शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
3
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
4
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
5
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
6
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
7
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
8
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
9
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
10
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
11
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
12
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
13
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
14
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
15
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
16
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
17
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
18
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
19
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
20
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय क्षेपणास्त्र हद्दीत घुसूनही पाकिस्ताननं का नाही पाडलं? जाणून घ्या इंटरेस्टिंग उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 15:05 IST

आमच्या हद्दीत घुसलेल्या भारतीय क्षेपणास्त्रावर आम्ही नजर ठेऊन होतो, असं पाकिस्ताननं सांगितलं.. नजर ठेवली होती, मग क्षेपणास्त्र कोसळण्याआधीच नष्ट का केलं नाही, असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

नवी दिल्ली: भारताचं सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र गेल्याच आठवड्यात पाकिस्तानच्या हद्दीत कोसळलं. क्षेपणास्त्र कोसळल्यानंतर पाकिस्ताननं संताप व्यक्त केला. संयुक्त चौकशीची मागणी केली. संयुक्त राष्ट्रात धाव घेतली. नियमित देखभाल सुरू असताना क्षेपणास्त्र चुकून डागलं गेल्याचं भारताकडून सांगण्यात आलं. याबद्दल भारतानं खेद व्यक्त केला. मात्र या क्षेपणास्त्रामुळे पाकिस्तानात मोठा गोंधळ झाला आहे. कारण या घटनेनं पाकिस्तानच्या हवाई सुरक्षा यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.

भारताचं क्षेपणास्त्र ९ मार्चला पाकिस्तानात १२४ किलोमीटर अंतरावर कोसळलं. यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. एका गोदामाचं नुकसान झालं. या घटनेमुळे पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचं उल्लंघन झाल्याचं पाकिस्ताननं म्हटलं. आम्ही क्षेपणास्त्र येत असताना पाहिलं. क्षेपणास्त्र कोसळल्यानंतर आम्हीदेखील प्रत्युत्तराराखल क्षेपणास्त्र डागू शकलो असतो. पण आम्ही संयम बाळगला, असं पाकिस्ताननं सांगितलं. 

भारतीय क्षेपणास्त्र आपल्या हद्दीत येत असल्याचं आम्ही पाहिलं होतं, असं पाकिस्तानकडून सांगण्यात आलं. मग ते वेळीच हवेतच का नष्ट करण्यात का आलं नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेमुळे पाकिस्तानच्या हवाई सुरक्षा प्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कोसळलेलं क्षेपणास्त्र ब्रह्मोस होतं की इतर कोणतं याचंही उत्तर पाकिस्तानकडे नाही.

पाकिस्तानी हवाई दल योग्य वेळी कारवाई करण्यात अपयशी ठरण्याची ही काही पहिली वेळ नाही. १९८१ पासून २००६ पर्यंत भारतीय हवाई दल सातत्यानं पाकिस्तानची हेरगिरी केली. त्यासाठी रशियन बनावटीचं मिग-२५ विमान वापरण्यात आलं. जगातील सर्वाधिक वेगवान लढाऊ विमान भारतानं हेरगिरीसाठी वापरलं. या मिशनची वाच्यता कुठेही करण्यात आली नव्हती, असं युरेशियन टाईम्सनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

पाकिस्तान सैन्य आणि सरकारला मिग-२५ च्या हालचालींची कल्पना होती. मात्र सुपरसॉनिक वेगानं उडणाऱ्या विमानाला रोखण्यात पाकिस्तान हवाई सैन्य अपयशी ठरतं हे नागरिकांना समजून देशाची इभ्रत जाऊ नये यासाठी हवाई दल आणि सरकारनं मौन बाळगणं पसंत केलं. मिग-२५ विमान पाकिस्तानच्या भूमीपासून ६५ हजार ८५ हजार फूट उंचावर होतं. जवळपास ३५०० किलोमीटर प्रति तास वेगानं मिग-२५ उडत होतं. पाकिस्तानकडे असलेलं सर्वोत्तम विमान एफ-१६ ५० हजार फूटांच्या वर उडू शकत नाही.

मे १९९७ मध्ये पाकिस्तानी जनतेला पहिल्यांदा याची माहिती मिळाली. मिग-२५ इस्लामाबादवरून जात असताना सोनिक बूम (बॉम्बस्फोटासारखा आवाज) ऐकू आला. तेव्हादेखील मिग-२५ हेरगिरीच करत होतं. पाकिस्तानच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या संरक्षण ठिकाणांचे फोटो मिग-२५ नं टिपले. त्याचवेळी अचानक ध्वनी नियंत्रण करणारी यंत्रणा फेल झाली आणि सोनिक बूम ऐकू आला. त्यामुळे लोक घाबरले. भारतीय विमानाला पिटाळून लावण्यासाठी पाकिस्ताननं अमेरिकेत तयार करण्यात आलेली एफ-१६ विमानं पाठवली. मात्र पाकिस्तानच्या पदरी अपयश आलं.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानBrahmos Missileब्राह्मोसindian air forceभारतीय हवाई दल