शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: भारतीय कामगारांची नोकरी गेली, बचतही संपली; मातृभूमीचं ऋण ओळखून ‘ती’ मदतीला धावली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 08:37 IST

गेली 25 वर्षं शीला थॉमस यूएईमध्ये आहेत. पण, भारताशी त्यांची नाळ जोडलेली आहे. नोकरी गेल्यामुळे आणि लॉकडाऊन काळात बचत खर्च झाल्यामुळे अनेक कामगारांकडे पुरेसे पैसेही नाहीत. या कामगारांना शीला थॉमस यांचा मोठा आधार वाटतोय.

ठळक मुद्देकोरोना संकटामुळे यूएईमध्ये अडकले हजारो भारतीय कामगारअडकलेल्या कामगारांना मायदेशी पाठवण्यासाठी मोलाची मदत करताहेत शीला थॉमसपरक्या देशात अडकलेल्या कामगारांना वाटतोय थॉमस यांचा मोठा आधार

कोरोना काळात अनेक कंपन्या, उद्योग बंद झाल्यामुळे लाखो कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये हजारो भारतीय कामगारांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. हातावर पोट असलेल्या या कामगारांकडे मायदेशी परतण्यावाचून काहीच पर्याय नाही. अशा परिस्थितीत, भारतीय महिला वकील त्यांच्या मदतीला धावून आल्या आहेत. त्यांचं नाव आहे, शीला थॉमस.

तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांमधील २,२०० कामगारांना पुन्हा भारतात जाता यावं, यासाठी आवश्यक असलेली सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्या मदत करत आहेत. विशेष म्हणजे, या कामासाठी त्या कुठलंही शुल्क आकारत नाहीत. उलट, रोज ३०० जणांच्या जेवणाची व्यवस्था त्यांनी केली आहे. यूएईमधील एका मोठ्या वृत्तपत्रानं शीला थॉमस यांच्या कामाची बातमी दिली आहे. ‘‘अनेकांच्या व्हिसाची मुदत संपली आहे. अनेकांचे पासपोर्ट त्यांच्या कंपनीकडे आहेत. वेगवेगळी कारणं सांगून ते पासपोर्ट परत द्यायला टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे मीच आता या सर्व कामगारांना आवश्यक कागदपत्रं मिळवून देण्याची जबाबदारी घेतली आहे’’, असे यांनी सांगितले.

शीला थॉमस या मूळच्या केरळच्या. हैदराबाद येथे त्यांचे बालपण गेले. गेली 25 वर्षं त्या यूएईमध्ये आहेत. पण, भारताशी त्यांची नाळ जोडलेली आहे. नोकरी गेल्यामुळे आणि लॉकडाऊन काळात बचत खर्च झाल्यामुळे अनेक कामगारांकडे पुरेसे पैसेही नाहीत. या कामगारांना शीला थॉमस यांचा मोठा आधार वाटतोय. त्यांचा मोबाईल नंबर यूएईमधील भारतीय कामगारांच्या वर्तुळात व्हायरल झाला आहे. त्यामुळे गरजू व्यक्ती त्यांना फोन करून मदत मागत आहेत आणि त्याही कुणालाच नकार देत नाहीत.

यूएई आणि किर्गिस्तानात अडकलेले 300हून अधिक लोक भारतात परतले! कोरोनामुळे यूएई आणि किर्गिस्तानमध्ये अडकलेले एकूण 306 भारतीय नागरिक गुरुवारी भारतात परतले. दोन वेगवेगळ्या कंपन्यांची विमाने यांना घेऊन इंदूरच्या देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळांवर पोहोचली. यात यूएईमध्ये अडकलेल्या 158 जणांचा समावेश होता. यात मध्य प्रदेश, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्रातीलही नागरिक होते.

यूएईमध्ये अडकलेले कर्नाटकातील 173 नागरिक 21 जूनला एका चार्टर्ड विमानाने मेंगळुरू येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. यासाठी केएससीसीने चार्टड विमानाची व्यवस्था केली होती. 

यूएईच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी तेथे 410 नवे कोरोना रुग्ण आढळले होते. आतापर्यंत येथे 46,973 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 35,469 जण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. येथे कोरोनावर मात करून घरी परतणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. 

Disclaimer: ‘फेसबुकने या उपक्रमासाठी आमच्यासोबत भागीदारी केली आहे, मात्र या मजकुरावर त्यांचं कुठलंही संपादकीय नियंत्रण अथवा प्रभाव नाही.’

टॅग्स :Positive on Coronaसकारात्मक कोरोना बातम्याcorona virusकोरोना वायरस बातम्या