शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Corona Vaccination: शर्यत संपता संपेना! 100 कोटी डोसचे लक्ष्य पूर्ण करतोय खरे, पण दुसरा डोस देण्यात खूप मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 21:36 IST

Corona Vaccination 100 crore dose: केंद्राने राज्यांना आजवर 102 कोटी कोरोना लसीचे डोस पुरविले आहेत. यापैकी 10.42 कोटी डोस शिल्लक आहेत. यात बहुतांश डोस हे पहिले आहेत.

पुढील दोन-तीन दिवसांत भारत कोरोना लसीकरणाचा (Corona Vaccination) 100 कोटींचा टप्पा पूर्ण करणार आहे. हा एक मैलाचा दगड आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण कोणत्याच देशाला शक्यही नाही आणि झालेले देखील नाही. यामुळे भारतासाठी ही एक मोठी गोष्ट असणार आहे. परंतू हे करत असताना मोठ्या संख्येने दुसरा डोस न मिळालेले आहेत. यावर केंद्र सरकारला आता लक्ष द्यावे लागणार आहे. 

भारताला लोकसंख्येच्या मानाने जवळपास 180 कोटींच्या आसपास कोरोना लसींची गरज आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सोमवारी राज्यांच्या आणि केंद्र शासित प्रदेशांमधील कोरोना लसीकरणाच्या आकडेवारीचा आढावा घेतला. यामध्ये त्यांनी पहिला डोस बहुतांश जणांना मिळालेला आहे, आता दुसरा डोस देण्याकडे लक्ष केंद्रीत करावे अशा सूचना दिल्या आहेत. 

काही राज्यांनी पहिला आणि दुसरा डोस देण्याचे लक्ष्य साधले आहे. या राज्यांची लोकसंख्या कमी आहे. परंतू अनेक राज्ये अशी आहेत ज्यांनी पहिला डोस देण्याकडे लक्ष दिले आहे. त्यांनी आता दुसरा डोसदेखील या नागरिकांना मिळेल याची तयारी करावी, असे ते म्हणाले. ज्या जिल्ह्यांमध्ये कमी प्रमाणावर लसीकरण झाले आहे त्यावर लक्ष देवून लसीकरण मोहिमेला गती द्यावी. ग्रामीण भागावर जागृती करावी, दुसरा डोस घेण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करावे, असे राजेश भूषण यांनी राज्यांना सूचना केल्या आहेत. 

केंद्राने राज्यांना आजवर 102 कोटी कोरोना लसीचे डोस पुरविले आहेत. यापैकी 10.42 कोटी डोस शिल्लक आहेत. आजवर 99 कोटी डोस देण्यात आले आहेत. १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटाच्या 74 टक्के नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर 30 टक्के लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. यामुळे पहिल्या डोससाठी 25 टक्के लोकसंख्या आणि दुसऱ्या डोससाठी 70 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या वाट पाहत असल्याचे केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या