शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

भारत आर्थिक पुनरुज्जीवनाच्या उंबरठ्यावर - शक्तिकांत दास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2020 08:45 IST

वित्तीय संस्थांकडे वृद्धीला समर्थन देण्यासाठी पुरेसे भांडवल आहे, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. अनेकांनी आधीच भांडवल उभे केले आहे; तर काही नियोजन करीत आहेत. दास यांनी सांगितले की, कोविड-१९ शी लढताना भारताने वित्तीय विस्ताराचे धोरण स्वीकारले.

नवी दिल्ली :भारत आर्थिक पुनरुज्जीवनाच्या उंबरठ्यावर उभा असल्याचे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केले आहे. कोविड-१९ महामारीमुळे बसलेल्या धक्क्यातून अर्थव्यवस्था सावरत असल्याच्या पार्श्वभूमीवर दास यांनी हे वक्तव्य केले आहे.वित्तीय आयोगाचे चेअरमन एन.के. सिंग यांनी लिहिलेल्या ‘पोर्ट्रेट ऑफ पॉवर : हाफ अ सेंच्युरी बीइंग अ‍ॅट रिंगसाईड’ या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी दास यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँक व सरकारकडून समावेशी (अ‍ॅकामॉडेटिव्ह) पतधोरण आणि वित्तीय धोरण स्वीकारण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर आपण आता आर्थिक पुनरुज्जीवन प्रक्रियेच्या ऐन उंबरठ्यावर उभे आहोत.वित्तीय संस्थांकडे वृद्धीला समर्थन देण्यासाठी पुरेसे भांडवल आहे, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. अनेकांनी आधीच भांडवल उभे केले आहे; तर काही नियोजन करीत आहेत. दास यांनी सांगितले की, कोविड-१९ शी लढताना भारताने वित्तीय विस्ताराचे धोरण स्वीकारले. कोविडपश्चात काळात देशाने वाटचाल करावी यासाठी सरकारने वित्तीय नकाशा (रोडमॅप) तयार करावा. या संदर्भात अधिक तपशीलवार माहिती त्यांनी यावेळी दिली. 

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकIndiaभारतEconomyअर्थव्यवस्था