शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
2
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
3
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
4
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
5
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
6
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
7
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
8
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
9
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
10
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
11
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
12
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
13
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
14
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
15
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
16
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
17
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
18
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
19
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
20
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...

UAEला खाद्य पुरवठा करण्यासाठी भारत करणार विशेष शेतांची निर्मिती

By admin | Updated: March 6, 2017 07:37 IST

भारत संयुक्त अरब आमिराती(यूएई)साठी विशेष अशा शेतांची निर्मिती करणार आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 6 - भारत आणि संयुक्त अरब आमिराती(यूएई)चे संबंध दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहेत. ऊर्जा क्षेत्रात सुरक्षेसाठी भारताच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं यूएईनं उचललेल्या पावलाची सकारात्मक पद्धतीनं भारत परतफेड करण्याच्या तयारीत आहे. भारत संयुक्त अरब आमिराती(यूएई)साठी विशेष अशा शेतांची निर्मिती करणार आहे. यासाठी दोन्ही देश एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम करत आहेत. अबूधाबीचे शहजाद्यांनी भारताचा दौरा केल्यानंतर दोन्ही देशांनी हा विचार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2015मध्ये अबूधाबीमध्ये जाऊन यूएईसोबत काही करार केले होते. त्यानुसारच जानेवारी 2017मध्ये हा प्रकल्प करण्यावर दोन्ही देशांचं एकमत झालं आहे.परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव अमर सिन्हा म्हणाले, यूएईशी झालेल्या करारांनुसार भारताचे फार्म टू पोर्ट या प्रकल्पावर काम सुरू आहे. या प्रकल्पाकडे विशेष आर्थिक क्षेत्र म्हणून पाहिलं जाणार आहे. मात्र यात कॉर्परटाइज्ड शेती करणा-यावर भर दिला जाणार आहे. या शेतात यूएईच्या बाजारांवर लक्ष केंद्रित करून शेती करण्यात येणार आहे. तसेच या शेतात पिकवलेला माल लॉजिस्टिक्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून निर्यात करण्यात येणार आहे. दरम्यान, या संकल्पनेला दोन्ही देशांनी स्वीकारलं असून, या विशेष शेतात पिकवण्यात येणा-या अन्नधान्यावर भारताचा खाद्य सुरक्षा कायदा लागू होणार नाही. जर हा प्रकल्प यशस्वी झाला, तर दोन्ही देशांसाठी कृषी उद्योगात एक नवं सेक्टर तयार होईल. तसेच आम्ही आमच्या कौशल्य, भांडवल, तंत्रज्ञानाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील भागीदार कंपन्यांसोबत उत्पादन वाढवण्यासाठी वापर करणार आहोत. उदा. राफेल विमानं दोन्ही देशांनी विकत घेतली आहेत. त्यामुळे त्याचे भाग आणि उपकरण बनवण्यासाठी दोन्ही देश मिळून प्रयत्न करणार आहेत. याचा निर्णय घेण्यासाठी दोन्ही देशांच्या समित्यांची लवकरच बैठक होईल. मात्र दोन्ही देशांमध्ये असलेल्या कठोर निर्बंधांमुळे हे वाटतं तितकं सोपंही नाही, असंही अमर सिन्हा म्हणाले आहेत. तसेच भारत आणि यूएई हे दोन्ही देश सुरक्षेसाठी एकमेकांचं सहकार्य करत राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.