शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

बिहारमध्ये 'अग्निपथ'चा तीव्र विरोध; 17 जिल्ह्यांमध्ये आंदोलन, 5 गाड्या जळाल्या; 2 आमदारांवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 16:15 IST

आंदोलकांनी अनेक ठिकाणी गाड्यांची जाळपोळ केली. याशिवाय, नवाडा येथील भाजप कार्यालय पेटवून देण्यात आले.

पाटणा: केंद्र सरकारच्या नवीन 'अग्निपथ' योजनेच्या निषेधार्थ बिहारमध्ये उग्र आंदोलन सूरू आहे. आंदोलकांनी छपरा, कैमूर आणि गोपालगंजमध्ये आतापर्यंत 5 गाड्या जाळल्या आहेत. एकट्या छपरामध्ये तीन गाड्या जाळण्यात आल्या आहेत. 12 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. प्रवाशांनी कसाबसा आपला जीव वाचवला. 

आमदारांवर हल्लाआंदोलनादरम्यान भाजपच्या दोन आमदारांवरही हल्ला करण्यात आला. आंदोलकांनी छपरा सदर येथील भाजप आमदार डॉ. सीएन गुप्ता यांच्या घराची तोडफोड केली. त्याचवेळी वारिसलीगंजच्या आमदार अरुणा देवी यांच्यावरही हल्ला करण्यात आला. आंदोलकांनी नवाडा येथील भाजप कार्यालयाला आग लावली. संतप्त युवक केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत आहेत. आंदोलनामुळे रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अराहमध्ये पोलिसांना हल्लेखोरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.

17 जिल्ह्यांत उग्र निदर्शनेगुरुवारी जेहानाबाद, बक्सर आणि नवादा येथे रेल्वे थांबवण्यात आली. छपरा आणि मुंगेरमध्ये रस्ता जाळपोळीनंतर उग्र निदर्शने सुरू आहेत. सरकारने निर्णय मागे घ्यावा, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. यासंदर्भात बिहारमधील 17 जिल्ह्यांमध्ये निदर्शने करण्यात येत आहे. वारिसलीगंजच्या आमदार अरुणा देवी यांच्यावर नवाडा येथे आंदोलकांनी हल्ला केला. हल्ल्यावेळी आमदार गाडीत उपस्थित होत्या. 

गोपालगंजमध्ये पॅसेंजर ट्रेनला आगआंदोलकांनी गोपालगंजमधील सिधवालिया रेल्वे स्थानकावर पॅसेंजर ट्रेन पेटवून दिली. ट्रेनच्या अनेक बोगी पेटवण्यात आल्या. रेल्वे स्थानकावर असलेल्या ट्रेनमधील प्रवाशांनी कसेतरी पळून आपला जीव वाचवला. तिकडे, जेहानाबादमध्ये विद्यार्थ्यांनी पाटणा-गया रेल्वे मार्गाला लक्ष्य केले आणि पाटणा-गया मेमू पॅसेंजर ट्रेन जेहानाबाद स्टेशनजवळ थांबवली. शहरातील स्टेशन परिसरातील काको मोरजवळ विद्यार्थ्यांनी जाळपोळ करून रास्ता रोको केला. बक्सरमध्येही मोठ्या संख्येने आंदोलक किल्ला मैदानाच्या रस्त्यावर उतरले. बक्सर स्थानकाशिवाय चौसा, डुमराव, रघुनाथपूर स्थानकांजवळही रेल्वे मार्ग रोखण्यात आला आहे.

तिन्ही सेवांमध्ये 4 वर्षांची भरती योजनालष्कर, नौदल आणि हवाई दल या तीनही दलांत मोठ्या संख्येने तरुणांची भरती करण्यासाठी केंद्र सरकारने 14 जून रोजी अग्निपथ भरती योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत तरुणांना संरक्षण दलात 4 वर्षे सेवा करावी लागणार आहे. पगार आणि पेन्शनचे बजेट कमी करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे. 

टॅग्स :BiharबिहारDefenceसंरक्षण विभागIndian Armyभारतीय जवानindian navyभारतीय नौदलindian air forceभारतीय हवाई दल