शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

भारत सरकार एक्शन मोडमध्ये, जर्मनीवर वाढवला दबाव; चिमुरडी आईवडिलांना परत मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 14:46 IST

मुलीला जर्मन पालनपोषणात ठेवणे तिच्या सांस्कृतिक अधिकारांचे आणि भारतीय म्हणून तिच्या अधिकारांचे उल्लंघन आहे असं भारताने स्पष्ट सांगितले आहे.

नवी दिल्ली – जर्मनीत गेल्या २२ महिन्यांपासून अडकलेल्या बेबी अरिहा शाह प्रकरणात मोदी सरकार एक्शन मोडमध्ये आली आहे. भारताने या आठवड्यात जर्मन राजदूत फिलिप एकरमॅन यांना पाचारण केले. मुलीला लवकर मायदेशी आणा असं सांगितले. ही मुलगी बर्लिनमध्ये एका फोस्टर केअर सेंटरमध्ये आहे. मुलीच्या आई वडिलांवर क्रूरतेचा आरोप करत या मुलीला कस्टडीत पाठवले. तेव्हापासून मुलीची सुटका व्हावी यासाठी आई वडील विनवणी करत आहेत. क्रूरतेचा आरोप चुकीचा आढळला तरी मुलीला परत केले जात नाही असा आक्रोश तिचे पालक करत आहेत.

ही बाब २३ सप्टेंबर २०२१ ची आहे. अरिहा शाह अवघ्या सात महिन्यांची असताना तिला अपघाती दुखापत झाली होती, त्यानंतर आई धारा शाह मुलीला डॉक्टरांकडे घेऊन गेली. तेथे डॉक्टरांनी चाइल्ड केअर सर्व्हिसला फोन करून बोलावून मुलीला त्यांच्याकडे सोपवले. अरिहा आता २९ महिन्यांची आहे आणि ती २२ महिन्यांपासून जर्मनीच्या फॉस्टर केअरच्या ताब्यात आहे.

भारत सरकार काय म्हणाले?

फॉस्टर केअरमध्ये मुलांना काळजीच्या उद्देशाने ठेवले जाते. मात्र परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, या आठवड्याच्या सुरुवातीला जर्मनीचे राजदूत एकरमॅन यांना बोलावण्यात आले होते आणि अरिहाबाबत भारताच्या चिंता त्यांना स्पष्टपणे कळविण्यात आल्या होत्या. मुलीसाठी तिच्या भाषिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरणात जगणे महत्त्वाचे आहे. आम्ही या विषयाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. मुलीला जर्मन पालनपोषणात ठेवणे तिच्या सांस्कृतिक अधिकारांचे आणि भारतीय म्हणून तिच्या अधिकारांचे उल्लंघन आहे असं भारताने स्पष्ट सांगितले आहे.

इतकेच नाही तर भारताने जर्मनीवर दबाव वाढवला आहे. मुलीला लवकरच भारतात आणावे यासाठी भारताने सांगितले आहे. मुलीच्या भारतीय पालकांनी तिचा छळ केल्याचा आरोप करत जर्मन अधिकाऱ्यांनी मुलीला या केअर सेंटरमध्ये ठेवले. परराष्ट्र मंत्रालय आणि बर्लिनमधील भारतीय दूतावास अरिहा शाहच्या भारतात परत येण्यासाठी सातत्याने दबाव वाढवत आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

अहमदाबादचे रहिवासी भावेश शाह आणि धारा वर्क व्हिसावर जर्मनीतील बर्लिन येथे गेले होते. तिकडे अरिहाच्या प्रायव्हेट पार्टला दुखापत झाल्याने आणि जेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये नेले तेव्हा तिच्या पालकांनी लैंगिक छळाचा आरोप केल्याने या गुजराती कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाला. प्रशासनाने अरिहाला फॉस्टर केअर सेंटरला पाठवले. सप्टेंबर २०२१ पासून हे कुटुंब अरिहाच्या ताब्यासाठी कायदेशीर लढाई लढत आहे. डॉक्टरांना अरिहाच्या डायपरवर रक्त आढळले होते.

दोन वर्षांनंतर कुटुंबाचा ताबा सुटणार का?

अरिहाची आई धारा सांगते की, या वर्षी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस अरिहाला फॉस्टर केअर सेंटरमध्ये दोन वर्षे पूर्ण होतील. जर्मन सरकारच्या नियमांनुसार, जर एखादे मूल दोन वर्षांपासून केअर सेंटरमध्ये राहत असेल, तर ते मूल त्याच्या पालकांकडे परत दिले जात नाही. अशा परिस्थितीत मुलीच्या परत येण्यावर संकट येणार आहे. अनेक भारतीय पालकांना या आरोपांना सामोरे जावे लागले आहे आणि मुलांना त्यांच्या ताब्यातून काढून टाकण्यात आले आहे. प्रत्येक वेळी देशाच्या पंतप्रधानांनी हस्तक्षेप करून आपल्या समकक्षांशी चर्चा केली तर मदत होते असं मुलीच्या आईने सांगत पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींकडे विनवणी केली आहे.

टॅग्स :IndiaभारतGermanyजर्मनी