शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
2
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
3
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
4
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
5
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
6
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
7
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
8
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
9
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
10
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
11
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
12
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
13
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
14
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
15
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
16
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
17
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
18
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
19
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
20
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना

पाकिस्तान सीमेवर हवाई दलाचा 'हाय जोश', मध्यरात्री उडाली पाकिस्तानची झोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 12:20 IST

भारतीय हवाई दलाने गुरुवारी रात्री पंजाब राज्यातील पाकिस्तान सीमेजवळ युद्धसराव करुन पाकिस्तानी सैन्याची झोप उडवली. या अभ्यासात मोठ्या प्रमाणात भारतीय वायुसेनेच्या लढाऊ विमानाने भाग घेतला.

नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाची स्थिती कायम असताना कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारत सज्ज आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाने गुरुवारी रात्री पंजाब राज्यातील पाकिस्तान सीमेजवळ युद्धसराव करुन पाकिस्तानी सैन्याची झोप उडवली. या अभ्यासात मोठ्या प्रमाणात भारतीय वायुसेनेच्या लढाऊ विमानाने भाग घेतला.

पंजाब राज्यातील पाकिस्तानच्या सीमेवर हवाई दलाचा युद्धसराव सुरु होता. या सरावादरम्यान आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात स्फोटांचे आवाज ऐकायला येत होते. त्यामुळे अमृतसर शहराजवळील लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झालं होतं. मात्र युद्धसरावाच्या निमित्ताने भारतीय हवाई दलाने पंजाब आणि जम्मू काश्मीरलगत असणाऱ्या पाकिस्तानी सैन्यावर दबाव बनवण्याचे काम केले. ज्या ज्या ठिकाणाहून लढाऊ विमाने सराव करत होती त्या ठिकाणी स्फोटांचे आवाजाने पाकिस्तानच्या मनात धडकी भरत होती. 

दरम्यान पंजाबच्या अमृतसर शहरातील लोकांना सुरुवातीच्या वेळी स्फोटांचे आवाज नेमके कुठून येत आहेत याचा काही थांगपत्ता नव्हता. सोशल मिडीयावर लोकांना अनेक शंका उपस्थित केल्या. प्रत्यक्षदर्शींनी रात्री प्रचंड प्रमाणात  स्फोटांचा आवाज कानी पडत असल्याची माहिती माध्यमांना दिली. स्थानिक प्रशासन यांनी रात्री शहरात येऊन लोकांना कोणत्याही अफवांना बळी पडू नका असं आवाहन केलं. 

याआधीही बुधवारी पाकिस्तानचे लढाऊ विमान जम्मू-काश्मीर येथील एलओसीवर दिसण्यात आलं होतं. यानंतर भारतीय हवाई दलाई अलर्ट जारी केला. सुरक्षा मंत्रालयाच्या सूत्रांनुसार पुंछ परिसरात 10 किमी भारतीय सीमेत पाकिस्तान विमान आढळल्याचं समजलं होतं. 27 फेब्रुवारीला नौशेरा सेक्टरमध्ये आलेल्या पाकिस्तानी विमानाला भारतीय हवाई दलाने पळवून लावलं होतं. याच विमानाचा पाठलाग करत भारताचं मिग 21 विमान पाकिस्तानच्या हद्दीत गेलं होतं. त्यानंतर मिग 21 विमानाचा पायलट अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तान सैन्याने जेरबंद केलं होतं.  

पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या सीमेत घुसून बालकोट भागात एअर स्ट्राइक केलं होतं. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर हल्ला करत अनेक दहशतवादी मारल्याची माहिती सरकारने दिली. या एअर स्ट्राइकनंतर संपूर्ण देशभरात हवाई दलाच्या धाडसाचे कौतूक करण्यात आलं. 

टॅग्स :Indiaभारतpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाairforceहवाईदलPakistanपाकिस्तानBorderसीमारेषा