शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

Indian Air Strike : ठार झालेल्या दहशतवाद्यांचा आकडा अखेर उघड, 'जैश'च्या २६३ जणांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 13:51 IST

भारतीय हवाई दलाने बालाकोट येथील जैश ए मोहम्मदच्या तळावर केलेल्या एअरस्ट्राइकमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांचा नेमका आकडा समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे.

ठळक मुद्देभारतीय हवाई दलाने केलेल्या एअरस्ट्राइकमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांचा नेमका आकडा समोर एअरस्ट्राइक झाली तेव्हा मसूद अझहरच्या जैश ए मोहम्मद या संघटनेचा तळ असलेल्या बालाकोटमधील जाबा टॉप येथे 263 दहशतवादी जमलेले होतेपाकिस्तान आणि काही आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी या हल्ल्यात दहशतवादी ठार झाले नसल्याचा दावा केल्याने एअरस्ट्राइकच्या परिणामाबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते

नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाने बालाकोट येथील जैश ए मोहम्मदच्या तळावर केलेल्या एअरस्ट्राइकमध्ये अनेक दहशतवादी ठार झाल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र पाकिस्तान आणि काही आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी या हल्ल्यात दहशतवादी ठार झाले नसल्याचा दावा केल्याने एअरस्ट्राइकच्या परिणामाबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, भारतीय हवाई दलाने केलेल्या एअरस्ट्राइकमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांचा नेमका आकडा समोर आला आहे. ज्यावेळी एअरस्ट्राइक झाली तेव्हा मसूद अझहरच्या जैश ए मोहम्मद या संघटनेचा तळ असलेल्या बालाकोटमधील जाबा टॉप येथे 263 दहशतवादी जमलेले होते, अशी माहिती समोर आली आहे. इंग्रजी वृत्तवाहिनी टाइम्स नाऊने या संदर्भातील मोठा गौप्यस्फोट केला आहे. भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकपूर्वी जाबा टॉप येथे 263 दहशतवादी जमलेले होते, अशी माहिती आपल्याला मिळाल्याचा दावा या वृत्तवाहिनीने केला आहे. तसेच बालाकोट येथे असलेल्या शिकाऊ दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी जैश ए मोहम्मदचे 18 टॉप कमांडरही तिथे उपस्थित होते, असेही या वृत्तात म्हटले आहे. बालाकोटमध्ये उपस्थित असलेल्या दहशतवाद्यांपैकी 83 दहशतवादी हे दौरा ए आम मधील होते. तर 91 दहशतवादी हे दौरा ए खास या गटातील होते. तर 25 दहशतवाद्यांना फिदायीन हल्ल्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात येत होते.  पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या 40 जवानांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या प्रचंड संतापाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाने बालाकोट येथील जैश ए मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राइक केले होते. त्या हल्ल्यात जैशच्या तळाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे तसेच मोठ्या प्रमाणावर दहशतवादी ठार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र विविध वृत्तवाहिन्या आणि राजकीय व्यक्तींकडून ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या संख्येबाबत लढवण्यात येत असलेले तर्कवितर्क आणि पाकिस्तान तसेच आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्यांकडून येत असलेले परस्पर विरोधी दावे यामुळे या हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. तसेच भारतातील विरोधी पक्षातील राजकारण्यांकडूनही या एअरस्ट्राइकमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या संख्येवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.  दरम्यान, आता या हल्ल्यात 263 दहशतवादी ठार झाल्याचे समोर आल्यानंतर बालाकोट येथील एअरस्ट्राइकवरून पुन्हा चर्चा आणि वाद रंगण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदindian air forceभारतीय हवाई दलIndiaभारत