शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

भारताच्या तोफखान्यासमोर पाकिस्तान हतबल, रॉकेट हल्ल्यात सहा तळ उडवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 15:52 IST

नियंत्रण रेषेवर सुरु असलेल्या लढाईत भारतीय सैन्य वर्चस्व गाजवत असून भारतीय लष्कराच्या दणकेबाज कारवाईपुढे पाकिस्तानी सैन्य पुरते हतबल झाले आहे.

ठळक मुद्देसीमेपलीकडे सुरु असलेल्या घडामोडींवर भारतीय सैन्य दल बारीक लक्ष ठेऊन आहे. लष्कराच्या युनिटस पाकिस्तानी सैन्याच्या हालचालीवर लक्ष ठेऊन आहेत.

नवी दिल्ली - नियंत्रण रेषेवर सुरु असलेल्या लढाईत भारतीय सैन्य वर्चस्व गाजवत असून भारतीय लष्कराच्या दणकेबाज कारवाईपुढे पाकिस्तानी सैन्य पुरते हतबल झाले आहे. पाकिस्तानची बॉर्डर अॅक्शन टीम तसेच दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी मदत करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या चौक्या भारतीय लष्कराच्या रडारवर आहेत. मागच्या आठवडयाभरात भारतीय सैन्याने अशा सहा चौक्या उद्धवस्त केल्या आहेत. इंडिया टुडेेने हे वृत्त दिले आहे. 

सीमेपलीकडे सुरु असलेल्या घडामोडींवर भारतीय सैन्य दल बारीक लक्ष ठेऊन आहे. भारताविरोधात दहशतवाद्यांचा वापर करणाऱ्या पाकिस्तानी सैन्यावरच भारतीय लष्कराकडून कारवाई सुरु आहे. पाकिस्तानच्या प्रत्येक आगळीकीली त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले जात आहे. लष्कराच्या युनिटस पाकिस्तानी सैन्याच्या हालचालीवर लक्ष ठेऊन आहेत. भारतीय जवानांवर छुप्या हल्ल्यासाठी पाकिस्तानकडून बॅट फोर्सेसचा वापर केला जातो. गरज पडल्यास पाकिस्तानचा हल्ला परतवून लावण्यासाठी आवश्यक कारवाई केली जाईल असे सूत्रांनी सांगितले. 

चार दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या गोळीबारात बीएसएफचा जवान शहीद झाल्यानंतर भारताने उरी सेक्टरमध्ये प्रत्युत्तरादाखल जोरदार कारवाई केली. रामपूर,  हाजी पीर आणि लीपा व्हॅलीमधील पाच तळांवर भारतीय लष्कराने कारवाई केली. रॉकेट हल्ला करुन पाकिस्तानी तळ पूर्णपणे उखडून टाकले.  गेल्या काही दिवसांपासून या तळावर चालणाऱ्या पाकिस्तानी सैन्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात आले होते. अखेर संधी मिळताच कारवाई करण्यात आली.  

लष्कराच्या स्थानिक कमांडर्सना कारवाई करण्यासाठी पूर्णपणे स्वातंत्र्य देण्यात आले आहे असे 15 कॉपर्सचे कमांडर लेफ्टनंट जनरल अनिल भट्ट यांनी सांगितले. पहिल्या 55 दिवसात भारताच्या धडक कारवाईत 23 पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. भारतात घुसखोरी करण्यासाठी पीर पंजालच्या डोंगर रागांमध्ये 200 दहशतवादी दबा धरुन बसले आहेत अशी माहिती आहे.                            

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तान