचण आली तर प्रवाशांच्या सुरक्षेची बाब विचारात घेऊन हे स्टेशन प्रवासी उपयोगासाठी बंद करण्यात आले आहे.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेUttar Pradeshउत्तर प्रदेश