शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान सीमेवर हवाई दलाचा 'हाय जोश', मध्यरात्री उडाली पाकिस्तानची झोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 12:20 IST

भारतीय हवाई दलाने गुरुवारी रात्री पंजाब राज्यातील पाकिस्तान सीमेजवळ युद्धसराव करुन पाकिस्तानी सैन्याची झोप उडवली. या अभ्यासात मोठ्या प्रमाणात भारतीय वायुसेनेच्या लढाऊ विमानाने भाग घेतला.

नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाची स्थिती कायम असताना कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारत सज्ज आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाने गुरुवारी रात्री पंजाब राज्यातील पाकिस्तान सीमेजवळ युद्धसराव करुन पाकिस्तानी सैन्याची झोप उडवली. या अभ्यासात मोठ्या प्रमाणात भारतीय वायुसेनेच्या लढाऊ विमानाने भाग घेतला.

पंजाब राज्यातील पाकिस्तानच्या सीमेवर हवाई दलाचा युद्धसराव सुरु होता. या सरावादरम्यान आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात स्फोटांचे आवाज ऐकायला येत होते. त्यामुळे अमृतसर शहराजवळील लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झालं होतं. मात्र युद्धसरावाच्या निमित्ताने भारतीय हवाई दलाने पंजाब आणि जम्मू काश्मीरलगत असणाऱ्या पाकिस्तानी सैन्यावर दबाव बनवण्याचे काम केले. ज्या ज्या ठिकाणाहून लढाऊ विमाने सराव करत होती त्या ठिकाणी स्फोटांचे आवाजाने पाकिस्तानच्या मनात धडकी भरत होती. 

दरम्यान पंजाबच्या अमृतसर शहरातील लोकांना सुरुवातीच्या वेळी स्फोटांचे आवाज नेमके कुठून येत आहेत याचा काही थांगपत्ता नव्हता. सोशल मिडीयावर लोकांना अनेक शंका उपस्थित केल्या. प्रत्यक्षदर्शींनी रात्री प्रचंड प्रमाणात  स्फोटांचा आवाज कानी पडत असल्याची माहिती माध्यमांना दिली. स्थानिक प्रशासन यांनी रात्री शहरात येऊन लोकांना कोणत्याही अफवांना बळी पडू नका असं आवाहन केलं. 

याआधीही बुधवारी पाकिस्तानचे लढाऊ विमान जम्मू-काश्मीर येथील एलओसीवर दिसण्यात आलं होतं. यानंतर भारतीय हवाई दलाई अलर्ट जारी केला. सुरक्षा मंत्रालयाच्या सूत्रांनुसार पुंछ परिसरात 10 किमी भारतीय सीमेत पाकिस्तान विमान आढळल्याचं समजलं होतं. 27 फेब्रुवारीला नौशेरा सेक्टरमध्ये आलेल्या पाकिस्तानी विमानाला भारतीय हवाई दलाने पळवून लावलं होतं. याच विमानाचा पाठलाग करत भारताचं मिग 21 विमान पाकिस्तानच्या हद्दीत गेलं होतं. त्यानंतर मिग 21 विमानाचा पायलट अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तान सैन्याने जेरबंद केलं होतं.  

पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या सीमेत घुसून बालकोट भागात एअर स्ट्राइक केलं होतं. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर हल्ला करत अनेक दहशतवादी मारल्याची माहिती सरकारने दिली. या एअर स्ट्राइकनंतर संपूर्ण देशभरात हवाई दलाच्या धाडसाचे कौतूक करण्यात आलं. 

टॅग्स :Indiaभारतpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाairforceहवाईदलPakistanपाकिस्तानBorderसीमारेषा