शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

हिंदी महासागरातल्या चीनच्या वाढत्या घुसखोरीनं भारताला धोका- नौदल प्रमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 08:03 IST

गेल्या काही दिवसांपासून हिंदी महासागरात चीनची घुसखोरी वाढत चालली आहे.

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून हिंदी महासागरात चीनची घुसखोरी वाढत चालली आहे. त्याच पार्श्वभूमीवर नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंह यांनी चीनबाबत चिंता व्यक्त केली आहे. भारतीय लष्कराला चीनला सडेतोड उत्तर देण्याची गरज आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) इतर विभागांत मोठ्या प्रमाणात नौदलाचं साहित्य पाठवत आहे. त्यावर भारताला नजर ठेवणे आवश्यक आहे. चीनच्या मंत्रालयानं सैन्याच्या विकासासाठी नव्या युगातील चीनची राष्ट्रीय सुरक्षा या मथळ्याखाली एक श्वेतपत्रिका जारी केली आहे. यात वर्ष 2012 ते 2017पर्यंत चीनच्या संरक्षण क्षेत्रातील खर्चात सरासरी 9.42 टक्के वाढ झाल्याचं म्हटलं आहे.आफ्रिकेच्या हॉर्नमधल्या जिबुतीमध्ये ओव्हरसीज बेस स्थापण करणं आणि कराचीमधल्या नौसैनिकांना अत्याधुनिक सुविधा पुरविण्याबरोबरच चीनच्या हिंदी महासागरात होत असलेल्या घुसखोरीला नजरअंदाज करणं भारतासाठी धोकादायक ठरू शकतं. चीननं या हिंदी महासागरालगतच्या क्षेत्रात सहा ते आठ युद्धनौका तैनात केल्या आहेत. त्यामुळे भारतानं सतर्क राहण्याची गरज आहे. आपल्याला चीनच्या हालचालींवर अतिशय काळजीपूर्वक नजर ठेवावी लागणार आहे. चीननं काढलेली फक्त श्वेतपत्रिका नसून ग्लोबल पॉवर बनण्याच्या दिशेनं उचललेलं पाऊल आहे. त्यामुळेच ते नौसेनेला मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा पुरवठा करत आहेत. त्याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन आपल्या बजेटमधून त्याला उत्तर देता येऊ शकतं का हे पाहणं गरजेचं आहे.  

  • नौसेनेला मोठ्या प्रमाणात निधी पुरवणं गरजेचं

नौदलाला सक्षण करण्यासाठी मोठ्या निधीच्या तरतुदीची गरज आहे. यावेळी नौदल प्रमुखांनी इतर आधुनिकीकरण योजनांसह स्वदेशी विमानवाहू युद्धनौकांचीही माहिती दिली. भारतानंसुद्धा 65,000 टन वजनाची युद्धनौका तयार केली आहे. कॅटोबार (सीएटीओबीएआर) ही एक अशी प्रणाली आहे, जिचा वापर एअरक्राफ्ट करियरमधल्या विमानाच्या वापरासंबंधी होतो. सध्या भारताकडे 140 युद्धनौका आणि 220 एअरक्राफ्ट आहेत. परंतु यात निवृत्त होणाऱ्या अनेक युद्धनौका आहेत. नौसेनेजवळ 2030पर्यंत 212 युद्धनौका आणि 458 एअरक्राफ्ट असणं गरजेचं असल्यानं मोठ्या निधीची तरतूद करणं आवश्यक असल्याचंही नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंह म्हणाले आहेत. 

टॅग्स :Defenceसंरक्षण विभाग