शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
3
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
4
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
5
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
6
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
7
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
10
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
12
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
13
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
14
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
15
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
16
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
17
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
18
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
19
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
20
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  

CoronaVirus News: भारतीय कामगारांची नोकरी गेली, बचतही संपली; मातृभूमीचं ऋण ओळखून ‘ती’ मदतीला धावली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 08:37 IST

गेली 25 वर्षं शीला थॉमस यूएईमध्ये आहेत. पण, भारताशी त्यांची नाळ जोडलेली आहे. नोकरी गेल्यामुळे आणि लॉकडाऊन काळात बचत खर्च झाल्यामुळे अनेक कामगारांकडे पुरेसे पैसेही नाहीत. या कामगारांना शीला थॉमस यांचा मोठा आधार वाटतोय.

ठळक मुद्देकोरोना संकटामुळे यूएईमध्ये अडकले हजारो भारतीय कामगारअडकलेल्या कामगारांना मायदेशी पाठवण्यासाठी मोलाची मदत करताहेत शीला थॉमसपरक्या देशात अडकलेल्या कामगारांना वाटतोय थॉमस यांचा मोठा आधार

कोरोना काळात अनेक कंपन्या, उद्योग बंद झाल्यामुळे लाखो कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये हजारो भारतीय कामगारांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. हातावर पोट असलेल्या या कामगारांकडे मायदेशी परतण्यावाचून काहीच पर्याय नाही. अशा परिस्थितीत, भारतीय महिला वकील त्यांच्या मदतीला धावून आल्या आहेत. त्यांचं नाव आहे, शीला थॉमस.

तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांमधील २,२०० कामगारांना पुन्हा भारतात जाता यावं, यासाठी आवश्यक असलेली सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्या मदत करत आहेत. विशेष म्हणजे, या कामासाठी त्या कुठलंही शुल्क आकारत नाहीत. उलट, रोज ३०० जणांच्या जेवणाची व्यवस्था त्यांनी केली आहे. यूएईमधील एका मोठ्या वृत्तपत्रानं शीला थॉमस यांच्या कामाची बातमी दिली आहे. ‘‘अनेकांच्या व्हिसाची मुदत संपली आहे. अनेकांचे पासपोर्ट त्यांच्या कंपनीकडे आहेत. वेगवेगळी कारणं सांगून ते पासपोर्ट परत द्यायला टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे मीच आता या सर्व कामगारांना आवश्यक कागदपत्रं मिळवून देण्याची जबाबदारी घेतली आहे’’, असे यांनी सांगितले.

शीला थॉमस या मूळच्या केरळच्या. हैदराबाद येथे त्यांचे बालपण गेले. गेली 25 वर्षं त्या यूएईमध्ये आहेत. पण, भारताशी त्यांची नाळ जोडलेली आहे. नोकरी गेल्यामुळे आणि लॉकडाऊन काळात बचत खर्च झाल्यामुळे अनेक कामगारांकडे पुरेसे पैसेही नाहीत. या कामगारांना शीला थॉमस यांचा मोठा आधार वाटतोय. त्यांचा मोबाईल नंबर यूएईमधील भारतीय कामगारांच्या वर्तुळात व्हायरल झाला आहे. त्यामुळे गरजू व्यक्ती त्यांना फोन करून मदत मागत आहेत आणि त्याही कुणालाच नकार देत नाहीत.

यूएई आणि किर्गिस्तानात अडकलेले 300हून अधिक लोक भारतात परतले! कोरोनामुळे यूएई आणि किर्गिस्तानमध्ये अडकलेले एकूण 306 भारतीय नागरिक गुरुवारी भारतात परतले. दोन वेगवेगळ्या कंपन्यांची विमाने यांना घेऊन इंदूरच्या देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळांवर पोहोचली. यात यूएईमध्ये अडकलेल्या 158 जणांचा समावेश होता. यात मध्य प्रदेश, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्रातीलही नागरिक होते.

यूएईमध्ये अडकलेले कर्नाटकातील 173 नागरिक 21 जूनला एका चार्टर्ड विमानाने मेंगळुरू येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. यासाठी केएससीसीने चार्टड विमानाची व्यवस्था केली होती. 

यूएईच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी तेथे 410 नवे कोरोना रुग्ण आढळले होते. आतापर्यंत येथे 46,973 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 35,469 जण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. येथे कोरोनावर मात करून घरी परतणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. 

Disclaimer: ‘फेसबुकने या उपक्रमासाठी आमच्यासोबत भागीदारी केली आहे, मात्र या मजकुरावर त्यांचं कुठलंही संपादकीय नियंत्रण अथवा प्रभाव नाही.’

टॅग्स :Positive on Coronaसकारात्मक कोरोना बातम्याcorona virusकोरोना वायरस बातम्या