शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

"चीनकडून आपण शिकायला हवं की..."; रोजगाराच्या संधीवर नितीन गडकरींचे स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2024 08:59 IST

रोजगाराच्या मुद्द्यावरुन बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी चीनचा उल्लेख करत आपल्या धोरणांमध्ये बदल करणे आवश्यक असल्याचे म्हटलं आहे.

Minister Nitin Gadkari: रोजगाराची समस्या भारतात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अनेक उच्चशिक्षित तरुणही नोकऱ्या नसल्यामुळे बेरोजगारीच्या समस्येला तोंड देत आहेत. विविध राजकीय पक्ष बेरोजगारी हटवण्याचे आश्वासन देत असले तरी ते पूर्ण होताना दिसत नाही. अशातच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रोजगारासंदर्भात महत्त्वाचे विधान केलं आहे. भारताला विकासाला चालना देण्यासाठी लवचिक आर्थिक धोरणे आणि सामाजिक-आर्थिक मॉडेलची गरज असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं.

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आधीच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रोजगाराबाबत मोठे वक्तव्य केले आहे. आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या नितीन गडकरी यांनी चीनचा उल्लेख करत रोजगाराच्या संधीबाबत भाष्य केले. भारताच्या विकासाला चालना देण्यासाठी लवचिक आर्थिक धोरणे आणि रोजगार निर्मितीला चालना देणारे आणि असमानता कमी करणारे सामाजिक-आर्थिक मॉडेल आवश्यक असल्याचे नितीन गडकरी म्हणाले. एका मराठी पुस्तकाच्या लोकार्पणप्रसंगी नितीन गडकरी बोलत होते.

"चीनमधील परिस्थिती झपाट्याने बदलत आहे आणि कोरोनानंतर अनेक देश त्यांच्याशी व्यवसाय करण्यास फारसे उत्सुक नाहीत. दुसरीकडे शेजारीली देश मंदीसदृश परिस्थितीतून जात असून तिथे अनेक कंपन्या तेथे बंद पडत आहेत. पण आपण चीनकडून एक गोष्ट शिकू शकतो ती म्हणजे समाजवादी, साम्यवादी किंवा भांडवलशाही बनण्याआधी, आपण अशी अर्थव्यवस्था बनली पाहिजे जी रोजगार निर्माण करू शकेल, गरिबी दूर करू शकेल आणि समाजात आर्थिक आणि सामाजिक समानता निर्माण करू शकेल," असे नितीन गडकरी म्हणाले.

यावेळी भाजपचे अध्यक्ष असताना चिनी राष्ट्रपतींसोबत झालेल्या भेटीची आठवण नितीन गडकरींनी सांगितली. "चिनी राष्ट्रपतींनी मला सांगितले होते की चिनी लोक त्यांच्या देशाच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत आणि विचारधारेची पर्वा न करता काहीही करण्यास तयार आहेत," असेही नितीन गडकरी म्हणाले.

"गरिबी दूर करण्यासाठी, भांडवली गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी, निर्यात वाढवण्यासाठी आपल्याला आपल्या आर्थिक धोरणांमध्ये अधिक लवचिकता आणण्याची गरज आहे. आपल्याला कृषी, ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रांवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. ग्रामीण आणि आदिवासी लोकसंख्येतील लोक गरीब राहिल्यास, रोजगाराशिवाय त्यांचे दरडोई उत्पन्न वाढलेच नाही तर आत्मनिर्भर भारत निर्माण होऊ शकत नाही," असेही गडकरींनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीjobनोकरीUnemploymentबेरोजगारीchinaचीन