शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

भारतीय लष्करप्रमुखांच्या विधानाने चीनचा झाला तीळपापड! इशा-याची भाषा, जरा सांभाळून अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 19:07 IST

भारताचे लष्करप्रमुख बिपिन रावत यांच्या विधानावर सोमवारी चीनने तीव्र संताप व्यक्त केला. भारतीय लष्करप्रमुखांचे विधान पूर्णपणे अयोग्य असून त्यांच्या अशा प्रकारच्या विधानांमुळे सीमेवरील शांतता आणि स्थिरता धोक्यात येऊ शकते.

ठळक मुद्देमागच्या वर्षभरात भारत-चीन संबंधात अनेक नाटयमय कलाटणी देणारी वळणे आली आहेत असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लु कांग यांनी सांगितलेभारताच्या वरिष्ठ अधिका-यांनी अशा प्रकारचे अयोग्य मतप्रदर्शन केल्यामुळे दोन्ही देशांच्या संबंध सुधारण्याला खीळ बसू शकते.

नवी दिल्ली - भारताचे लष्करप्रमुख बिपिन रावत यांच्या विधानावर सोमवारी चीनने तीव्र संताप व्यक्त केला. भारतीय लष्करप्रमुखांचे विधान पूर्णपणे अयोग्य असून त्यांच्या अशा प्रकारच्या विधानांमुळे सीमेवरील शांतता आणि स्थिरता धोक्यात येऊ शकते असे चीनने म्हटले आहे. भारताने आता पाकिस्तानपेक्षा उत्तरेकडच्या चीनला लागून असणा-या सीमेवर जास्त लक्ष देण्याची गरज आहे. चीन जर बलवान असेल तर भारतही कमकुवत नाही असे विधान बिपिन रावत यांनी मागच्या आठवडयात केले होते. 

मागच्या वर्षभरात भारत-चीन संबंधात अनेक नाटयमय कलाटणी देणारी वळणे आली आहेत असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लु कांग यांनी सांगितले. मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात भारत-चीनच्या नेत्यांनी दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी मतभेदांचे मुद्दे सामंजस्याने हाताळण्याचा एकमताने निर्णय घेतला होता. अलीकडेच दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय संबंध सुधारण्यास सुरुवात झाली आहे. या परिस्थितीत भारताच्या वरिष्ठ अधिका-यांनी अशा प्रकारचे अयोग्य मतप्रदर्शन केल्यामुळे दोन्ही देशांच्या संबंध सुधारण्याला खीळ बसू शकते असे लु कांग म्हणाले. यामुळे सीमा भागात शांतता आणि स्थिरता राहणार नाही. 

काय म्हणाले होते बिपीन रावत दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना बिपीन रावत म्हणाले होते  की, 'चीन एक शक्तिशाली देश आहे, पण आपणही दुबळे नाही आहोत'. चीनी घुसखोरीच्या एका प्रश्नावर बोलताना त्यांनी आम्ही कोणालाही आमच्या क्षेत्रात घुसखोरी करण्याची परवानगी देणार नसल्याचं सांगितलं. 'चीन सीमारेषेवर दबाव वाढवत आहे हे खरं आहे, पण आम्ही त्याचा सामना करत आहोत', असंही ते बोलले आहेत. 'चीनसोबत तणाव वाढू नये यासाठी आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. आम्ही लोक आपल्या जमिनीवर घुसखोरी होऊ देणार नाही. जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर पुढील कारवाईसाठी लष्कराला योग्य ते आदेश देण्यात आले आहेत', असं बिपीन रावत यांनी स्पष्ट केलं. 

 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानchinaचीनBipin Rawatबिपीन रावत