शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

पाकिस्तान दुहेरी संकटात! भारत पाणी बंद करणार, केंद्र सरकारने जारी केली 'ही' नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 14:49 IST

भारत सरकारने सप्टेंबर 1960 च्या सिंधू जल करारमध्ये सुधारणा करण्यासाठी पाकिस्तानला नोटीस बजावली आहे. 'पाकिस्तानच्या सर्व चुकीच्या कृतींचा सिंधू जल कराराच्या तरतुदींवर आणि त्यांच्या अंमलबजावणीवर विपरीत परिणाम झाला आहे.

भारत सरकारने सप्टेंबर 1960 च्या सिंधू जल करारमध्ये सुधारणा करण्यासाठी पाकिस्तानला नोटीस बजावली आहे. 'पाकिस्तानच्या सर्व चुकीच्या कृतींचा सिंधू जल कराराच्या तरतुदींवर आणि त्यांच्या अंमलबजावणीवर विपरीत परिणाम झाला आहे आणि भारताला IWT च्या पुनरावृत्तीसाठी नोटीस जारी करण्यास भाग पडले आहे, असं भारत सरकारने म्हटले आहे.

पाकिस्तानच्या कृत्यांबद्दल भारत सरकारने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पाकिस्तानसोबत सिंधू जल कराराची अंमलबजावणी करण्यासाठी भारत खंबीर समर्थक आणि जबाबदार भागीदार आहे, पण दुसऱ्या बाजुने तसे झालेले नाही, असं भारत सरकारने असेही म्हटले आहे.

'भारताने परस्पर मध्यस्थीचा मार्ग शोधण्याचा वारंवार प्रयत्न करूनही, 2017 ते 2022 या कालावधीत कायमस्वरूपी सिंधू आयोगाच्या 5 बैठकांमध्ये पाकिस्तानने या मुद्द्यावर चर्चा करण्यास नकार दिला आहे. अशा कारणांमुळे आता पाकिस्तानला नोटीस बजावण्यात आली आहे, असंही पुढे म्हटले आहे.

सिंधू जल कराराचे उल्लंघन सुधारण्यासाठी पाकिस्तानला 90 दिवसांच्या आत आंतर-सरकारी वाटाघाटी करण्याची संधी देणे हा या नोटिशीचा उद्देश आहे. या प्रक्रियेमुळे गेल्या 62 वर्षांतील परिस्थितीतील बदलांनुसार सिंधू जल करारही अपडेट होईल.

भारीच! ना घोडा, ना कार... 7 लाख खर्च करून हेलिकॉप्टरने वधूला घेऊन जाण्यासाठी आला नवरदेव

सिंधू जल कराराच्या तरतुदीनुसार सतलज, बियास आणि रावीचे पाणी भारताला आणि सिंधू, झेलम आणि चिनाबचे पाणी पाकिस्तानला देण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तानने 9 वर्षांच्या वाटाघाटीनंतर 19 सप्टेंबर 1960 रोजी सिंधू जल करारावर स्वाक्षरी केली, ज्यामध्ये जागतिक बँक देखील स्वाक्षरी करणारी होती. दोन्ही देशांचे जल आयुक्त वर्षातून दोनदा भेटतात आणि प्रकल्पाच्या ठिकाणांना आणि महत्त्वाच्या नदीच्या मुख्य कामांना तांत्रिक भेटी देतात. मात्र पाकिस्तानकडून या कराराच्या नियमांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यानंतर केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत