शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

लष्करात निघाली भरती, आजच अर्ज करा अन् मिळवा नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 19:38 IST

या बातमीमध्ये त्याची आवश्यक माहिती, नोटिसा आणि अधिकृत वेबसाइट दिलेल्या आहेत. 

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थाही अडचणीत सापडली आहे. अनेक कंपन्यांचा व्यवसाय बंद असल्यानं त्यांनी कर्मचाऱ्यांना नारळ दिलेला आहेत. तर काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केलेली आहे. पण अशा संकटाच्या काळातही आपल्याला लष्करात नोकरीची संधी मिळत आहे. जर आपण अभियांत्रिकी (BE/BTech) केली असेल किंवा अंतिम वर्षात असाल तर आपल्याला भारतीय लष्करात(Indian Army) दाखल होण्याची संधी मिळणार आहे. टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी (TGC 132) भारतीय सैन्याने रिक्त जागा भरण्यासाठी भरती काढली आहे. लष्कराच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वरही माहिती देण्यात आली आहे. या रिक्त जागांवर ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. या बातमीमध्ये त्याची आवश्यक माहिती, नोटिसा आणि अधिकृत वेबसाइट दिलेल्या आहेत. कोणत्या प्रवाहासाठी किती जागा रिक्त?सिव्हिल - 8आर्किटेक्चर - 1यांत्रिकी - 4इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स - 5संगणक विज्ञान - 11इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण - 8इलेक्ट्रॉनिक्स - 1मेटलर्जिकल - 1इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन - 1मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स आणि मायक्रोवेव्ह - 1एकूण रिक्त जागा - 41अर्ज माहितीयासाठी joinindianarmy.nic.in वर जॉइन करून ऑनलाईन अर्ज करावे लागतील.ऑनलाइन अर्ज भरण्याची तारीख - 28 जुलै 2020 (दुपारी 12 पासून)अर्ज करण्याची अंतिम तारीख - 26 ऑगस्ट 2020भारतीय सैन्य अकादमी (IMA Dehradun), डेहराडून येथे जानेवारी 2021पासून हा कोर्स सुरू होईल. या कोर्सनंतर उमेदवारांना भारतीय सैन्यात कायमस्वरुपी कमिशन देण्यात येईल.नोकरीसाठी काय आवश्यक?संबंधित प्रवाहात किंवा पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षामध्ये अभियांत्रिकी पदवी प्राप्त केलेली असावी. आपण अंतिम वर्षात असल्यास पदवी कोर्स सुरू झाल्याच्या 12 आठवड्यांच्या आत पदवी सादर करावी लागणार आहे. उमेदवारांचे वय 20 ते 27 वर्षांच्यादरम्यान असावे. आपल्याला नियमानुसार सूट मिळण्याचा लाभ मिळेल. ही रिक्त जागा अविवाहित पुरुषांसाठी आहे.निवड कशी होईलविहित कट ऑफ अंतर्गत अर्ज करणार्‍यांना अभियांत्रिकी पदवी कोर्स (Bachelors) मध्ये सहाव्या सेमेस्टर/मास्टर/द्वितीय सत्रात आर्किटेक्चरमधील 8व्या सेमिस्टरमधील गुणांच्या आधारे शॉर्टलिस्ट केले जाईल. तर शॉर्टलिस्टेड उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल. अलाहाबाद, भोपाळ, बंगळुरू आणि कपूरथला येथील निवड केंद्रांवर मानसशास्त्रज्ञ, गटचाचणी अधिकारी आणि मुलाखत अधिकारी यांच्याद्वारे मुलाखती घेण्यात येणार आहेत. उमेदवारांना SSBने घेतलेल्या दोन टप्प्यांच्या निवड प्रक्रियेमधून जावे लागेल. ज्या उमेदवारांना SSB वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त घोषित केले जाईल त्यांना सामील होण्यासाठी पत्र दिले जाईल. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान