शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये 'अग्निपथ'चा तीव्र विरोध; 17 जिल्ह्यांमध्ये आंदोलन, 5 गाड्या जळाल्या; 2 आमदारांवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 16:15 IST

आंदोलकांनी अनेक ठिकाणी गाड्यांची जाळपोळ केली. याशिवाय, नवाडा येथील भाजप कार्यालय पेटवून देण्यात आले.

पाटणा: केंद्र सरकारच्या नवीन 'अग्निपथ' योजनेच्या निषेधार्थ बिहारमध्ये उग्र आंदोलन सूरू आहे. आंदोलकांनी छपरा, कैमूर आणि गोपालगंजमध्ये आतापर्यंत 5 गाड्या जाळल्या आहेत. एकट्या छपरामध्ये तीन गाड्या जाळण्यात आल्या आहेत. 12 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. प्रवाशांनी कसाबसा आपला जीव वाचवला. 

आमदारांवर हल्लाआंदोलनादरम्यान भाजपच्या दोन आमदारांवरही हल्ला करण्यात आला. आंदोलकांनी छपरा सदर येथील भाजप आमदार डॉ. सीएन गुप्ता यांच्या घराची तोडफोड केली. त्याचवेळी वारिसलीगंजच्या आमदार अरुणा देवी यांच्यावरही हल्ला करण्यात आला. आंदोलकांनी नवाडा येथील भाजप कार्यालयाला आग लावली. संतप्त युवक केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत आहेत. आंदोलनामुळे रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अराहमध्ये पोलिसांना हल्लेखोरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.

17 जिल्ह्यांत उग्र निदर्शनेगुरुवारी जेहानाबाद, बक्सर आणि नवादा येथे रेल्वे थांबवण्यात आली. छपरा आणि मुंगेरमध्ये रस्ता जाळपोळीनंतर उग्र निदर्शने सुरू आहेत. सरकारने निर्णय मागे घ्यावा, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. यासंदर्भात बिहारमधील 17 जिल्ह्यांमध्ये निदर्शने करण्यात येत आहे. वारिसलीगंजच्या आमदार अरुणा देवी यांच्यावर नवाडा येथे आंदोलकांनी हल्ला केला. हल्ल्यावेळी आमदार गाडीत उपस्थित होत्या. 

गोपालगंजमध्ये पॅसेंजर ट्रेनला आगआंदोलकांनी गोपालगंजमधील सिधवालिया रेल्वे स्थानकावर पॅसेंजर ट्रेन पेटवून दिली. ट्रेनच्या अनेक बोगी पेटवण्यात आल्या. रेल्वे स्थानकावर असलेल्या ट्रेनमधील प्रवाशांनी कसेतरी पळून आपला जीव वाचवला. तिकडे, जेहानाबादमध्ये विद्यार्थ्यांनी पाटणा-गया रेल्वे मार्गाला लक्ष्य केले आणि पाटणा-गया मेमू पॅसेंजर ट्रेन जेहानाबाद स्टेशनजवळ थांबवली. शहरातील स्टेशन परिसरातील काको मोरजवळ विद्यार्थ्यांनी जाळपोळ करून रास्ता रोको केला. बक्सरमध्येही मोठ्या संख्येने आंदोलक किल्ला मैदानाच्या रस्त्यावर उतरले. बक्सर स्थानकाशिवाय चौसा, डुमराव, रघुनाथपूर स्थानकांजवळही रेल्वे मार्ग रोखण्यात आला आहे.

तिन्ही सेवांमध्ये 4 वर्षांची भरती योजनालष्कर, नौदल आणि हवाई दल या तीनही दलांत मोठ्या संख्येने तरुणांची भरती करण्यासाठी केंद्र सरकारने 14 जून रोजी अग्निपथ भरती योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत तरुणांना संरक्षण दलात 4 वर्षे सेवा करावी लागणार आहे. पगार आणि पेन्शनचे बजेट कमी करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे. 

टॅग्स :BiharबिहारDefenceसंरक्षण विभागIndian Armyभारतीय जवानindian navyभारतीय नौदलindian air forceभारतीय हवाई दल