शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

एआय क्षेत्रात भारताने स्वयंपूर्ण व्हावे : अदानी, ऊर्जा, कॉम्प्युट अन् क्लाउड या तीन स्तंभांवर भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 11:57 IST

गौतम अदानी यांचे धाकटे चिरंजीव असलेल्या जीत अदानी यांनी भारताच्या ‘बौद्धिक शतका’चा रोडमॅप मांडताना ऊर्जा, कॉम्प्युट आणि क्लाउड या तीन स्तंभांवर भर दिला.

नवी दिल्ली : ‘भारताने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानासाठी इतर देशांच्या आयातीवर अवलंबून न राहता स्वतःच्या भक्कम पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात,’ असे प्रतिपादन अदानी समूहाचे कार्यकारी संचालक जीत अदानी यांनी केले. ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये ते बोलत होते.

गौतम अदानी यांचे धाकटे चिरंजीव असलेल्या जीत अदानी यांनी भारताच्या ‘बौद्धिक शतका’चा रोडमॅप मांडताना ऊर्जा, कॉम्प्युट आणि क्लाउड या तीन स्तंभांवर भर दिला.

एआय क्षेत्रात भारत बनणार जगातील प्रभावशाली देश

‘एआय तंत्रज्ञानाचा वापर व विस्तारात भारताला जगातील अत्यंत प्रभावशाली देश बनण्याची मोठी संधी आहे,’ असे  विप्रोचे कार्यकारी अध्यक्ष रिशद प्रेमजी यांनी म्हटले. आगामी काळात भारत या तंत्रज्ञानाला कशा प्रकारे प्रतिसाद देतो, यावर देशाचे आर्थिक भविष्यच नाही, तर १०० कोटींहून अधिक लोकांच्या समस्या सोडवण्याची आपली क्षमताही अवलंबून असेल, असे ते म्हणाले.

‘एआय’मुळे प्रगतीचा वेग प्रचंड वाढणार : पिचाई

‘एआय’ मानवी प्रगतीचा वेग कैकपटींनी वाढवणारे साधन आहे. येणारा काळ हा ‘एआय’च्या क्रांतीचा असून, याने विज्ञानातील नवे शोध लागतील व भारतासारख्या विकसनशील देशांना प्रगतीची मोठी झेप घेता येईल, असे ‘गुगल’चे सीईओ सुंदर पिचाई यांनी म्हटले.

पिचाई म्हणाले की, आपल्या आयुष्यातील हा सर्वांत मोठा जागतिक बदल आहे. आपण मोठ्या शोधांच्या उंबरठ्यावर उभे आहोत. मात्र, हे यश आपोआप मिळणार नाही. एआय सर्वांसाठी उपयुक्त व्हावी, यासाठी धाडसाने आणि जबाबदारीने काम करावे लागेल.

English
हिंदी सारांश
Web Title : India Should Be Self-Reliant in AI: Adani Focuses on Three Pillars

Web Summary : India should build its own AI infrastructure, says Adani. Experts emphasize AI's transformative potential for India's economic future and solving societal problems. Google's Pichai highlights AI's role in accelerating progress.
टॅग्स :Gautam Adaniगौतम अदानी