शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
7
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
8
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
9
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
10
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
11
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
12
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
13
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
14
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
15
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
16
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
17
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
18
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
19
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
20
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...

भारतीय लष्करप्रमुखांच्या विधानाने चीनचा झाला तीळपापड! इशा-याची भाषा, जरा सांभाळून अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 19:07 IST

भारताचे लष्करप्रमुख बिपिन रावत यांच्या विधानावर सोमवारी चीनने तीव्र संताप व्यक्त केला. भारतीय लष्करप्रमुखांचे विधान पूर्णपणे अयोग्य असून त्यांच्या अशा प्रकारच्या विधानांमुळे सीमेवरील शांतता आणि स्थिरता धोक्यात येऊ शकते.

ठळक मुद्देमागच्या वर्षभरात भारत-चीन संबंधात अनेक नाटयमय कलाटणी देणारी वळणे आली आहेत असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लु कांग यांनी सांगितलेभारताच्या वरिष्ठ अधिका-यांनी अशा प्रकारचे अयोग्य मतप्रदर्शन केल्यामुळे दोन्ही देशांच्या संबंध सुधारण्याला खीळ बसू शकते.

नवी दिल्ली - भारताचे लष्करप्रमुख बिपिन रावत यांच्या विधानावर सोमवारी चीनने तीव्र संताप व्यक्त केला. भारतीय लष्करप्रमुखांचे विधान पूर्णपणे अयोग्य असून त्यांच्या अशा प्रकारच्या विधानांमुळे सीमेवरील शांतता आणि स्थिरता धोक्यात येऊ शकते असे चीनने म्हटले आहे. भारताने आता पाकिस्तानपेक्षा उत्तरेकडच्या चीनला लागून असणा-या सीमेवर जास्त लक्ष देण्याची गरज आहे. चीन जर बलवान असेल तर भारतही कमकुवत नाही असे विधान बिपिन रावत यांनी मागच्या आठवडयात केले होते. 

मागच्या वर्षभरात भारत-चीन संबंधात अनेक नाटयमय कलाटणी देणारी वळणे आली आहेत असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लु कांग यांनी सांगितले. मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात भारत-चीनच्या नेत्यांनी दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी मतभेदांचे मुद्दे सामंजस्याने हाताळण्याचा एकमताने निर्णय घेतला होता. अलीकडेच दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय संबंध सुधारण्यास सुरुवात झाली आहे. या परिस्थितीत भारताच्या वरिष्ठ अधिका-यांनी अशा प्रकारचे अयोग्य मतप्रदर्शन केल्यामुळे दोन्ही देशांच्या संबंध सुधारण्याला खीळ बसू शकते असे लु कांग म्हणाले. यामुळे सीमा भागात शांतता आणि स्थिरता राहणार नाही. 

काय म्हणाले होते बिपीन रावत दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना बिपीन रावत म्हणाले होते  की, 'चीन एक शक्तिशाली देश आहे, पण आपणही दुबळे नाही आहोत'. चीनी घुसखोरीच्या एका प्रश्नावर बोलताना त्यांनी आम्ही कोणालाही आमच्या क्षेत्रात घुसखोरी करण्याची परवानगी देणार नसल्याचं सांगितलं. 'चीन सीमारेषेवर दबाव वाढवत आहे हे खरं आहे, पण आम्ही त्याचा सामना करत आहोत', असंही ते बोलले आहेत. 'चीनसोबत तणाव वाढू नये यासाठी आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. आम्ही लोक आपल्या जमिनीवर घुसखोरी होऊ देणार नाही. जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर पुढील कारवाईसाठी लष्कराला योग्य ते आदेश देण्यात आले आहेत', असं बिपीन रावत यांनी स्पष्ट केलं. 

 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानchinaचीनBipin Rawatबिपीन रावत