शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

Indian Railway: रेल्वे प्रवाशांना मोठा धक्का, तिकिटांचे दर वाढणार? रेल्वेमंत्र्यांचे संसदेत सूचक विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 16:19 IST

Indian Railway: रेल्वे प्रवाशांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेमध्ये बोलताना येणाऱ्या काळात रेल्वेच्या तिकिटांचे भाडे वाढवण्याचे संकेत व्यक्त केले

नवी दिल्ली - भारतीय रेल्वे हे देशांतर्गत प्रवासाचे मोठे माध्यम आहे. दररोज कोट्यवधी लोक प्रवास करत असतात. मात्र आता रेल्वे प्रवाशांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेमध्ये बोलताना येणाऱ्या काळात रेल्वेच्या तिकिटांचे भाडे वाढवण्याचे संकेत व्यक्त केले.  अश्विनी वैष्णव यांच्या या विधानामुळे येणाऱ्या काळात रेल्वेच्या तिकिटांची भाडेवाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोरोनापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासात मिळणाऱ्या सवलती पुन्हा सुरू करण्यात येतील का, असा प्रश्न रेल्वेमंत्र्यांना विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना रेल्वे मंत्र्यांनी सांगितले की, ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला सध्याच्या काळात ५५ टक्के सवलत दिली जात आहे.

त्यांनी सांगितले की, सध्याच्या काळामध्ये एका प्रवाशाच्या भाड्यावर रेल्वेचा प्रतिकिमी खर्च सुमारे १.१६ रुपये होतो. मात्र रेल्वे त्यासाठी केवळ ४५ ते ४८ पैसे प्रतिकिमी एवढेच भाडे आकारते. गेल्या वर्षाची आकडेवारी सांगताना रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, प्रवासी भाड्यावर रेल्वेकडून सुमारे ५९ हजार कोटी रुपये एवढी सब्सिडी देण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की, रेल्वेकडून प्रवाशांच्या सुविधेसाठी सातत्याने पावले उचलली जात आहेत. नव्या ट्रेनचे संचालन आणि रेल्वेमार्गांचा विस्तार केला जात आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, येणाऱ्या काळामध्ये प्रवाशांसाठी अनेक नव्या प्रकारच्या सुविधा आणल्या जात आहेत. ट्रेनच्या भाड्यामध्ये वाढ करण्याचे संकेत देताना त्यांनी सांगितले की, येणाऱ्या काळात अजूनही निर्णय घेतले जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे रेल्वेबाबत एक व्यापक दृष्टीकोन असून, मोठ्या रेल्वेस्टेशनसोबतच छोट्या रेल्वेस्टेशनचाही विकास करण्यात येणार आहे.

यापूर्वी अश्विनी वैष्णव यांनी दिल्लीतील एम्सवर झालेल्या सायबर हल्ल्याबाबत माहिती देताना सांगितले की, सायबर सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी बहुआयामी स्तरावर काम सुरू आहे. त्याशिवाय इतरही काही पावले उचलण्यात येणार आहेत.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAshwini Vaishnawअश्विनी वैष्णवCentral Governmentकेंद्र सरकार