शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीरच्या खोऱ्यात लपलेत 'हायब्रिड दहशतवादी', शोपियानमधून दोघांना अटक, एके-५६ सहित दारुगोळा जप्त!
2
देशातील ४९ जिल्ह्यांत जन्मदरापेक्षा मृत्यूदर अधिक, भारताची लोकसंख्या घटण्याच्या मार्गावर? 
3
'हा राष्ट्रीय विजय, यात सर्वांचे योगदान', ऑपरेशन सिंदूरबाबत एअर चीफ मार्शल यांचे मोठे वक्तव्य
4
उच्चांकी स्तरावरुन ६०० अंकांनी का घसरला सेन्सेक्स, काय आहेत या घसरणीची कारणं?
5
हगवणेंच्या बैलासमोर नृत्य केल्याच्या व्हायरल व्हिडिओवर आता गौतमी पाटीलची प्रतिक्रिया, म्हणाली...
6
Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलकडे मोठा पराक्रम करण्याची संधी, फक्त तीन विकेट्स दूर!
7
प्रेमासाठी काय पण! ग्रॅज्युएट तरुणीने केलं आठवी नापास मुलाशी लग्न; म्हणाली, "माझी मर्जी..."
8
पुणेकरांनो सावध व्हा...! AI थेट पावती फाडणार; मागचा पुढचा विचार सोडा... वाहतूक नियम पाळा...
9
लश्कर ए तोयबानं पाडलं बांगलादेशातील शेख हसीना सरकार?; आता भारताला दिली धमकी
10
वडील म्हणाले पैसे नाहीत, तरीही ज्योती मल्होत्राला मिळाला वकील! कोण मांडणार तिची बाजू? जाणून घ्या
11
Chandrapur Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात आणखी दोन जण ठार, एका महिन्यात ११ जणांचा मृत्यू; ग्रामस्थांमध्ये घबराट
12
Airtel नं आणले ३ नवे रिचार्ज प्लान्स, कमी किंमतीत अनलिमिटेड बेनिफट्स; OTT चाही मोफत लाभ
13
Video - बापरे! रीलच्या नादात ट्रेनच्या दरवाजाला लटकत होती तरुणी, अचानक हात सुटला अन्...
14
Google ने भारतात सुरू केले अधिकृत स्टोअर; Pixel फोन्सवर मिळतोय ₹42000 चा डिस्काउंट
15
एक कांदा ८०० ग्रॅम ते १ किलो वजनाचा! नितीन गडकरींच्या पत्नीने केला अनोखा प्रयोग; भरघोस उत्पादन आले...
16
IPL 2025 Playoffs Rules: पावसामुळे सामना रद्द झाल्यास फायनलला कोणता संघ जाणार? जाणून घ्या नियम
17
"आता गांधीजींचा देशही दुसरा गाल पुढे करणार नाही, तर…’’, शशी थरूर यांनी ठणकावले   
18
MI संघातील 'हा' खेळाडू साकारु शकेल 'बाबूभैय्या', हरभजन सिंगची 'हेरा फेरी'वादावर मजेशीर टिप्पणी
19
'बंटी और बबली' सिनेमासाठी अभिषेक बच्चनला नव्हती पहिली पसंती, या अभिनेत्याची केलेली निवड, पण...
20
सोनं झालं स्वस्त! आज मोठी घसरण, खरेदीची 'सुवर्णसंधी' की अजून वाट पाहाल? नवे दर काय?

तिन्ही संरक्षण दलांमध्ये अचूक ताळमेळ साधला जाणार; केंद्र सरकारने नवे नियम लागू केले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 11:12 IST

India vs pakistan, Operation Sindoor: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान ही एक महत्वाची घडामोड मानली जात आहे. आंतर-सेवा संघटना (कमांड, नियंत्रण आणि शिस्त) कायदा २०२३ अंतर्गत तयार केलेले नियम राजपत्र अधिसूचनेद्वारे अधिसूचित करण्यात आले आहेत.

पाकिस्तानसोबत झालेल्या हवाई युद्धामध्ये भारताच्या तिन्ही दलांनी अत्यंत योग्य समन्वय राखत पाकिस्तानचे सर्व हल्ले फोल ठरविले. जमिनीवरून मारा करताना हवेतूनही अचूक मारा करण्यात आला. याचा परिणाम म्हणून भारतासमोर चारच दिवसांत पाकिस्तानने शरणागती पत्करली आणि शस्त्रसंधीची भीक मागू लागला. या पार्श्वभूमीवर तिन्ही दलांमध्ये अधिक ताळमेळ साधण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नियम लागू केले आहेत. 

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान ही एक महत्वाची घडामोड मानली जात आहे. आंतर-सेवा संघटना (कमांड, नियंत्रण आणि शिस्त) कायदा २०२३ अंतर्गत तयार केलेले नियम राजपत्र अधिसूचनेद्वारे अधिसूचित करण्यात आले आहेत. हे नवे नियम २७ मेपासून लागू करण्यात आले आहेत. यामुळे तिन्ही सैन्यांदरम्यान संदेश वहन, युद्धाच्या वेळी एकमेकांच्या चाली समजून घेणे, एकत्रित शत्रूवर वार करणे आदी सोपे होणार आहे. काही वर्षांपूर्वी तिन्ही सैन्य दलांमध्ये समन्वय वाढविण्यासाठी सीडीएस हे पद निर्माण करण्यात आले होते. याचाही फायदा या युद्धात झाला आहे. 

संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी भारतीय सैन्याच्या उत्तर आणि पश्चिमेकडील भागातील युद्ध सज्जतेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी आव्हानात्मक परिस्थितीत एकूण समन्वय आणि वेळेत युद्धाची तयारी आणि युद्ध केल्याबद्दल सैन्याची प्रशंसा केली. 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ७ मेच्या पहाटे पाकिस्तानातील तसेच पीओकेमधील ९ दहशतवादी तळ उध्वस्त करण्यात आले. त्यानंतर पाकिस्तानने भारतीय तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. तो देखील फोल ठरविण्यात आला. या कामी हवाई दल आणि सैन्य दलाने योग्य समन्वय राखत पाकिस्तानवर हल्ले चढविले होते. यामुळे ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले, असे चौहान म्हणाल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndian Armyभारतीय जवानindian navyभारतीय नौदलindian air forceभारतीय हवाई दल