शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

चीनला लोळवणार भारत! एफडीआयचे नियम करणार शिथिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 13:12 IST

आंतरराष्ट्रीय कंपन्यांना देणार सवलती, एफडीआयचे नियम करणार शिथिल

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जवळपास गेल्या दोन दशकांपासून चीन हे जगाचे निर्मिती केंद्र बनले आहे. जगभरात पाठवल्या जाणाऱ्या अनेक वस्तूंचे उत्पादन चीनमध्ये केले जाते; पण आता स्थिती वेगाने बदलत आहे. कोरोना महामारीनंतर चीनमध्ये अनेक कडक निर्बंध लागू करण्यात आले. त्यामुळे चीनमधून जगाला होत असलेल्या वस्तूंच्या पुरवठ्याला फटका बसला आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात सतत व्यापारी युद्ध सुरू असते. याच स्पर्धेतून चीनने विदेशी कंपन्यांवर अनेक जाचक नियम लागू केले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी चीनवरील अवलंबित्व कमी केले आहे. 

कंपन्या नवा पर्याय शोधत आहेत. या कंपन्यांना भारतासारखे विशाल मार्केट खुणावत आहे. या कंपन्यांना खेचण्यासाठी भारताने मजबूत रणनीती आखली आहे. परदेशी कंपन्यांकडून भारतात दरवर्षाला कमीत कमी १०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली जाईल, या दिशेने पावले उचलण्यास भारताने सुरुवात केली आहे.

‘चायना प्लस वन’ धोरण भारताच्या पथ्यावर  चीनच्या एकूण कार्यपद्धतीमुळे नाराज झालेल्या कंपन्या सध्या इतर चांगल्या बाजाराच्या शोधात आहेत. या कंपन्यांनी सध्या चायना प्लस वन, असे धोरण स्वीकारले आहे. अशा कंपन्यांना आपल्याकडे खेचण्याचे धोरण भारताने अवलंबिले आहे. 

बड्या कंपन्यांनाही सवलतींचा लाभउत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार आंतरराष्ट्रीय कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर सवलती देत आहे. आयफोन बनविणारी ॲपल इंक, तसेच दक्षिण कोरियातील सॅमसंगसारखी कंपनी या सवलतींचा लाभ घेत आहेत. उत्पादनाला चालना मिळाली तरी परदेशी गुंतवणूक मात्र वाढलेली नाही.

वस्तूनिर्मितीत भारताला अपार संधीसिंग म्हणाले की, विकसित देशांमधील महागाई, चढे व्याजदर आणि भूराजकीय संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झालेल्या अडचणी यामुळे जोखमीची स्थिती आहे. इलेक्ट्रिक वाहन, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, तसेच दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या निर्मितीची विलक्षण क्षमता भारताकडे आहे. त्यामुळे परदेशी गुंतवणूक वाढण्यासाठी सरकारकडून नियम आणखी शिथिल केले जाणार आहेत.

वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे सचिव राजेश कुमार सिंह म्हणाले की, देशात येत असलेल्या परकीय गुंतवणुकीत सातत्याने वाढ होत आहे. मार्च २०२३ पर्यंत मागील पाच वर्षांत देशात दरवर्षी सरासरी ७० अब्ज डॉलर्सची परदेशी गुंतवणूक करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात  ही गुंतवणूक १०० अब्ज डॉलर्सच्या जवळपास इतकी होऊ शकते. भारत ही जगात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे. 

टॅग्स :chinaचीनIndiaभारतFDIपरकीय गुंतवणूक