शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

बनावट कागदपत्रांच्या मदतीने रोहिंग्यांना दिलं जातंय भारतीय नागरिकत्व, घुसखोरीसाठी नेटवर्क सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 13:03 IST

बांगलादेश आणि म्यानमारमधील रोहिंग्याना भारतात घुसखोरी करता यावी यासाठी एक नेटवर्क सक्रिय आहे. गुवाहाटी आणि कोलकातामधील दलाल रोहिंग्यांना भारतात घुसखोरी करण्यासाठी मदत करत आहेत. इतकंच नाही तर रोहिंग्याकडे भारतीय नागरिकत्व असावं यासाठी त्यांना बनावट कागदपत्रंही उपलब्ध करुन दिली जात आहेत.

ठळक मुद्दे बांगलादेश आणि म्यानमारमधील रोहिंग्याना भारतात घुसखोरी करता यावी यासाठी एक नेटवर्क सक्रियकोलकातामधील दलाल रोहिंग्यांना भारतात घुसखोरी करण्यासाठी मदत करत आहेतभारतीय गुप्तचर यंत्रणांनी आपल्या रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे

नवी दिल्ली - बांगलादेश आणि म्यानमारमधील रोहिंग्याना भारतात घुसखोरी करता यावी यासाठी एक नेटवर्क सक्रिय आहे. गुवाहाटी आणि कोलकातामधील दलाल रोहिंग्यांना भारतात घुसखोरी करण्यासाठी मदत करत आहेत. इतकंच नाही तर रोहिंग्याकडे भारतीय नागरिकत्व असावं यासाठी त्यांना बनावट कागदपत्रंही उपलब्ध करुन दिली जात आहेत. काही रोहिंग्यांकडे तर बनावट भारतीय कागदपत्रं उपलब्ध आहेत. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी आपल्या रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे. इतकंच नाही तर भारतात घुसखोरी केल्यानंतर येथील मुस्लिम संघटनांनी मदत करावी यासाठी रोहिंग्या प्रयत्न करत आहेत. जेणेकरुन कोणीही त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही आणि देशाबाहेर काढणार नाही.    

गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह भारत - बांगलादेश सीमारेषा प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पश्चिम बंगालसहित पूर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. यावेळी रोहिंग्यांच्या घुसखोरीचा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे. कोलकातामध्ये घुसखोरी करण्यासाठी मदत करणा-या दलाल आणि एजंट्सच्या मुसक्या आवळण्यावरही यावेळी चर्चा केली जाईल. गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, हे दलाल बांगलादेशमधून घुसखोरी करण्यासाठी रोहिंग्यांना मदत करुन त्यांना झोपडपट्टी आणि भाड्याने घरं देण्यासाठी मदत करणार आहेत. यानंतर त्यांना देशातील इतर भागांमध्ये पाठवण्यात येईल. 

गृहमंत्रालयाच्या एका अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, 'भारत आणि बांगलादेशदरम्यान 4 हजार किमी लांब सीमारेषा आहे. यामधील 1900 किमी सीमारेषा बंगालला जोडून आहे. याठिकाणी दोन असे क्रॉसिंग पॉईंट्स आहेत जिथून घुसखोरी केली जाते. आणि यासाठी स्थानिक एजंट्स मदत करतात. स्थानिक पोलिसांनी याकडे गांभीर्याने पाहून कारवाई करणं गरजेचं आहे, कारण रोहिंग्या भविष्यात धोका ठरू शकतात. राजनाथ सिंह भारत-बांगलादेश बॉर्डर बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसमोर हा मुद्दा उपस्थित करणार आहेत'.

गुप्तचर यंत्रणांच्या अंदाजानुसार, संपुर्ण भारतात जवळपास 40 हजार रोहिंग्या बेकायदेशीरपणे वास्तव्य करत आहेत. यामधील 7096 लोक जम्मू काश्मीर, 3059 हैदराबाद, 1114 मेवाडमध्ये, 1200 लोक पश्चिम उत्तर प्रदेश आणि 1061 लोक दिल्लीत राहत आहेत. याशिवाय केरळ आणि तामिळनाडूतही रोहिंग्या वास्तव्य करत असल्याची माहिती आहे. जम्मू, हैदराबाद आणि अंदमान निकोबार बेटावरही ते राहत असल्याची माहिती असल्याचं एका अधिका-याने सांगितलं आहे.  

टॅग्स :Rohingyaरोहिंग्याRajnath Singhराजनाथ सिंह