शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

भारतीय अर्थव्यवस्था राहू शकेल लवचिक; परकीय गुंतवणूकदारांच्या आकर्षणाचे ठरले केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 23:50 IST

संयुक्त राष्ट्रांचा अंदाज : परकीय गुंतवणूकदारांच्या आकर्षणाचे ठरले केंद्र

संयुक्त राष्ट्रे : कोविडच्या प्रकोपानंतर भारतामध्ये कमी प्रमाणात का होईना पण आर्थिक वाढ होण्याची शक्यता असून मोठी बाजारपेठ असल्याने हा देश गुंतवणूकदारांचे आकर्षण राहण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन विचार करता दक्षिण तसेच नैऋत्य आशियामधील सर्वाधिक लवचिक अर्थव्यवस्था असा भारताचा लौकिक राहण्याची अपेक्षाही व्यक्त केली गेली आहे. 

‘आशिया आणि प्रशांत क्षेत्रामध्ये होत असलेली थेट परकीय गुंतवणूक ’ याबाबतच्या एका अहवालामध्ये वरील मत वर्तविण्यात आले आहे. या अहवालामध्ये सांगण्यात आले आहे की, सन २०१९मध्ये दक्षिण आणि नैऋत्य आशियामध्ये झालेल्या थेट परकीय गुंतवणुकीमध्ये २ टक्क्यांची घट झाली आहे. आधीच्या वर्षाशी तुलना करता ती १ अब्ज डॉलर कमी झाली. भारतामध्ये मात्र या काळामध्ये अन्य देशांपेक्षा अधिक प्रमाणामध्ये थेट परकीय गुंतवणूक (५१ अब्ज डॉलर) झालेली दिसून आली.

मागील वर्षापेक्षा ही गुंतवणूक २० टक्के अधिक झाली आहे.  यापैकी काही देशांमधून तर ही टक्केवारी ७७ टक्क्यांपर्यंत गेली असल्याचे अहवालामध्ये नमूद केले गेले आहे. भारतामध्ये आलेल्या परकीय गुंतवणुकीपैकी बहुतांश गुंतवणूक ही माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार आणि उत्पादन या क्षेत्रांमध्ये आली आहे. माहिती तंत्रज्ञानामध्ये स्थानिक संपन्न परिस्थितीचा लाभ मिळत असल्याने गुंतवणूक वाढत आहे. विशेष म्हणजे ई-कॉमर्सच्या क्षेत्रामध्येही भारतात मोठी गुंतवणूक आली आहे. 

दीर्घकालीन विचार करता भारतीय अर्थव्यवस्था ही या क्षेत्रामधील सर्वाधिक लवचिक अर्थव्यवस्था राहण्याचा अंदाज आहे. कोरोना पश्चातच्या काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ भलेही कमी राहिली तरी ती शाश्वत स्वरूपाची असेल, त्यामुळे भारतातील परकीय गुंतवणूक सुरुच राहील, असे मतही व्यक्त झाले आहे. 

टॅग्स :businessव्यवसाय