शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
5
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
6
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
7
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
8
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
9
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
10
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
11
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
12
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
13
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
14
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
15
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
16
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
17
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
20
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल

"चीनकडून आपण शिकायला हवं की..."; रोजगाराच्या संधीवर नितीन गडकरींचे स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2024 08:59 IST

रोजगाराच्या मुद्द्यावरुन बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी चीनचा उल्लेख करत आपल्या धोरणांमध्ये बदल करणे आवश्यक असल्याचे म्हटलं आहे.

Minister Nitin Gadkari: रोजगाराची समस्या भारतात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अनेक उच्चशिक्षित तरुणही नोकऱ्या नसल्यामुळे बेरोजगारीच्या समस्येला तोंड देत आहेत. विविध राजकीय पक्ष बेरोजगारी हटवण्याचे आश्वासन देत असले तरी ते पूर्ण होताना दिसत नाही. अशातच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रोजगारासंदर्भात महत्त्वाचे विधान केलं आहे. भारताला विकासाला चालना देण्यासाठी लवचिक आर्थिक धोरणे आणि सामाजिक-आर्थिक मॉडेलची गरज असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं.

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आधीच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रोजगाराबाबत मोठे वक्तव्य केले आहे. आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या नितीन गडकरी यांनी चीनचा उल्लेख करत रोजगाराच्या संधीबाबत भाष्य केले. भारताच्या विकासाला चालना देण्यासाठी लवचिक आर्थिक धोरणे आणि रोजगार निर्मितीला चालना देणारे आणि असमानता कमी करणारे सामाजिक-आर्थिक मॉडेल आवश्यक असल्याचे नितीन गडकरी म्हणाले. एका मराठी पुस्तकाच्या लोकार्पणप्रसंगी नितीन गडकरी बोलत होते.

"चीनमधील परिस्थिती झपाट्याने बदलत आहे आणि कोरोनानंतर अनेक देश त्यांच्याशी व्यवसाय करण्यास फारसे उत्सुक नाहीत. दुसरीकडे शेजारीली देश मंदीसदृश परिस्थितीतून जात असून तिथे अनेक कंपन्या तेथे बंद पडत आहेत. पण आपण चीनकडून एक गोष्ट शिकू शकतो ती म्हणजे समाजवादी, साम्यवादी किंवा भांडवलशाही बनण्याआधी, आपण अशी अर्थव्यवस्था बनली पाहिजे जी रोजगार निर्माण करू शकेल, गरिबी दूर करू शकेल आणि समाजात आर्थिक आणि सामाजिक समानता निर्माण करू शकेल," असे नितीन गडकरी म्हणाले.

यावेळी भाजपचे अध्यक्ष असताना चिनी राष्ट्रपतींसोबत झालेल्या भेटीची आठवण नितीन गडकरींनी सांगितली. "चिनी राष्ट्रपतींनी मला सांगितले होते की चिनी लोक त्यांच्या देशाच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत आणि विचारधारेची पर्वा न करता काहीही करण्यास तयार आहेत," असेही नितीन गडकरी म्हणाले.

"गरिबी दूर करण्यासाठी, भांडवली गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी, निर्यात वाढवण्यासाठी आपल्याला आपल्या आर्थिक धोरणांमध्ये अधिक लवचिकता आणण्याची गरज आहे. आपल्याला कृषी, ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रांवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. ग्रामीण आणि आदिवासी लोकसंख्येतील लोक गरीब राहिल्यास, रोजगाराशिवाय त्यांचे दरडोई उत्पन्न वाढलेच नाही तर आत्मनिर्भर भारत निर्माण होऊ शकत नाही," असेही गडकरींनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीjobनोकरीUnemploymentबेरोजगारीchinaचीन