शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा नियम लागू; जाणून घ्या, अन्यथा होईल नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 07:59 IST

रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांसाठी नवा नियम लागू; तत्काळ अंमलबजावणी सुरू

नवी दिल्ली: भारतीय रेल्वेकडून प्रवाशांसाठीचे नियम बदलत असतात. तुम्ही रेल्वे प्रवास करत असाल तर तुम्हाला या नियमांची माहिती असणं गरजेचं असतं. रेल्वेकडून तयार करण्यात आलेलं नियम रात्री प्रवास करणाऱ्यांसाठी लागू होतील. रात्रीचा प्रवास करणाऱ्या अनेकांना त्यांच्या सहप्रवाशांमुळे त्रास होत असल्याच्या तक्रारी रेल्वेला मिळतात. त्यामुळे रेल्वेनं नियमांमध्ये बदल केले आहेत. प्रवाशांना रात्री कोणतीही अडचण येऊ नये, त्यांची झोपमोड होऊ नये या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे.

नव्या नियमांची तत्काळ अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. नव्या नियमांनुसार प्रवासी रात्री मोबाईलवर मोठ्या आवाजात बोलू शकत नाही आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकू शकत नाही. प्रवाशांनी तक्रार केल्यास रेल्वे अशा व्यक्तींविरोधात कारवाई करेल. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

या नियमाच्या अंतर्गत प्रवाशांकडून तक्रार प्राप्त झाल्यास रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना तिथे जाऊन समस्या सोडवावी लागेल. तक्रारीचं निराकरण न झाल्यास त्यासाठी कर्मचारी उत्तरदायी असेल. रेल्वे मंत्रालयानं सगळ्यांना विभागांना याबद्दलचे आदेश दिले असून तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचनादेखील दिल्या गेल्या आहेत. 

शेजारच्या आसनांवरील प्रवासी मोठ्या आवाजात फोनवर बोलत असल्याच्या, गाणी ऐकत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून रेल्वेला मिळतात. काही एकत्र प्रवास करणारे प्रवासी रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत असतात. रात्री लाईट सुरू ठेवण्यावरूनही रेल्वे प्रवाशांमध्ये वाद झाले आहेत. 

रात्री १० नंतर खालील नियम लागू- कोणताही प्रवास मोबाईलवर मोठ्या आवाजात बोलू शकत नाही, गाणी ऐकू शकणार नाही.- रात्री नाईट लाईट सोडून सगळे दिवे बंद करावे लागणार.- ग्रुपमध्ये प्रवास करणारे प्रवासी रात्री उशिरापर्यंत गप्पा मारू शकणार नाहीत. सहप्रवाशांनी तक्रार केल्यास कारवाई होणार.- चेकिंग स्टाफ, आरपीएफ, इलेक्ट्रिशियन, केटरिंग स्टाफसोबत शांतपणे बोला.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे