शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

नुकसान सोसू, पण पाकिस्तानला माल पाठवणार नाही; शेतकऱ्यांचा सर्जिकल स्ट्राइक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 16:37 IST

शेतकऱ्यांची आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तानात टंचाई

भोपाळ: पुलवामातील दहशतवादी हल्ल्याला दहापेक्षा अधिक दिवस झाले आहेत. मात्र अद्याप या हल्ल्याच्या जखमा ताज्या आहेत. देशवासीयांचा आक्रोश जराही कमी झालेला नाही. पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी कायम आहे. मोदी सरकारनं पाकिस्तानची आर्थिक कोंडी सुरू केली आहे. यामध्ये मध्य प्रदेशमधले शेतकरीदेखील मागे नाहीत. छतरपूरमधून पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात नागवेलीच्या पानांची निर्यात होते. मात्र पुलवामातील हल्ल्यानंतर शेतकऱ्यांनी पानांचा पुरवठा रोखला आहे. पाकिस्तानला पानं पाठवणार नाही, असा ठाम पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानात पानांची टंचाई जाणवू लागली आहे.व्यापाऱ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत प्रत्येक जण पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या प्रयत्नात आहे. छतरपूर जिल्ह्यातील गढिमलहरा, महाराजपूर, पिपट, पनागर आणि महोबामध्ये मोठ्या प्रमाणात नागवेलीचं (पानवेल) उत्पादन होतं. या भागातून देशाच्या अनेक शहरांमध्ये पानांचा पुरवठा केला जातो. याशिवाय पाकिस्तान, श्रीलंकेतखील पानांची निर्यात होते. मात्र सध्या पाकिस्तानात होणारी निर्यात शेतकऱ्यांनी थांबवली आहे. पुलवामा हल्ल्यामुळे शेतकरी अतिशय संतप्त आहेत. 'दहशतवाद्यांमुळे आमच्या जवानांचं रक्त सांडलं आहे. त्यामुळे आम्ही पाकिस्तानला पानांची निर्यात करणार नाही. यामुळे आम्हाला नुकसान सोसावं लागलं तरी चालेल,' असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. छतरपूरमधील पानं मेरठ आणि शहारंगपूरहून पाकिस्तानला निर्याम केला जातात. आठवड्यातून तीन दिवस पानाची 45 ते 50 बंडलं पाकिस्तानला पाठवली जातात. एका बंडलची किंमत 30 हजार रुपये असते. पाकिस्तानला पानं न पाठवण्याचा निर्णय घेतल्यानं शेतकऱ्यांचं 13 ते 15 लाखांचं नुकसान होत आहे. मात्र आम्हाला फायदा-तोट्याची चिंता नाही, अशी स्पष्ट भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. भारत सरकार पानी रोखण्यासारखा मोठा निर्णय घेऊ शकतं. तर आम्ही देशासाठी, जवानांसाठी इतकं नक्कीच करु शकतो, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.  

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाFarmerशेतकरीPakistanपाकिस्तान