शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
2
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
3
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
4
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
5
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
6
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
7
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
8
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
9
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
10
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
11
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
12
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
13
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
14
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
15
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
17
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
18
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
19
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
20
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!

तिन्ही संरक्षण दलांमध्ये अचूक ताळमेळ साधला जाणार; केंद्र सरकारने नवे नियम लागू केले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 11:12 IST

India vs pakistan, Operation Sindoor: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान ही एक महत्वाची घडामोड मानली जात आहे. आंतर-सेवा संघटना (कमांड, नियंत्रण आणि शिस्त) कायदा २०२३ अंतर्गत तयार केलेले नियम राजपत्र अधिसूचनेद्वारे अधिसूचित करण्यात आले आहेत.

पाकिस्तानसोबत झालेल्या हवाई युद्धामध्ये भारताच्या तिन्ही दलांनी अत्यंत योग्य समन्वय राखत पाकिस्तानचे सर्व हल्ले फोल ठरविले. जमिनीवरून मारा करताना हवेतूनही अचूक मारा करण्यात आला. याचा परिणाम म्हणून भारतासमोर चारच दिवसांत पाकिस्तानने शरणागती पत्करली आणि शस्त्रसंधीची भीक मागू लागला. या पार्श्वभूमीवर तिन्ही दलांमध्ये अधिक ताळमेळ साधण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नियम लागू केले आहेत. 

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान ही एक महत्वाची घडामोड मानली जात आहे. आंतर-सेवा संघटना (कमांड, नियंत्रण आणि शिस्त) कायदा २०२३ अंतर्गत तयार केलेले नियम राजपत्र अधिसूचनेद्वारे अधिसूचित करण्यात आले आहेत. हे नवे नियम २७ मेपासून लागू करण्यात आले आहेत. यामुळे तिन्ही सैन्यांदरम्यान संदेश वहन, युद्धाच्या वेळी एकमेकांच्या चाली समजून घेणे, एकत्रित शत्रूवर वार करणे आदी सोपे होणार आहे. काही वर्षांपूर्वी तिन्ही सैन्य दलांमध्ये समन्वय वाढविण्यासाठी सीडीएस हे पद निर्माण करण्यात आले होते. याचाही फायदा या युद्धात झाला आहे. 

संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी भारतीय सैन्याच्या उत्तर आणि पश्चिमेकडील भागातील युद्ध सज्जतेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी आव्हानात्मक परिस्थितीत एकूण समन्वय आणि वेळेत युद्धाची तयारी आणि युद्ध केल्याबद्दल सैन्याची प्रशंसा केली. 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ७ मेच्या पहाटे पाकिस्तानातील तसेच पीओकेमधील ९ दहशतवादी तळ उध्वस्त करण्यात आले. त्यानंतर पाकिस्तानने भारतीय तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. तो देखील फोल ठरविण्यात आला. या कामी हवाई दल आणि सैन्य दलाने योग्य समन्वय राखत पाकिस्तानवर हल्ले चढविले होते. यामुळे ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले, असे चौहान म्हणाल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndian Armyभारतीय जवानindian navyभारतीय नौदलindian air forceभारतीय हवाई दल