शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

पाकिस्तान दुहेरी संकटात! भारत पाणी बंद करणार, केंद्र सरकारने जारी केली 'ही' नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 14:49 IST

भारत सरकारने सप्टेंबर 1960 च्या सिंधू जल करारमध्ये सुधारणा करण्यासाठी पाकिस्तानला नोटीस बजावली आहे. 'पाकिस्तानच्या सर्व चुकीच्या कृतींचा सिंधू जल कराराच्या तरतुदींवर आणि त्यांच्या अंमलबजावणीवर विपरीत परिणाम झाला आहे.

भारत सरकारने सप्टेंबर 1960 च्या सिंधू जल करारमध्ये सुधारणा करण्यासाठी पाकिस्तानला नोटीस बजावली आहे. 'पाकिस्तानच्या सर्व चुकीच्या कृतींचा सिंधू जल कराराच्या तरतुदींवर आणि त्यांच्या अंमलबजावणीवर विपरीत परिणाम झाला आहे आणि भारताला IWT च्या पुनरावृत्तीसाठी नोटीस जारी करण्यास भाग पडले आहे, असं भारत सरकारने म्हटले आहे.

पाकिस्तानच्या कृत्यांबद्दल भारत सरकारने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पाकिस्तानसोबत सिंधू जल कराराची अंमलबजावणी करण्यासाठी भारत खंबीर समर्थक आणि जबाबदार भागीदार आहे, पण दुसऱ्या बाजुने तसे झालेले नाही, असं भारत सरकारने असेही म्हटले आहे.

'भारताने परस्पर मध्यस्थीचा मार्ग शोधण्याचा वारंवार प्रयत्न करूनही, 2017 ते 2022 या कालावधीत कायमस्वरूपी सिंधू आयोगाच्या 5 बैठकांमध्ये पाकिस्तानने या मुद्द्यावर चर्चा करण्यास नकार दिला आहे. अशा कारणांमुळे आता पाकिस्तानला नोटीस बजावण्यात आली आहे, असंही पुढे म्हटले आहे.

सिंधू जल कराराचे उल्लंघन सुधारण्यासाठी पाकिस्तानला 90 दिवसांच्या आत आंतर-सरकारी वाटाघाटी करण्याची संधी देणे हा या नोटिशीचा उद्देश आहे. या प्रक्रियेमुळे गेल्या 62 वर्षांतील परिस्थितीतील बदलांनुसार सिंधू जल करारही अपडेट होईल.

भारीच! ना घोडा, ना कार... 7 लाख खर्च करून हेलिकॉप्टरने वधूला घेऊन जाण्यासाठी आला नवरदेव

सिंधू जल कराराच्या तरतुदीनुसार सतलज, बियास आणि रावीचे पाणी भारताला आणि सिंधू, झेलम आणि चिनाबचे पाणी पाकिस्तानला देण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तानने 9 वर्षांच्या वाटाघाटीनंतर 19 सप्टेंबर 1960 रोजी सिंधू जल करारावर स्वाक्षरी केली, ज्यामध्ये जागतिक बँक देखील स्वाक्षरी करणारी होती. दोन्ही देशांचे जल आयुक्त वर्षातून दोनदा भेटतात आणि प्रकल्पाच्या ठिकाणांना आणि महत्त्वाच्या नदीच्या मुख्य कामांना तांत्रिक भेटी देतात. मात्र पाकिस्तानकडून या कराराच्या नियमांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यानंतर केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत