शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

भारत बनणार अंतराळ महासत्ता! इस्रो आकाशात जगातील तिसरे स्पेस स्टेशन बनवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 23:07 IST

आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन आणि चीननंतर भारत जगातील तिसरे स्पेस स्टेशन बनवणार आहे. विशेष म्हणजे स्वतंत्रपणे असे करणारा भारत हा चीननंतरचा दुसरा देश असेल.

भारताच्या चंद्रयान ३ ने यशस्वी लँडिंग केले. चंद्रयानाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान-3 उतरवून इस्रोने असा इतिहास रचला. आता आपला देश लवकरच अंतराळ महासत्ता म्हणून ओळखला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक आणि चीनच्या तियांगॉंग अंतराळ स्थानकानंतर भारत जगातील तिसरे अंतराळ स्थानक तयार करणार आहे. आयएसएस आणि चीनच्या स्पेस स्टेशनच्या तुलनेत ते अनेक अर्थांनी खास असेल.

वेदांतसोबतचा करार रद्द झाला! आता फॉक्सकॉनला भारतात चिप बनवण्यासाठी नवा भागीदार मिळाला

चंद्रयान-३ मोहिमेनंतर, भारताने आदित्य L1 मिशन लाँच केले आहे, आता भारताच्या सर्वात महत्वाकांक्षी मिशन गगनयानची पाळी आहे जी इस्रोची पहिली मानवीय मोहीम असेल. त्यानंतर लगेचच, भारत स्पेस स्टेशन प्रकल्पावर काम सुरू करणार आहे. यामुळे ते जगातील सर्वोच्च अंतराळ संस्थेच्या यादीत शीर्षस्थानी असेल.

भारताकडून बांधल्या जाणाऱ्या स्पेस स्टेशनचे वजन २० टन असेल, तर आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनचे वजन सुमारे ४५० टन आणि चिनी स्पेस स्टेशनचे वजन सुमारे ८० टन आहे. ४-५ अंतराळवीरांना सामावून घेता येईल अशा पद्धतीने ते तयार करण्याची इस्रोची योजना आहे. पृथ्वीच्या खालच्या कक्षेत ते स्थापित केले जाईल. त्याला LEO म्हणतात जे सुमारे ४०० किलोमीटर दूर आहे.

भारताच्या स्पेस स्टेशनची घोषणा २०१९ मध्ये ISRO चे अध्यक्ष के सिवन यांनी केली होती. गगनयान मोहिमेनंतर भारत २०३० पर्यंत हे स्वप्न पूर्ण करेल, असेही सांगण्यात आले. गगनयान मिशन हा त्याचा पहिला टप्पा आहे. यामध्ये अंतराळवीरांना पृथ्वीपासून ४०० किलोमीटर दूर असलेल्या LEO कक्षेत पाठवले जाईल. गगनयान मोहिमेपर्यंत अंतराळ स्थानक स्थापन करण्याची भारताची योजना आहे. विशेष म्हणजे स्पेस डॉकिंगसारख्या तंत्रज्ञानावर संशोधनासाठी भारत सरकारने अर्थसंकल्पात तरतूद केल्यानंतर या आशेला आणखी बळ मिळाले. हे तंत्रज्ञान अवकाश स्थानकांमध्ये वापरले जाते.

भारताचे अंतराळ स्थानक तयार होण्यापूर्वीच अमेरिका भारतीय अंतराळवीरांना प्रशिक्षण देईल. यासाठी नासा आणि इस्रो यांच्यात करारही झाला आहे. २०२४ मध्ये भारतातील दोन अंतराळवीर देखील आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाऊ शकतात. याआधी त्यांना अमेरिकेतील ह्यूस्टन येथील जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे.

स्पेस स्टेशन हे अंतराळातील एक ठिकाण आहे जिथे शास्त्रज्ञ राहतात आणि विविध प्रकारचे संशोधन करतात. हे स्थानक पृथ्वीच्या कक्षेत सतत फिरत असते.साधारणपणे एका अंतराळवीराला येथे ६ महिने राहावे लागते, त्यानंतर दुसरी टीम पाठवली जाते आणि पहिली टीम परत येते. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर प्रत्येक वेळी किमान ७ अंतराळवीर असतात, कधीकधी त्यांची संख्या वाढते. हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक १५ देशांनी संयुक्तपणे तयार केले आहे. यामध्ये नासा, युरोपियन स्पेस एजन्सी, कॅनेडियन स्पेस एजन्सी, जपानी एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी आणि रशियाची रोसकॉसमॉस हे प्रमुख आहेत. पूर्वी हे २०२४ पर्यंत चालत असे, पण अलीकडे नासाने २०३० पर्यंत वाढवले ​​आहे.

टॅग्स :isroइस्रोChandrayaan-3चंद्रयान-3