शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवर राहुल गांधी नाराज, म्हणाले- 'मध्यरात्रीच्या घाई-घाईत...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 15:32 IST

Rahul Gandhi: राहुल गांधींनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केला आहे.

CEC selection: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले. तसचे, निवडणूक आयोगाच्या स्वातंत्र्य आणि पारदर्शकतेवर शंका उपस्थित केली. त्यांनी 'एक्स' वर एका पोस्टद्वारे केंद्र सरकार निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेत हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला आणि अशी पावले भारतीय लोकशाहीची ताकद कमकुवत करू शकतात, असेही म्हटले.

राहुल गांधी म्हणाले, निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित समितीच्या बैठकीत पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना एक नोट दिली होती. यात त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य, विशेषत: निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीची प्रक्रिया सरकारी हस्तक्षेपापासून मुक्त असली पाहिजे.

मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून सरन्यायाधीशांना या निवड समितीतून काढून टाकल्याचा दावाही राहुल गांधी यांनी केला. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत मतदारांच्या मनात चिंता वाढली आहे. हे सरकारचे जबाबदारीपासून पळ काढणारे आणि लोकशाही संस्थांच्या आदराचे उल्लंघन आहे, असेही ते म्हणाले.

बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या देशाचे संस्थापक नेते यांच्या आदर्शांचे पालन करून सरकारला जबाबदार धरणे हे विरोधी पक्षनेते (LoP) या नात्याने आपले कर्तव्य आहे, असेही राहुल गांधींनी स्पष्ट केले. या संपूर्ण प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून, 48 तासांत त्यावर सुनावणी होणार आहे. अशा स्थितीत पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी मध्यरात्री निवडणूक आयुक्तांच्या निवडीबाबत निर्णय घेणे अयोग्य असल्याची टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी