शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

भारतीय बँकांमध्ये दर तासाला एक गैरव्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 08:49 IST

अहवालातून धक्कादायक माहिती समोर

गेल्या काही दिवसांमध्ये बँकांमधील अनेक घोटाळे उघडकीस आले. नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विक्रम कोठारी यांनी केलेली बँकांची फसवणूक गेल्या काही दिवसांमध्ये उजेडात आले. त्यामुळे बँकांमध्ये होणारे गैरव्यवहार एकापाठोपाठ समोर आले. बँकांमध्ये होणाऱ्या याच गैरव्यवहारांबद्दलचा एक अहवाल आता प्रसिद्ध झाला आहे. 2016 ते 2017 या आर्थिक वर्षात भारतीय बँकांमध्ये तब्बल 12,533 गैरव्यवहार घडल्याची आकडेवारी या अहवालातून समोर आली आहे. याची सरासरी काढल्यास भारतीय बँकांमध्ये गेल्या आर्थिक वर्षात दर तासाला एक घोटाळा झाला आहे.इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर अॅडव्हायझरी सर्व्हिसेसच्या अहवालातील आकडेवारीनुसार एप्रिल 2016 ते मार्च 2017 या कालावधीत भारतीय बँकांमध्ये 12,533 गैरव्यवहार झाले. यामुळे बँकांचे 18 हजार 170 कोटी रुपयांचे नुकसान झाले. अहवालातील आकडेवारीवर नजर टाकल्यास सर्वाधिक गैरव्यवहार बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये झाले. हा आकडा 3,893 इतका आहे. तर यानंतर आयसीआयसीआय (3,359) आणि एचडीएफसी (2,319) यांचा क्रमांक लागतो.  एप्रिल 2016 ते मार्च 2017 या कालावधीत झालेल्या गैरव्यवहारांमुळे सर्वाधिक नुकसान पंजाब नॅशनल बँकेचे झाले आहे. पंजाब नॅशनल बँकेला गेल्या आर्थिक वर्षात गैरव्यवहारांमुळे 2,810 कोटींचा फटका बसला आहे. पंजाब नॅशनल बँकेपाठोपाठ बँक ऑफ इंडिया (2,770 कोटी रुपये) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (2,420 कोटी रुपये) यांचा क्रमांक लागतो. 'व्यवस्थापन आणि कर्जदार यांच्यातील संगनमत, त्याकडे नियंत्रकाकडे होणारे दुर्लक्ष यामुळे बँकांमध्ये गैरव्यवहार होतात,' असे मत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी डेप्युटी गव्हर्नर के. सी. चक्रबर्ती यांनी म्हटले. 

टॅग्स :bankबँकPunjab National Bankपंजाब नॅशनल बँकPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळा