शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मनोज जरांगेंनी केले आदेशाचे उल्लंघन; हायकोर्टात महत्त्वाची सुनावणी
2
Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा
3
"माझ्या पोरांवर दादागिरी करायची नाही, एकालाही काठी लावली तर मुंबईसह महाराष्ट्र बंद करू"
4
मराठा आंदोलन: शिंदे गटाचे अर्जुन खोतकर आझाद मैदानात, घेतली मनोज जरांगेंची भेट; म्हणाले... 
5
मराठा आंदोलनामुळे मुंबईची लाईफलाईन खोळंबली! सीएसएमटी स्टेशनवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
6
"राष्ट्रीय पुरस्कार, आपली अपूर्ण इच्छा पूर्ण झाली...", किंग खानने राणीसोबत केलं रील, चाहते खूश
7
मराठा आंदोलन: सुट्टी असूनही मुंबई हायकोर्ट उघडले; जरांगेंविरोधातील याचिकेवर तातडीची सुनावणी
8
चीनमध्ये भारताचा पाकिस्तानला धक्का! SCO च्या जाहीरनाम्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा एकमताने निषेध
9
येत्या रविवारी खग्रास चंद्रग्रहण; 'या' वेळेत दिसणार अद्भुत लाल चंद्र! भारतातूनही पाहता येणार
10
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण सुरुच राहणार; इथेनॉलमुक्त पेट्रोलची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
11
सीएसएमटी स्टेशनवर मराठा आंदोलकांची प्रचंड गर्दी; लोकल ट्रेनच्या गार्ड केबिनमध्ये घुसले आंदोलक
12
लेडी कंडक्टरला तब्बल ६१५९ कॉल, ३१५ मेसेज; ‘तो’ म्हणाला, ‘माझ्याशी लग्न कर नाहीतर…'
13
ओलाचा शेअर रॉकेट बनला, ३० दिवसांत ४७% परतावा दिला; पाडला पैशांचा पाऊस; कारण काय?
14
"रशिया-भारत खांद्याला खांदा लावून प्रगती करतायत..."; PM मोदी आणि पुतिन यांच्यात दीर्घ चर्चा
15
७३ हजार सॅलरी असणाऱ्या पत्नीने पतीकडे मागितली पोटगी; हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निकाल
16
Women's World Cup 2025 Prize Money : महिला क्रिकेटला 'अच्छे दिन'; पुरुषांपेक्षाही अधिक बक्षीस
17
ट्रम्प टॅरिफच्या धक्क्यातूनही ओला इलेक्ट्रिकची उसळी; शेअरचा भाव ४७ टक्के वाढला; 'हा' निर्णय ठरला गेमचेंजर
18
सगळ्यांसमोर गळाभेट, एकाच गाडीतून प्रवास अन् हास्याचा खळखळाट! पुतिन-मोदींची मैत्री पाहून ट्रम्प यांचं टेन्शन वाढणार
19
Maratha Morcha : 'आधी संपलेला पक्ष म्हणून हिणवलं, आता मोठं आंदोलन उभं राहिल्यावर ३०० खासदार असूनही शरद पवारच केंद्रबिंदू'; सुप्रिया सुळेंची टीका
20
रोहित शर्माची झाली फिटनेस टेस्ट! पास की नापास, काय आला निकाल? संघात स्थान मिळणार?

अमेरिकन सिनेटमध्ये भारतीय पंतप्रधान

By admin | Updated: June 9, 2016 18:10 IST

मोंदीच्या आधी पंडित जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी, नरसिंह राव, अटल बिहारी वाजपेयी आणि डॉ. मनमोहनसिंग यांनी सिनेटमध्ये भाषणे दिली होती. त्यांच्या भाषणांचा थोडक्यात आढावा घेऊया .

 
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सिनेटमध्ये जोरदार भाषण केले, त्यांनी पहिली काही मिनीटे भारत आणि भारतीय संस्कृति याविषयी बोलण्यात खर्ची घातली. मात्र, त्यानंतर सुमारे पाऊण तासांच्या भाषणात त्यांनी उभय देशातील संबंधांपासून दहशतवाद, भारताची प्रगती यासह अनेक मुद्यांना स्पर्श केला. भारत आणि अमेरिकेच्या संबंधांची वीण उलगडून दाखविताना त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो शहरातील भाषणाचा उल्लेख केला.
 
थोर अमेरिकन नेते मार्टीन ल्युथर किंग यांनी महात्मा गांधींच्या अहिंसेच्या शिकवणीपासून प्रेरणा घेतली होती. तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अमेरिकी राज्यघटनेचा प्रभाव होता, असे त्यांनी सांगितले. अमेरिकेच्या संसदेत संयुक्त बैठकीत भाषण करणारे नरेंद्र मोदी भारताचे सहावे पंतप्रधान ठरले. यापूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह राव, अटल बिहारी वाजपेयी आणि डॉ. मनमोहनसिंग या पंतप्रधानांना हा सन्मान मिळाला होता. भारतीय पंतप्रधानांनी सिनेटमध्ये जाऊन केलेल्या भाषणांचा थोडक्यात आढावा घेऊया . 
 
 
पंडित जवाहरलाल नेहरू : भारत स्वातंत्र झाल्यांनतर १३ अक्टूबर १९४९ रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पहिल्यांदाच अमेरिकन सिनेटमध्ये भाषण केले होते. अमेरिकेन सिनेटमध्ये भाषण करणारे ते भारताचे पहिले पंतप्रधानाचा मान मिळाला होता. आपल्या भाषणात त्यांनी अमेरिका आणि भारताच्या व्यवसायिक संबधावर जोर दिला होता. 
मी अमेरिकेमध्ये दिल आणि दिमग शोधण्यासाठी आलो आहे. माझ्या मते दोन्ही देश एकमेंकाशी चांगले संबध प्रस्थापित करु पाहत आहेत. ऐखादा देश अथवा माणसास यशस्वी व्हायचे असेल तर त्याच्या आत्मनिर्भरता आणि मेहनतीवर ते अवलंबुन असते. भारतात आर्थिक शमता आहे त्याच्या जोडीला मेहनती नागरीकही आहेत पण याला टेकनिकल आणि मशिनची जोड हवी आहे. ती मदत तुमच्याकडून मिळेल ही आपेक्षा आहे. आशा पद्धतीच्या मिळणाऱ्या मदतीचे आम्ही स्वगत करु. यामधून दोन्ही देशांचा फायदा होऊ शकतो. 
 
दरम्यान, हाऊस चैंबरची डागडुजी सुरु असल्यामुळे पंडित नेहरु यांनी अमेरिकन काँग्रेसच्या दोन्ही सभागृहात वेगवेगळे भाषण केले होते.
 
 
राजीव गांधी : ४१ वर्षीय राजीव गांधी यांनी अमेरिका कांग्रेसमध्ये ज्यावेळी भाषण केले त्यावेळी त्यांच्या आवाजात अधुनीक भारताचे स्वप्न होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर तब्बत ३५ वर्षानंतर राजीव गांधी यांनी सिनेटमध्ये जाऊन संबोधित केले. १३ जून १९८५ रोजी त्यांनी आपल्या भाषणानी सिनेट गाजवली होती. भारत देश प्रचिन विचारांचा असला तरी भारतात तरुणवर्ग मोठ्याप्रमाणात आहे. भारत हा तरुणांचा देश आणि मी सुद्धा तरुण आहे. ज्याप्रमाणे जगात तरुण उत्साही आहेत त्याचप्रमाणे आम्ही ही उत्साही आहोत. माझे एक स्वप्न आहे. सदृढ, आत्मनिर्भर आणि स्वतंत्र भारताचे स्वप्न आहे. मानवता आणि विकासामध्ये विकसित देशासोबत आम्ही काम करु एकत्रित असू. 
 
पी व्ही नरसिंह राव : १८ मे १९९४ रोजी नरसिंह राव यांनी अमेरिकन सिनेटमध्ये भाषण केले, इतिहासात भारत आणि अमेरिकाने एकमेकांकडून खुप काही शिकले आहे. विचारांचे आदान प्रदान करताना दोन्ही देशातील अंतराचा आपल्यावर कोणताच परिणाम पडत नाही कारण याचे माध्यम हे आपल्या मस्तिष्क(मेंदू)पासून आहे. पुढील दशकापर्यंत भारत जागतिक शांती आणि समृद्धीसाठी तयार असेल. आणि यासाठी आम्ही अमेरिका आणि अमेरिकन नागरीकींच्या सोबतच असू. १९९१ - ९६ दरम्यान त्यांनी भारताचे पंतप्रधानपद भूषवले. नरसिंहराव यांच्यानंतर भारतातील आर्थिकेचा स्थर सुधारला गेला.भारत आणि अमेरिकेच्या मैत्रीचा नवा अध्यायासही सुरुवात झाली. 
 
अटल बिहारी वाजपेयी : १४ सप्टेंबर २००० रोजी भारतीय पंतप्रधान वाजपेयी यांनी अमेरिकन सिनेटमध्ये आपले भाषण दिले. त्यावेळी त्यांनी भारताबरोबरच आशिया खंडातील शांततेविशयक मुद्यावर जोर दिला. ते म्हणाले. जर आपण लोकशाही समृद्ध, सहनशील, बहुलवादी आणि स्थिर आशिया पाहिजे असेल जिथे आपण सर्वजनांना सुरक्षित वाटावे असे वाटत असेल तर आपल्याला जुन्या विचारांना नव्या ढंगात पद्धित वापर केला पाहिजे. ऐणाऱ्या कालखंडात लोकशाही आणि आणिक स्थरने भारताशिवाय आशियाचा विचारदेखिल करता येणार नाही. वाजपेयी अमेरिकेत जाण्यापुर्वी भारताकडे अण्वस्त्र उपलब्ध झाले होते. 
डॉ मनमोहन सिंह :  जुलै २००५ रोजी मनमोहन सिंह यांनी अमेरिकन सिनेटमध्ये भारताचा डंका बजावला होता. २००० नंतर भारतासह अमेरिकाही त्यावेळी दहशतवादाच्या गंभीर समस्सेला सामोर जात होता. त्यावेळी मनमोहन यांनी याच मुद्दयावर सिनेमध्ये जोरदार भाष्य केलं होत. त्यावेळी ते म्हणाले होते, भारत आणि अमेरिकेला मिळून दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करायला पाहिजे, दहशतवाद मुळापासून संपण्यासाठी एकत्रत लढ्याची गरज आहे. दहशतवादास आपण वेगवेगळ्या दृष्टीकोनातून न पाहता त्यांच्या सरवांचा पाहण्याचा दृष्टीकोन एकच हवा. दहशतवादाच मुळे जिथे असेल तिथून त्याचा नायनाट करायला हवा. दहशतवातामुळे लोकशाहीला धोका होऊ शकतो, अमेरिकेमध्ये झालेल्या ९/११च्या दहशतवादी हल्ल्यामुळे मनमोन सिंह यांचे भाषण अधिक प्रभावी झाले होते.