शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

२०२७ मध्ये 'चिनी कम'; भारत चीनला मागे टाकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 12:20 IST

संयुक्त राष्ट्राकडून अहवाल प्रसिद्ध

नवी दिल्ली: येत्या तीन दशकांमध्ये भारत आणि नायजेरियाची लोकसंख्या अतिशय वेगानं वाढणार असल्याचं संयुक्त राष्ट्रानं अहवालात म्हटलं आहे. पुढील तीन दशकांमध्ये भारताची लोकसंख्या २७ कोटी ३० लाखांनी वाढेल. तर याच काळात नायजेरियाच्या लोकसंख्येत २० कोटींची भर पडेल, अशी आकडेवारी संयुक्त राष्ट्राच्या अहवालातून समोर आली आहे. संयुक्त राष्ट्रानं जागतिक लोकसंख्येबद्दल भाष्य करणारा अहवाल प्रकाशित केला आहे. सध्या लोकसंख्येच्या बाबतीत चीन पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र २०२७ मध्ये भारत चीनला मागे टाकून पहिल्या स्थानावर असेल, असं अहवाल सांगतो. पुढील तीन दशकांमध्ये जगाची लोकसंख्यादेखील मोठ्या प्रमाणात वाढलेली असेल, असा अंदाज यातून वर्तवण्यात आला आहे. सध्या जगाची लोकसंख्या ७.७ अब्ज इतकी असून २०५० पर्यंत ती ९.७ अब्जांवर जाऊन पोहोचेल, अशी आकडेवारी संयुक्त राष्ट्राच्या अहवालात आहे. सध्या भारतातील तरुणांची संख्या जास्त आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये भारताची लोकसंख्या वेगानं वाढेल, असं विश्लेषण अहवालात करण्यात आलं आहे. भारत आणि नायजेरियामुळे जगाची लोकसंख्या झपाट्यानं वाढणार असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. भारतातील महिलांनी सरासरी १ किंवा २ मुलांना जन्म दिला तरीही लोकसंख्या वेगानं वाढेल. नायजेरियातील एक महिला सरासरी पाच मुलांना जन्म देते. त्यामुळे नायजेरियाची लोकसंख्या येत्या तीन दशकांमध्ये झपाट्यानं वाढणार असल्याचं संयुक्त राष्ट्राचा अहवाल सांगतो.   

टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारतchinaचीन