शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'वो है गलवान के वीर…', गलवान खोऱ्यातील चकमकीतील शहिदांना भारतीय लष्कराकडून अनोखी श्रद्धांजली, पाहा जबरदस्त Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 19:14 IST

भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या  सैनिकांमध्ये गेल्या वर्षी याच दिवशी झालेल्या हिंसक हाणामारीत २० भारतीय जवान शहीद झाले होते.

भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या  सैनिकांमध्ये गेल्या वर्षी याच दिवशी झालेल्या हिंसक हाणामारीत २० भारतीय जवान शहीद झाले होते. गलवान खोऱ्यातील संघर्षात शहीद झालेल्या जवानांना भारतीय लष्कारानं एका खास गाण्याच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

गलवान खोऱ्यात १५ जून २०२० रोजी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित झडप झाली होती. यात भारताचे २० जवान शहीद झाले होते. तर चीनच्या सैन्यांचंही मोठं नुकसान झालं होतं. भारतीय जवानांनी चीनी सैनिकांना अद्दल घडवून एक इंचही जमीन बळकावू दिली नव्हती. भारतीय सैनिकांच्या आक्रमक भूमिकेपुढे चीनी सैनिकांना माघार घ्यावी लागली होती. याच चकमकीला आज १ वर्ष पूर्ण झालं. भारतीय लष्करानं गलवान खोऱ्यातील संघर्षात शहीद जवानांना समर्पित करणारं 'वो है गलवान के वीर...' गीत प्रदर्शित केलं आहे. 

गलवान खोऱ्यात मोठ्या अडचणींचा सामना करत भारतीय जवान सीमेवर मोठ्या साहसानं रक्षण करत आहेत असं या व्हिडिओतून दाखवण्यात आलं आहे. भारतीय जवानांचं साहस दाखवणाऱ्या या व्हिडिओतून प्रत्येक भारतीयाला आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटेल असाच हा दमदार व्हिडिओ आहे. 

नेमकं काय घडलं होतं?भारत आणि चीन दरम्यान लडाखमधील सीमावादाच्या पार्श्वभूमीवर ६ जून रोजी जनरल रँक स्तरावरील चर्चा झाली होती. त्यात दोन्ही देशांकडून सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यावर सहमती झाली होती. चर्चेत ठरल्याप्रमाणे चीनच्या सैनिकांना त्यांच्या सीमेत अडून मागे जाण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र, चर्चा करण्याऐवजी चीनने वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर १५ जूनच्या रात्री भारतीय सैनिक आणि चीनी सैनिकांमध्ये हिंसक झडप झाली. त्यावेळी चीनी सैनिकांच्या तुलनेत भारतीय सैनिकांची संख्या कमी होती. तरीही भारतीय सैनिकांनी चीनी सैनिकांचा हल्ला मोडून काढला आणि त्यांना मागे हटण्यास भाग पाडलं. या हल्ल्यात भारताचे २० जवान शहीद झाले होते. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानchinaचीन