शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

लष्करात निघाली भरती, आजच अर्ज करा अन् मिळवा नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 19:38 IST

या बातमीमध्ये त्याची आवश्यक माहिती, नोटिसा आणि अधिकृत वेबसाइट दिलेल्या आहेत. 

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थाही अडचणीत सापडली आहे. अनेक कंपन्यांचा व्यवसाय बंद असल्यानं त्यांनी कर्मचाऱ्यांना नारळ दिलेला आहेत. तर काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केलेली आहे. पण अशा संकटाच्या काळातही आपल्याला लष्करात नोकरीची संधी मिळत आहे. जर आपण अभियांत्रिकी (BE/BTech) केली असेल किंवा अंतिम वर्षात असाल तर आपल्याला भारतीय लष्करात(Indian Army) दाखल होण्याची संधी मिळणार आहे. टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी (TGC 132) भारतीय सैन्याने रिक्त जागा भरण्यासाठी भरती काढली आहे. लष्कराच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वरही माहिती देण्यात आली आहे. या रिक्त जागांवर ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. या बातमीमध्ये त्याची आवश्यक माहिती, नोटिसा आणि अधिकृत वेबसाइट दिलेल्या आहेत. कोणत्या प्रवाहासाठी किती जागा रिक्त?सिव्हिल - 8आर्किटेक्चर - 1यांत्रिकी - 4इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स - 5संगणक विज्ञान - 11इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण - 8इलेक्ट्रॉनिक्स - 1मेटलर्जिकल - 1इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन - 1मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स आणि मायक्रोवेव्ह - 1एकूण रिक्त जागा - 41अर्ज माहितीयासाठी joinindianarmy.nic.in वर जॉइन करून ऑनलाईन अर्ज करावे लागतील.ऑनलाइन अर्ज भरण्याची तारीख - 28 जुलै 2020 (दुपारी 12 पासून)अर्ज करण्याची अंतिम तारीख - 26 ऑगस्ट 2020भारतीय सैन्य अकादमी (IMA Dehradun), डेहराडून येथे जानेवारी 2021पासून हा कोर्स सुरू होईल. या कोर्सनंतर उमेदवारांना भारतीय सैन्यात कायमस्वरुपी कमिशन देण्यात येईल.नोकरीसाठी काय आवश्यक?संबंधित प्रवाहात किंवा पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षामध्ये अभियांत्रिकी पदवी प्राप्त केलेली असावी. आपण अंतिम वर्षात असल्यास पदवी कोर्स सुरू झाल्याच्या 12 आठवड्यांच्या आत पदवी सादर करावी लागणार आहे. उमेदवारांचे वय 20 ते 27 वर्षांच्यादरम्यान असावे. आपल्याला नियमानुसार सूट मिळण्याचा लाभ मिळेल. ही रिक्त जागा अविवाहित पुरुषांसाठी आहे.निवड कशी होईलविहित कट ऑफ अंतर्गत अर्ज करणार्‍यांना अभियांत्रिकी पदवी कोर्स (Bachelors) मध्ये सहाव्या सेमेस्टर/मास्टर/द्वितीय सत्रात आर्किटेक्चरमधील 8व्या सेमिस्टरमधील गुणांच्या आधारे शॉर्टलिस्ट केले जाईल. तर शॉर्टलिस्टेड उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल. अलाहाबाद, भोपाळ, बंगळुरू आणि कपूरथला येथील निवड केंद्रांवर मानसशास्त्रज्ञ, गटचाचणी अधिकारी आणि मुलाखत अधिकारी यांच्याद्वारे मुलाखती घेण्यात येणार आहेत. उमेदवारांना SSBने घेतलेल्या दोन टप्प्यांच्या निवड प्रक्रियेमधून जावे लागेल. ज्या उमेदवारांना SSB वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त घोषित केले जाईल त्यांना सामील होण्यासाठी पत्र दिले जाईल. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान