शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 05:23 IST

या हल्ल्यामागील सूत्रधारांना शिक्षा करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व पर्यायांचा या बैठकीत विचार करण्यात आल्याचे समजते. त्या बैठकीबाबत केंद्र सरकारने अद्याप अधिकृतरीत्या कोणतीही माहिती दिलेली नाही.

हरीश गुप्ता 

नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) ४२ सक्रिय दहशतवादी अड्डे असल्याची कागदपत्रे यंत्रणांनी सादर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांशी विचारविनिमय करत आहेत.

पाकव्याप्त काश्मिरात जे दहशतवादी अड्डे आहेत त्यातील १० उत्तरेकडील व ३२ दक्षिणेकडील भागात आहेत. यात प्रत्येक ठिकाणी १०० ते १३० दहशतवादी आहेत. हे अड्डे नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानी लष्करी चौक्यांजवळ आहेत. तेथून ते भारतात घुसखोरी करतात. दहशतवादी नेटवर्क पीओकेच्या पलीकडे पसरलेले आहे. ज्याचे मुख्यालय मुरीदके (लष्कर), बहावलपूर (जैश) आणि मुझफ्फराबाद (हिजबुल) येथे आहे. गुप्तचर संस्थांनी पाच जणांची ओळख पटवली आहे. ज्यांनी अबू मुसा (लश्कर-ए-तोयबा), इद्रिस शाहीन (हरकत-उल-जिहाद-अल-इस्लामी), मोहम्मद नवाज (लश्कर-ए-तोयबासाठी भरती करणारा), अब्दुल रफा रसूल (हिजबुल) आणि अब्दुल्ला खालिद (लश्कर-ए-तोयबा) या पाच कमांडरांच्या निर्देशानुसार हल्ला घडवून आणला. तपासकर्त्यांचा असा दावा आहे की, या हल्ल्याला पाकिस्तानच्या लष्कराने व आयएसआयने पाठिंबा दिला होता.

कोणतीही कारवाई करण्यास लष्कर सज्ज

कोणतीही कारवाई करण्यास लष्कर सज्ज आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितल्याचे कळते. त्यांनी सोमवारी पंतप्रधानांची भेट घेऊन अर्धा तास चर्चा केली. काश्मीरमधील स्थितीबाबत त्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली.

या हल्ल्यामागील सूत्रधारांना शिक्षा करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व पर्यायांचा या बैठकीत विचार करण्यात आल्याचे समजते. त्या बैठकीबाबत केंद्र सरकारने अद्याप अधिकृतरीत्या कोणतीही माहिती दिलेली नाही.

भारतीय हवाई दलाला दोन मिनिटांच्या आत सज्ज होण्याचे केंद्राचे आदेश

सुरेश एस. डुग्गर

जम्मू : पाकिस्तानी लष्कराने सीमेवर हालचाली वाढवल्याने, भारतीय हवाई दलाला आदेश येताच दोन मिनिटांच्या आत कारवाईसाठी सज्ज होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारत व पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करी सज्जतेच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर अधिक संख्येने तोफा आणण्यात आल्या आहेत.

आणखी दहशतवादी घुसविण्याचा पाकचा कट

पुंछ आणि काश्मीरच्या इतर भागांत पाकिस्तानकडून गोळीबार अद्याप सुरूच आहे. पाकिस्तानने आपल्या सीमावर्ती गावांमधील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले आहे.

गेल्या ४ दिवसांत पाककडून सतत शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन होत आहेत. काश्मीरमध्ये दहशतवादी घुसविण्यासाठी या हालचाली सुरू आहेत असे सूत्रांनी म्हटले आहे.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndian Armyभारतीय जवान