शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

भारताला दिलेल्या धमक्यांनंतर आता चीनची कूटनीती, नेपाळला चुचकारण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2017 11:39 IST

गेल्या अनेक दिवसांपासून भारताला दिलेल्या  युद्धाच्या धमक्यांनी काहीच फरक पडत नसल्याचं पाहिल्यानंतर चीननं आता कूटनीतीचा उपयोग करण्यात सुरुवात केली

नवी दिल्ली, दि. 6 - गेल्या अनेक दिवसांपासून भारताला दिलेल्या  युद्धाच्या धमक्यांनी काहीच फरक पडत नसल्याचं पाहिल्यानंतर चीननं आता कूटनीतीचा उपयोग करण्यात सुरुवात केली आहे. कूटनीतीचा वापर करून भारतावर दबाव वाढवण्यासाठी चीन प्रयत्नशील आहे. त्यासाठी नवी दिल्लीतल्या चिनी उच्चायुक्तांनी नेपाळच्या अधिका-यांकडे या मुद्द्यावर स्वतःची बाजू मांडली आहे. त्यामुळेच चीनची नेपाळसोबत या मुद्द्यावर झालेली चर्चा भारतासाठी खूप महत्त्वाची ठरते.भारतातील एका वादग्रस्त क्षेत्रातून चीन आणि नेपाळ ट्रायजंक्शनच्या माध्यमातून व्यापार करतो. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून भारत नेपाळवर प्रभाव पाडण्यासाठी संघर्ष करतोय. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार चीनच्या अधिका-यानं नेपाळच्या त्यांच्या समकक्ष अधिका-याशी डोकलाम मुद्द्यावर चर्चा केली आहे. भारतासोबत सुरू असलेल्या वादातील चीनची भूमिका त्या अधिका-यानं नेपाळी अधिका-याकडे स्पष्ट केली. चीन आणि नेपाळच्या अशा अधिका-यांची भेट यापूर्वी काठमांडू आणि बीजिंगमध्येही झाली होती. मात्र भारतानं इतर शेजारील देशांना या सर्व प्रकाराची माहिती दिल्याचं अद्याप सार्वजनिक केलं नाही. गेल्या काही दिवसांपूर्वीच या मुद्द्यावर भारताची अमेरिकेशीही चर्चा झाली होती.नेपाळनं आतापर्यंत या प्रकरणावर भारतीय अधिका-यांकडून कोणतीही माहिती मागवली नाही. नेपाळच्या विश्लेषकांच्या मते, भारत, चीन आणि भूतान यांच्या सुरू असलेला वाद त्या देशांसाठी हितकारक नाही.  नेपाळ चीन आणि भारतासोबत दोन ट्रायजंक्शन शेअर करतो. नेपाळच्या पश्चिमेकडच्या लिपुलेखमध्ये एक ट्रायजंक्शन आहेत, दुसरा ट्रायजंक्शन पूर्वेकडच्या जिनसंगमध्ये आहे. गेल्या काही दिवसांपासून नेपाळ लिपुलेख या भूभागावर चिंतेत आहे. कारण हा वादग्रस्त भूभाग कालापानी भागात आहे. ज्यावर भारत आणि नेपाळ या दोघांचाही दावा आहे. 2015मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिपुलेख मार्गे चीनशी व्यापार वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी नेपाळनं जाहीररीत्या नाराजी व्यक्त केली होती. नेपाळच्या संसदेतही या मुद्द्यावरून गदारोळ झाला होता. भारत आणि चीनच्या संयुक्त विधानातून लिपुलेखचा उल्ले काढून टाकावा. कारण हा आंतरराष्ट्रीय नियमांच्या विरोधात आहे, असं नेपाळच्या संसदेत खासदार म्हणाले होते. भारत आणि चीनच्या करारामुळे नेपाळच्या सार्वभौमत्वाला कोणाताही धोका तर नाही ना, याचीही शक्यता वर्तवली होती. यंदा भारत आणि चीनचे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी नेपाळच्या दौ-यावर जाणार आहेत. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज  BIMSTEC बैठकीत सहभागी होण्यासाठी पुढील आठवड्यात जाणार आहे. तर चीनचे उपपंतप्रधानसुद्धा 14 ऑगस्ट रोजी नेपाळचा दौरा करणार आहेत. या बैठकीत सुषमा स्वराज आणि चीनचे उपपंतप्रधान यांच्यात डोकलाम वादावर चर्चा होण्याचीही शक्यता आहेत. भारताचा विरोध असतानाही नेपाळ चीनच्या वन वेल्ट वन रोड (OBOR) या प्रोजेक्टमध्ये आधीच सामील झाला आहे. या दौ-यात नेपाळ आणि चीनची पुढील रणनीतीही ठरू शकते. त्यामुळे या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं आहे.