शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

"भारतीय हवाई दलात पाकिस्तान आणि चीनला एकाचवेळी चोख प्रत्युत्तर देण्याची ताकद"

By सायली शिर्के | Updated: September 26, 2020 10:41 IST

चीनशी सुरू असलेल्या तणाव लक्षात घेता दिवसरात्र विमानांची उड्डाणं सुरू आहेत. मालवाहू विमानं ही  रेशन, दारूगोळा घेऊन सतत उड्डाणं करत आहेत.

नवी दिल्ली -  पाकिस्तान आणि चीन एकाच वेळी भारताविरूद्ध मोर्चेबांधणी करू शकतात अशी शंका सध्या व्यक्त केली जात आहे. मात्र अशा परिस्थितीसाठी भारतीय हवाई दल तयार असून सज्ज झालं आहे. भारतीय हवाई दलाच्या जवानांनी या दोघांशीही एकाचवेळी लढण्यास आम्ही सक्षम आहोत असं म्हटलं आहे. 

फॉरवर्ड एअरबेस हे एक ठिकाण असून पाकिस्तान इथून जवळपास 50 किलोमीटर अंतरावर आहे. तर भारतासाठी सामरिक दृष्टीकोनातून महत्त्वाचे असलेले दौलत बेग ओल्डी (DBO) हे लडाखमध्ये असलेले ठिकाण 80 किलोमीटर दूर आहे. या ठिकाणी दिवसरात्र लढाऊ, मालवाहून विमानं आणि हेलिकॉप्टर्स उड्डाण घेतात. यामध्ये सुखोई एमकेआय 30, सी -130 जे, सुपर हरक्यूलिस, इलुशिन 76 आणि अँटोन 32 यांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.

LAC वर पुरवली जातेय रसद आणि दारुगोळा 

चीनशी सुरू असलेल्या तणाव लक्षात घेता दिवसरात्र विमानांची उड्डाणं सुरू आहेत. मालवाहू विमानं ही  रेशन, दारूगोळा घेऊन सतत उड्डाणं करत आहेत. ही विमानं पूर्व लडाखच्या डीबीओसह प्रत्यक्ष ताबा रेषेवरील लष्करी तळांवर सामान घेऊन जात आहेत. पाकिस्तान आणि चीन एकत्र येण्याची शक्यता पाहता पाकिस्तानच्या स्कार्दू एअरबेसचा भारताला धोका आहे का? असा प्रश्न विचारला गेला. त्याला हवाई दलाच्या लेफ्टनंट रँकवरील अधिकाऱ्याने उत्तर दिलं आहे. 

''गौरव से आसमान छू लो' या हवाई दलाच्या घोषवाक्यानुसार आम्ही पूर्णपणे तयार'

"भारतीय हवाई दल आधुनिक सुविधांमुळे पूर्णपणे तयार आहे आणि दोन्ही मोर्चांवर कोणतीही कारवाई करू शकतो. 'गौरव से आसमान छू लो' या हवाई दलाच्या घोषवाक्यानुसार आम्ही पूर्णपणे तयार आहोत आणि आमच्यात जोशही आहे" असं अधिकाऱ्याने म्हटलं आहे. हवाई दलाच्या नाईट ऑपरेशनबाबत एका फायटर पायलटने दिलेल्या माहितीनुसार, "आपल्या लढाऊ क्षमतांचा मोठा विकास झाला आहे. आता आम्ही फॉरवर्ड बेसवरून रात्री सर्व प्रकारच्या मोहीमा पूर्ण करू शकतो." 

गलवानमध्ये 'इतके' सैनिक झाले ठार; चीनने पहिल्यांदाच दिली कबुली

पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये भारतीय जवानांबरोबर 15 जून रोजी झालेल्या संघर्षात चिनी सैनिक मारले गेले होते, अशी कबुली चीनने दिली आहे. मात्र, या संघर्षात ठार झालेल्या चिनी सैनिकांची संख्या भारतीय जवानांहून कमी आहे, असा दावा चीनने काही दिवसांपूर्वी केला आहे. भारत आणि चीनमध्ये चर्चा झाली. त्यानंतर आता पहिल्यांदाच चीनने गलवान खोऱ्यातील संघर्षात आपले सैनिक ठार झाल्याचं मान्य केलं असून आकडा सांगितला आहे. 

पाच चिनी सैन्यांमध्ये चीनच्या एका कमांडिंग ऑफिसरचाही समावेश

गलवान खोऱ्यातील 15 संघर्षात चीनचे पाच सैन्य ठार झाले असल्याची बाब चीनने मान्य केली आहे. 'द हिंदू'ने याबाबतचे वृत्त दिलं आहे. भारताच्या प्रत्युत्तरात ठार झालेल्या पाच चिनी सैन्यांमध्ये चीनच्या एका कमांडिंग ऑफिसरचाही समावेश आहे. याआधी चीनने फक्त एकच सैनिक ठार झाला असल्याचं मान्य केलं होतं. चीनकडून फक्त पाच सैनिक ठार झाले असल्याचा दावा करण्यात येत असला तरी भारतीय आणि अमेरिकन गुप्तचर संस्थांच्या दाव्यानुसार, 40 चिनी सैन्य ठार झाले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ, कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी! 

"कांद्याच्या निर्यात बंदीतून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा घोटाळाच, सरकार ऐकत का नाही?", शिवसेनेचा हल्लाबोल

भाजपा आणि जन अधिकार पक्षाचे कार्यकर्ते भिडले; जोरदार 'राडा' अन् तुफान हाणामारी, Video व्हायरल 

Bharat Bandh : "ना मोबदला, ना सन्मान; नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांना गुलाम बनवणार"

Bihar Election 2020 : एका बूथवर 1000 मतदार, वेळेची मर्यादा वाढवली; कोरोनाग्रस्तांनाही करता येणार मतदान

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलIndiaभारतchinaचीनPakistanपाकिस्तान