शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नुकसान सोसू, पण पाकिस्तानला माल पाठवणार नाही; शेतकऱ्यांचा सर्जिकल स्ट्राइक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 16:37 IST

शेतकऱ्यांची आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तानात टंचाई

भोपाळ: पुलवामातील दहशतवादी हल्ल्याला दहापेक्षा अधिक दिवस झाले आहेत. मात्र अद्याप या हल्ल्याच्या जखमा ताज्या आहेत. देशवासीयांचा आक्रोश जराही कमी झालेला नाही. पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी कायम आहे. मोदी सरकारनं पाकिस्तानची आर्थिक कोंडी सुरू केली आहे. यामध्ये मध्य प्रदेशमधले शेतकरीदेखील मागे नाहीत. छतरपूरमधून पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात नागवेलीच्या पानांची निर्यात होते. मात्र पुलवामातील हल्ल्यानंतर शेतकऱ्यांनी पानांचा पुरवठा रोखला आहे. पाकिस्तानला पानं पाठवणार नाही, असा ठाम पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानात पानांची टंचाई जाणवू लागली आहे.व्यापाऱ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत प्रत्येक जण पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या प्रयत्नात आहे. छतरपूर जिल्ह्यातील गढिमलहरा, महाराजपूर, पिपट, पनागर आणि महोबामध्ये मोठ्या प्रमाणात नागवेलीचं (पानवेल) उत्पादन होतं. या भागातून देशाच्या अनेक शहरांमध्ये पानांचा पुरवठा केला जातो. याशिवाय पाकिस्तान, श्रीलंकेतखील पानांची निर्यात होते. मात्र सध्या पाकिस्तानात होणारी निर्यात शेतकऱ्यांनी थांबवली आहे. पुलवामा हल्ल्यामुळे शेतकरी अतिशय संतप्त आहेत. 'दहशतवाद्यांमुळे आमच्या जवानांचं रक्त सांडलं आहे. त्यामुळे आम्ही पाकिस्तानला पानांची निर्यात करणार नाही. यामुळे आम्हाला नुकसान सोसावं लागलं तरी चालेल,' असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. छतरपूरमधील पानं मेरठ आणि शहारंगपूरहून पाकिस्तानला निर्याम केला जातात. आठवड्यातून तीन दिवस पानाची 45 ते 50 बंडलं पाकिस्तानला पाठवली जातात. एका बंडलची किंमत 30 हजार रुपये असते. पाकिस्तानला पानं न पाठवण्याचा निर्णय घेतल्यानं शेतकऱ्यांचं 13 ते 15 लाखांचं नुकसान होत आहे. मात्र आम्हाला फायदा-तोट्याची चिंता नाही, अशी स्पष्ट भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. भारत सरकार पानी रोखण्यासारखा मोठा निर्णय घेऊ शकतं. तर आम्ही देशासाठी, जवानांसाठी इतकं नक्कीच करु शकतो, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.  

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाFarmerशेतकरीPakistanपाकिस्तान