शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

Indian Railway: रेल्वे प्रवाशांना मोठा धक्का, तिकिटांचे दर वाढणार? रेल्वेमंत्र्यांचे संसदेत सूचक विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 16:19 IST

Indian Railway: रेल्वे प्रवाशांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेमध्ये बोलताना येणाऱ्या काळात रेल्वेच्या तिकिटांचे भाडे वाढवण्याचे संकेत व्यक्त केले

नवी दिल्ली - भारतीय रेल्वे हे देशांतर्गत प्रवासाचे मोठे माध्यम आहे. दररोज कोट्यवधी लोक प्रवास करत असतात. मात्र आता रेल्वे प्रवाशांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेमध्ये बोलताना येणाऱ्या काळात रेल्वेच्या तिकिटांचे भाडे वाढवण्याचे संकेत व्यक्त केले.  अश्विनी वैष्णव यांच्या या विधानामुळे येणाऱ्या काळात रेल्वेच्या तिकिटांची भाडेवाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोरोनापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासात मिळणाऱ्या सवलती पुन्हा सुरू करण्यात येतील का, असा प्रश्न रेल्वेमंत्र्यांना विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना रेल्वे मंत्र्यांनी सांगितले की, ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला सध्याच्या काळात ५५ टक्के सवलत दिली जात आहे.

त्यांनी सांगितले की, सध्याच्या काळामध्ये एका प्रवाशाच्या भाड्यावर रेल्वेचा प्रतिकिमी खर्च सुमारे १.१६ रुपये होतो. मात्र रेल्वे त्यासाठी केवळ ४५ ते ४८ पैसे प्रतिकिमी एवढेच भाडे आकारते. गेल्या वर्षाची आकडेवारी सांगताना रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, प्रवासी भाड्यावर रेल्वेकडून सुमारे ५९ हजार कोटी रुपये एवढी सब्सिडी देण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की, रेल्वेकडून प्रवाशांच्या सुविधेसाठी सातत्याने पावले उचलली जात आहेत. नव्या ट्रेनचे संचालन आणि रेल्वेमार्गांचा विस्तार केला जात आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, येणाऱ्या काळामध्ये प्रवाशांसाठी अनेक नव्या प्रकारच्या सुविधा आणल्या जात आहेत. ट्रेनच्या भाड्यामध्ये वाढ करण्याचे संकेत देताना त्यांनी सांगितले की, येणाऱ्या काळात अजूनही निर्णय घेतले जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे रेल्वेबाबत एक व्यापक दृष्टीकोन असून, मोठ्या रेल्वेस्टेशनसोबतच छोट्या रेल्वेस्टेशनचाही विकास करण्यात येणार आहे.

यापूर्वी अश्विनी वैष्णव यांनी दिल्लीतील एम्सवर झालेल्या सायबर हल्ल्याबाबत माहिती देताना सांगितले की, सायबर सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी बहुआयामी स्तरावर काम सुरू आहे. त्याशिवाय इतरही काही पावले उचलण्यात येणार आहेत.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAshwini Vaishnawअश्विनी वैष्णवCentral Governmentकेंद्र सरकार