शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

भारत आत्मनिर्भर होणार; स्वत:चे ‘झूम’ अ‍ॅप बनविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 07:06 IST

खाजगी क्षेत्रातील बाराहून अधिक कंपन्यांसोबत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) या सरकारी कंपनीलाही भारताचे स्वत:चे झूम नेटवर्क निर्माण करण्यास सांगितले आहे.

हरीश गुप्ता नवी दिल्ली : लॉकडाऊनदरम्यान व्हिडियो कॉन्फरन्सिंगसाठी लोकप्रिय ठरलेल्या चीनच्या ‘झूम नेटवर्क’प्रमाणे भारताचेही स्वत:चे ‘झूम नेटवर्क’ निर्माण करण्याच्या इराद्यातहत केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. सरकारने प्राथमिक निधी देत खाजगी क्षेत्रातील बाराहून अधिक कंपन्यांसोबत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) या सरकारी कंपनीलाही भारताचे स्वत:चे झूम नेटवर्क निर्माण करण्यास सांगितले आहे.झूम ही चीनच्या मालकीची अमेरिकन कंपनी असून तिचे सर्व्हर मात्र चीनमध्ये आहे. राष्टÑीय माहिती केंद्राने (एनआयसी) केंद्र , राज्य सरकार आणि महत्त्वाच्या शासकीय संस्थांना व्हिडियो कॉन्फरन्सिंग नेटवर्क उपलब्ध करून दिले आहे. याची कार्यक्षमता मर्यादित आहे. पंतप्रधान कार्यालय, संरक्षण, केंद्रीय मंत्रालये, मुख्यमंत्री, राज्यपाल आणि आदी महत्त्वाच्या व्यक्तींसाठी सुरक्षित नेटवर्क उपलब्ध करून देण्यासाठी एनआयसीच्या देशभरात ५०० आॅप्टीकल फायबर लाईन्स असल्या तरी एनआयसीचे वार्षिक अंदाजपत्रक फक्त १२०० कोटी रुपयांचेच आहे. दुसरे असे की, एनआयसीचे नेटवर्क एकाचवेळी व्हिडियो कॉन्फरन्सिंगमार्फत ५० ते ६० लोकांना एकमेकांना जोडू शकत नाही. पंतप्रधानांसह महत्त्वाच्या व्यक्तींनी एनआयसीच्या नेटवर्कमार्फत लॉकडाऊनदरम्यान १३३ व्हिडियो कॉन्फरन्स घेतल्या. एकूण ५७०० व्हिडियो कॉन्फरन्स झाल्या आहेत. ७० टक्के कामकाजही या नवीन तंत्रप्रणालीमार्फत केले जात असल्याने भारताचे स्वत:चे झूम नेटवर्क असणे गरजचे वाटले.>एचसीएल, पीपललिंकसह १२ संभाव्य कंपन्याभारताचे व्हिडियो कॉन्फरन्सिंग नेटवर्क विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने एचसीएल टेक्नॉलॉजीस, झोहो कॉर्प, पीपललिंकसह बाराहून अधिक कंपन्यांची यादी तयार केली असून यासाठी २० लाखांचा निधी दिला जाईल.यापैकी अंतिमत: निवड झालेल्या कंपनीला केंद्र, राज्य सरकार आणि शासकीय संस्थांसाठी ही तंत्रप्रणाली स्थापन करण्याचे कंत्राट दिले जाईल. नवीन व्हिडियो कॉन्फरन्सिंग उत्पादन सर्व भारतीय भाषेत आणि भारतातच सांकेतिक कळ उपलब्ध असेल. विदेशी उत्पादनात हे शक्य नाही.एनआयसीचे नेटवर्क वाढती मागणी पूर्ण करण्यास असमर्थ असून भारत-चीन दरम्यानच्या तणावामुळे स्वतंत्र आणि सुरक्षित झूम नेटवर्क तयार करण्यास सांगण्यात आले आहे.