शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

Indian Air Strike : ठार झालेल्या दहशतवाद्यांचा आकडा अखेर उघड, 'जैश'च्या २६३ जणांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 13:51 IST

भारतीय हवाई दलाने बालाकोट येथील जैश ए मोहम्मदच्या तळावर केलेल्या एअरस्ट्राइकमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांचा नेमका आकडा समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे.

ठळक मुद्देभारतीय हवाई दलाने केलेल्या एअरस्ट्राइकमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांचा नेमका आकडा समोर एअरस्ट्राइक झाली तेव्हा मसूद अझहरच्या जैश ए मोहम्मद या संघटनेचा तळ असलेल्या बालाकोटमधील जाबा टॉप येथे 263 दहशतवादी जमलेले होतेपाकिस्तान आणि काही आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी या हल्ल्यात दहशतवादी ठार झाले नसल्याचा दावा केल्याने एअरस्ट्राइकच्या परिणामाबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते

नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाने बालाकोट येथील जैश ए मोहम्मदच्या तळावर केलेल्या एअरस्ट्राइकमध्ये अनेक दहशतवादी ठार झाल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र पाकिस्तान आणि काही आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी या हल्ल्यात दहशतवादी ठार झाले नसल्याचा दावा केल्याने एअरस्ट्राइकच्या परिणामाबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, भारतीय हवाई दलाने केलेल्या एअरस्ट्राइकमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांचा नेमका आकडा समोर आला आहे. ज्यावेळी एअरस्ट्राइक झाली तेव्हा मसूद अझहरच्या जैश ए मोहम्मद या संघटनेचा तळ असलेल्या बालाकोटमधील जाबा टॉप येथे 263 दहशतवादी जमलेले होते, अशी माहिती समोर आली आहे. इंग्रजी वृत्तवाहिनी टाइम्स नाऊने या संदर्भातील मोठा गौप्यस्फोट केला आहे. भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकपूर्वी जाबा टॉप येथे 263 दहशतवादी जमलेले होते, अशी माहिती आपल्याला मिळाल्याचा दावा या वृत्तवाहिनीने केला आहे. तसेच बालाकोट येथे असलेल्या शिकाऊ दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी जैश ए मोहम्मदचे 18 टॉप कमांडरही तिथे उपस्थित होते, असेही या वृत्तात म्हटले आहे. बालाकोटमध्ये उपस्थित असलेल्या दहशतवाद्यांपैकी 83 दहशतवादी हे दौरा ए आम मधील होते. तर 91 दहशतवादी हे दौरा ए खास या गटातील होते. तर 25 दहशतवाद्यांना फिदायीन हल्ल्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात येत होते.  पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या 40 जवानांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या प्रचंड संतापाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाने बालाकोट येथील जैश ए मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राइक केले होते. त्या हल्ल्यात जैशच्या तळाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे तसेच मोठ्या प्रमाणावर दहशतवादी ठार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र विविध वृत्तवाहिन्या आणि राजकीय व्यक्तींकडून ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या संख्येबाबत लढवण्यात येत असलेले तर्कवितर्क आणि पाकिस्तान तसेच आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्यांकडून येत असलेले परस्पर विरोधी दावे यामुळे या हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. तसेच भारतातील विरोधी पक्षातील राजकारण्यांकडूनही या एअरस्ट्राइकमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या संख्येवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.  दरम्यान, आता या हल्ल्यात 263 दहशतवादी ठार झाल्याचे समोर आल्यानंतर बालाकोट येथील एअरस्ट्राइकवरून पुन्हा चर्चा आणि वाद रंगण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदindian air forceभारतीय हवाई दलIndiaभारत