शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

भारत २०५० पर्यंत होणार वृद्धांचा देश; आरोग्य, गृहनिर्माण व निवृत्ती वेतनात करा अधिक गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 05:49 IST

संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या (यूएनएफपीए) भारतातील प्रमुख अँड्रिया वोजनर यांनी शक्यता व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारतातील वृद्धांची लोकसंख्या २०५० पर्यंत दुप्पट होण्याची शक्यता संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या (यूएनएफपीए) भारतातील प्रमुख अँड्रिया वोजनर यांनी व्यक्त केली. विशेषतः एकटे पडणाऱ्या व गरिबीचा सामना करावा लागू शकणाऱ्या वृद्ध महिलांसाठी आरोग्यसेवा, गृहनिर्माण आणि निवृत्ती वेतनात अधिकाधिक गुंतवणूक आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. 

एका मुलाखतीत, वोजनर यांनी शाश्वत विकासाला गती देण्यासाठी भारत प्राधान्य देत असताना प्रमुख लोकसंख्येच्या वाढीची रूपरेषा सांगितली. त्यात तरुण, वृद्ध लोकसंख्या, शहरीकरण, स्थलांतर यांचा समावेश होतो. या प्रत्येकाची राष्ट्रासाठी वेगळी आव्हाने आहेत, तसेच वेगवेगळ्या संधीही पुढे येतात, असे त्या म्हणाल्या.

देशात साठीच्या पुढचे होणार ३४ कोटी : भारतामध्ये १० ते १९ वर्षे वयोगटातील २५.२ कोटी लोकांसह लक्षणीय तरुण लोकसंख्या आहे. ६० आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींची संख्या २०५० पर्यंत दुप्पट होऊन ३४.७ कोटी होण्याचा अंदाज असल्याने आरोग्यसेवा, गृहनिर्माण आणि पेन्शन योजनांमध्ये वाढीव गुंतवणुकीची गरज आहे, असे त्या म्हणाल्या.कुटुंब नियोजन कार्यक्रम राबविणारा पहिला देश असलेल्या भारताने लक्षणीय प्रगती केली आहे, ताज्या आकडेवारीनुसार ९.४ टक्के कुटुंब नियोजनाच्या गरजा पूर्ण होत नाहीत आणि ७.५ टक्के गर्भधारणा अनियोजित आहेत.

'यूएनएफपीए'च्या प्रमुख अँड्रिया वोजनर म्हणतात...स्त्री-पुरुष समानतेला चालना देण्याबरोबरच आरोग्य, शिक्षण, रोजगार प्रशिक्षण आणि रोजगार निर्मितीमध्ये गुंतवणूक केल्याने या लोकसंख्येची क्षमता उघड होऊ शकते आणि देशाला शाश्वत प्रगतीकडे नेले जाऊ शकते.२०५० पर्यंत भारत ५० टक्के शहरी होण्याचा अंदाज असताना, झोपडपट्टी वाढ, वायू प्रदूषण आणि पर्यावरणीय समस्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी स्मार्ट शहरे, मजबूत पायाभूत सुविधा आणि परवडणारी घरे बांधणे महत्त्वाचे.शहरी योजनांमध्ये महिलांच्या सुरक्षितता आणि लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आरोग्यसेवा, शिक्षण आणि नोकऱ्यांचाही विचार केला पाहिजे.

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतनHealthआरोग्य