शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा नियम लागू; जाणून घ्या, अन्यथा होईल नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 07:59 IST

रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांसाठी नवा नियम लागू; तत्काळ अंमलबजावणी सुरू

नवी दिल्ली: भारतीय रेल्वेकडून प्रवाशांसाठीचे नियम बदलत असतात. तुम्ही रेल्वे प्रवास करत असाल तर तुम्हाला या नियमांची माहिती असणं गरजेचं असतं. रेल्वेकडून तयार करण्यात आलेलं नियम रात्री प्रवास करणाऱ्यांसाठी लागू होतील. रात्रीचा प्रवास करणाऱ्या अनेकांना त्यांच्या सहप्रवाशांमुळे त्रास होत असल्याच्या तक्रारी रेल्वेला मिळतात. त्यामुळे रेल्वेनं नियमांमध्ये बदल केले आहेत. प्रवाशांना रात्री कोणतीही अडचण येऊ नये, त्यांची झोपमोड होऊ नये या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे.

नव्या नियमांची तत्काळ अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. नव्या नियमांनुसार प्रवासी रात्री मोबाईलवर मोठ्या आवाजात बोलू शकत नाही आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकू शकत नाही. प्रवाशांनी तक्रार केल्यास रेल्वे अशा व्यक्तींविरोधात कारवाई करेल. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

या नियमाच्या अंतर्गत प्रवाशांकडून तक्रार प्राप्त झाल्यास रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना तिथे जाऊन समस्या सोडवावी लागेल. तक्रारीचं निराकरण न झाल्यास त्यासाठी कर्मचारी उत्तरदायी असेल. रेल्वे मंत्रालयानं सगळ्यांना विभागांना याबद्दलचे आदेश दिले असून तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचनादेखील दिल्या गेल्या आहेत. 

शेजारच्या आसनांवरील प्रवासी मोठ्या आवाजात फोनवर बोलत असल्याच्या, गाणी ऐकत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून रेल्वेला मिळतात. काही एकत्र प्रवास करणारे प्रवासी रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत असतात. रात्री लाईट सुरू ठेवण्यावरूनही रेल्वे प्रवाशांमध्ये वाद झाले आहेत. 

रात्री १० नंतर खालील नियम लागू- कोणताही प्रवास मोबाईलवर मोठ्या आवाजात बोलू शकत नाही, गाणी ऐकू शकणार नाही.- रात्री नाईट लाईट सोडून सगळे दिवे बंद करावे लागणार.- ग्रुपमध्ये प्रवास करणारे प्रवासी रात्री उशिरापर्यंत गप्पा मारू शकणार नाहीत. सहप्रवाशांनी तक्रार केल्यास कारवाई होणार.- चेकिंग स्टाफ, आरपीएफ, इलेक्ट्रिशियन, केटरिंग स्टाफसोबत शांतपणे बोला.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे