शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवर राहुल गांधी नाराज, म्हणाले- 'मध्यरात्रीच्या घाई-घाईत...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 15:32 IST

Rahul Gandhi: राहुल गांधींनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केला आहे.

CEC selection: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले. तसचे, निवडणूक आयोगाच्या स्वातंत्र्य आणि पारदर्शकतेवर शंका उपस्थित केली. त्यांनी 'एक्स' वर एका पोस्टद्वारे केंद्र सरकार निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेत हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला आणि अशी पावले भारतीय लोकशाहीची ताकद कमकुवत करू शकतात, असेही म्हटले.

राहुल गांधी म्हणाले, निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित समितीच्या बैठकीत पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना एक नोट दिली होती. यात त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य, विशेषत: निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीची प्रक्रिया सरकारी हस्तक्षेपापासून मुक्त असली पाहिजे.

मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून सरन्यायाधीशांना या निवड समितीतून काढून टाकल्याचा दावाही राहुल गांधी यांनी केला. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत मतदारांच्या मनात चिंता वाढली आहे. हे सरकारचे जबाबदारीपासून पळ काढणारे आणि लोकशाही संस्थांच्या आदराचे उल्लंघन आहे, असेही ते म्हणाले.

बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या देशाचे संस्थापक नेते यांच्या आदर्शांचे पालन करून सरकारला जबाबदार धरणे हे विरोधी पक्षनेते (LoP) या नात्याने आपले कर्तव्य आहे, असेही राहुल गांधींनी स्पष्ट केले. या संपूर्ण प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून, 48 तासांत त्यावर सुनावणी होणार आहे. अशा स्थितीत पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी मध्यरात्री निवडणूक आयुक्तांच्या निवडीबाबत निर्णय घेणे अयोग्य असल्याची टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी