शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

तिन्ही संरक्षण दलांमध्ये अचूक ताळमेळ साधला जाणार; केंद्र सरकारने नवे नियम लागू केले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 11:12 IST

India vs pakistan, Operation Sindoor: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान ही एक महत्वाची घडामोड मानली जात आहे. आंतर-सेवा संघटना (कमांड, नियंत्रण आणि शिस्त) कायदा २०२३ अंतर्गत तयार केलेले नियम राजपत्र अधिसूचनेद्वारे अधिसूचित करण्यात आले आहेत.

पाकिस्तानसोबत झालेल्या हवाई युद्धामध्ये भारताच्या तिन्ही दलांनी अत्यंत योग्य समन्वय राखत पाकिस्तानचे सर्व हल्ले फोल ठरविले. जमिनीवरून मारा करताना हवेतूनही अचूक मारा करण्यात आला. याचा परिणाम म्हणून भारतासमोर चारच दिवसांत पाकिस्तानने शरणागती पत्करली आणि शस्त्रसंधीची भीक मागू लागला. या पार्श्वभूमीवर तिन्ही दलांमध्ये अधिक ताळमेळ साधण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नियम लागू केले आहेत. 

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान ही एक महत्वाची घडामोड मानली जात आहे. आंतर-सेवा संघटना (कमांड, नियंत्रण आणि शिस्त) कायदा २०२३ अंतर्गत तयार केलेले नियम राजपत्र अधिसूचनेद्वारे अधिसूचित करण्यात आले आहेत. हे नवे नियम २७ मेपासून लागू करण्यात आले आहेत. यामुळे तिन्ही सैन्यांदरम्यान संदेश वहन, युद्धाच्या वेळी एकमेकांच्या चाली समजून घेणे, एकत्रित शत्रूवर वार करणे आदी सोपे होणार आहे. काही वर्षांपूर्वी तिन्ही सैन्य दलांमध्ये समन्वय वाढविण्यासाठी सीडीएस हे पद निर्माण करण्यात आले होते. याचाही फायदा या युद्धात झाला आहे. 

संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी भारतीय सैन्याच्या उत्तर आणि पश्चिमेकडील भागातील युद्ध सज्जतेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी आव्हानात्मक परिस्थितीत एकूण समन्वय आणि वेळेत युद्धाची तयारी आणि युद्ध केल्याबद्दल सैन्याची प्रशंसा केली. 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ७ मेच्या पहाटे पाकिस्तानातील तसेच पीओकेमधील ९ दहशतवादी तळ उध्वस्त करण्यात आले. त्यानंतर पाकिस्तानने भारतीय तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. तो देखील फोल ठरविण्यात आला. या कामी हवाई दल आणि सैन्य दलाने योग्य समन्वय राखत पाकिस्तानवर हल्ले चढविले होते. यामुळे ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले, असे चौहान म्हणाल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndian Armyभारतीय जवानindian navyभारतीय नौदलindian air forceभारतीय हवाई दल