शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

सुषमा स्वराज यांना भेटताच हमीदच्या अश्रूंना फुटला बांध, आई म्हणाली मेरा भारत महान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 14:43 IST

प्रेमाच्या शोधात पाकिस्तानमध्ये जाऊन तेथील तुरुंगात अडकून पडलेला हमीद निहाल अन्सारी हा अखेर मंगळवारी मायदेशी परतला.

नवी दिल्ली - प्रेमाच्या शोधात पाकिस्तानमध्ये जाऊन तेथील तुरुंगात अडकून पडलेला हमीद निहाल अन्सारी हा अखेर मंगळवारी मायदेशी परतला.हमीदला भारतात परत आणण्यामध्ये केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मोलाचा वाटा उचलला होता.  दरम्यान, हमीद अन्सारी याने आज सुषमा स्वराज यांची भेट घेतली. त्यावेळी त्याच्या भावनांचा बांध फुटला. सुषणा स्वराज यांना जवळ घेत हमीदने आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली. यावेळी हमीदच्या आईनेही सुषमा स्वराज यांचे आभार मानले. मेरा भारत महान असे त्या यावेळी म्हणाल्या.  हमीद निहाल अन्सारीला भारतात परत आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, यासाठी हमीदच्या कुटुंबीयांनी याआधीही सुषमा स्वराज यांची भेट घेतली होती. त्यावेळी सुषमा स्वराज यांची भेट घेतल्याने जो आत्मविश्वास निर्माण झाला. त्यावरून आपला मुलगा देशात परत येईल, असे वाटू लागले. असे हमीदच्या आईने सांगितले.  

पाकिस्तानमध्ये अडकून पडलेल्या हमीदबाबत सुषमा स्वराज यांना कळल्यानंतर त्यांनी हा प्रश्न पाकिस्तानसमोर उपस्थित केला. तसेच हमीद हा अवैधरीत्या पाकिस्तानमध्ये दाखल झाला असला तरी तो गुप्तहेर नसल्याचे दोन्ही देशातील अनेक व्यक्तींनी न्यायालयात सिद्ध केले. त्यानंतर हमीदच्या मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा झाला होता.  

दरम्यान, समाजमाध्यमाद्वारे प्रेम जुळलेल्या आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी पाकिस्तानात बेकायदेशीररित्या गेलेल्या हमीद निहाल अन्सारी या भारतीय तरुणाची मंगळवारी सहा वर्षांनी मुक्तता करण्यात आली. त्याला पाकिस्तानने मंगळवारी संध्याकाळी वाघा सीमेवर भारतीय अधिकाऱ्यांच्या हवाली केले गेले. वाघा सीमेवर भारत व पाकिस्तानी लष्करामध्ये दररोज संध्याकाळी बिटिंग द रिट्रीट हा सोहळा होतो. त्यावेळी दोन्ही बाजूला काही हजार प्रेक्षक तिथे जमा झालेले असतात. हा सोहळा संपल्यानंतर हमीद याला पाकिस्तानने भारताच्या ताब्यात दिले.

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराजIndiaभारतPakistanपाकिस्तान