शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
3
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
4
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
5
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
6
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
7
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
8
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
9
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
10
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
11
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले
12
यूएई सामन्याआधी केलेलं नाटक पाकिस्तानच्या अंगलट, आयसीसीनं पाठवला ईमेल!
13
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
14
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
15
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
16
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
18
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
19
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
20
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!

बिहारमध्ये 'अग्निपथ'चा तीव्र विरोध; 17 जिल्ह्यांमध्ये आंदोलन, 5 गाड्या जळाल्या; 2 आमदारांवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 16:15 IST

आंदोलकांनी अनेक ठिकाणी गाड्यांची जाळपोळ केली. याशिवाय, नवाडा येथील भाजप कार्यालय पेटवून देण्यात आले.

पाटणा: केंद्र सरकारच्या नवीन 'अग्निपथ' योजनेच्या निषेधार्थ बिहारमध्ये उग्र आंदोलन सूरू आहे. आंदोलकांनी छपरा, कैमूर आणि गोपालगंजमध्ये आतापर्यंत 5 गाड्या जाळल्या आहेत. एकट्या छपरामध्ये तीन गाड्या जाळण्यात आल्या आहेत. 12 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. प्रवाशांनी कसाबसा आपला जीव वाचवला. 

आमदारांवर हल्लाआंदोलनादरम्यान भाजपच्या दोन आमदारांवरही हल्ला करण्यात आला. आंदोलकांनी छपरा सदर येथील भाजप आमदार डॉ. सीएन गुप्ता यांच्या घराची तोडफोड केली. त्याचवेळी वारिसलीगंजच्या आमदार अरुणा देवी यांच्यावरही हल्ला करण्यात आला. आंदोलकांनी नवाडा येथील भाजप कार्यालयाला आग लावली. संतप्त युवक केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत आहेत. आंदोलनामुळे रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अराहमध्ये पोलिसांना हल्लेखोरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.

17 जिल्ह्यांत उग्र निदर्शनेगुरुवारी जेहानाबाद, बक्सर आणि नवादा येथे रेल्वे थांबवण्यात आली. छपरा आणि मुंगेरमध्ये रस्ता जाळपोळीनंतर उग्र निदर्शने सुरू आहेत. सरकारने निर्णय मागे घ्यावा, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. यासंदर्भात बिहारमधील 17 जिल्ह्यांमध्ये निदर्शने करण्यात येत आहे. वारिसलीगंजच्या आमदार अरुणा देवी यांच्यावर नवाडा येथे आंदोलकांनी हल्ला केला. हल्ल्यावेळी आमदार गाडीत उपस्थित होत्या. 

गोपालगंजमध्ये पॅसेंजर ट्रेनला आगआंदोलकांनी गोपालगंजमधील सिधवालिया रेल्वे स्थानकावर पॅसेंजर ट्रेन पेटवून दिली. ट्रेनच्या अनेक बोगी पेटवण्यात आल्या. रेल्वे स्थानकावर असलेल्या ट्रेनमधील प्रवाशांनी कसेतरी पळून आपला जीव वाचवला. तिकडे, जेहानाबादमध्ये विद्यार्थ्यांनी पाटणा-गया रेल्वे मार्गाला लक्ष्य केले आणि पाटणा-गया मेमू पॅसेंजर ट्रेन जेहानाबाद स्टेशनजवळ थांबवली. शहरातील स्टेशन परिसरातील काको मोरजवळ विद्यार्थ्यांनी जाळपोळ करून रास्ता रोको केला. बक्सरमध्येही मोठ्या संख्येने आंदोलक किल्ला मैदानाच्या रस्त्यावर उतरले. बक्सर स्थानकाशिवाय चौसा, डुमराव, रघुनाथपूर स्थानकांजवळही रेल्वे मार्ग रोखण्यात आला आहे.

तिन्ही सेवांमध्ये 4 वर्षांची भरती योजनालष्कर, नौदल आणि हवाई दल या तीनही दलांत मोठ्या संख्येने तरुणांची भरती करण्यासाठी केंद्र सरकारने 14 जून रोजी अग्निपथ भरती योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत तरुणांना संरक्षण दलात 4 वर्षे सेवा करावी लागणार आहे. पगार आणि पेन्शनचे बजेट कमी करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे. 

टॅग्स :BiharबिहारDefenceसंरक्षण विभागIndian Armyभारतीय जवानindian navyभारतीय नौदलindian air forceभारतीय हवाई दल