शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

भारत सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी सज्ज; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा चीनला खणखणीत इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 06:26 IST

आत्मनिर्भर भारतासाठी चाललेले प्रयत्न यशस्वी होत आहेत. हवामान बदलासंदर्भात झालेल्या पॅरिस कराराची अंमलबजावणी करणाऱ्या आघाडीच्या देशांमध्ये भारतही सामील आहे.

नवी दिल्ली : भारत आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी सदैव सज्ज आहे, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या अभिभाषणात शुक्रवारी सांगितले. चीनने सीमेवर केलेल्या कुरापतींमुळे त्या देशासोबत भारताचे संबंध तणावाचे बनले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी चीनला इशारा दिला आहे.

ते म्हणाले की, चीनने पूर्व लडाखमध्ये केलेला घुसखोरीचा प्रयत्न रोखण्यासाठी भारतीय लष्कराच्या २० जवानांनी बलिदान दिले. चीनलगतच्या सीमेवर भारताने स्वत:च्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी अतिरिक्त फौजही तैनात केली आहे. कोरोनाने मरण पावलेले माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी व सहा खासदारांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले की, कोरोना साथ नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने वेळीच योग्य उपाययोजना केल्याने असंख्य लोकांचे प्राण वाचले आहेत. जगातील  सर्वांत मोठी लसीकरण मोहीम भारतात राबविली जात असल्याचा प्रत्येक नागरिकाला सार्थ अभिमान आहे. कोरोनाकाळात देशातील ८० कोटी गरीब लोकांना आठ महिने पुरेल इतके मोफत अन्नधान्य केंद्र सरकारने दिले आहे. आत्मनिर्भर भारतासाठी चाललेले प्रयत्न यशस्वी होत आहेत. हवामान बदलासंदर्भात झालेल्या पॅरिस कराराची अंमलबजावणी करणाऱ्या आघाडीच्या देशांमध्ये भारतही सामील आहे.

३७० कलम रद्द केल्याने काश्मिरी जनतेला फायदाराष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले की, ३७० कलम रद्द केल्याच्या निर्णयाचे जम्मू-काश्मीरच्या जनतेने स्वागत केले आहे. हे कलम हटविल्याने जम्मू-काश्मीरमधील लोकांना अधिक अधिकार मिळाले आहेत. आता हा केंद्रशासित प्रदेश नक्कीच मोठी प्रगती करू शकेल.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदchinaचीनindia china faceoffभारत-चीन तणाव