शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
6
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
7
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
8
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
9
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
10
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
11
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
12
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
13
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
14
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
15
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
16
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
17
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
18
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
19
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
20
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी

भारत सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी सज्ज; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा चीनला खणखणीत इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 06:26 IST

आत्मनिर्भर भारतासाठी चाललेले प्रयत्न यशस्वी होत आहेत. हवामान बदलासंदर्भात झालेल्या पॅरिस कराराची अंमलबजावणी करणाऱ्या आघाडीच्या देशांमध्ये भारतही सामील आहे.

नवी दिल्ली : भारत आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी सदैव सज्ज आहे, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या अभिभाषणात शुक्रवारी सांगितले. चीनने सीमेवर केलेल्या कुरापतींमुळे त्या देशासोबत भारताचे संबंध तणावाचे बनले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी चीनला इशारा दिला आहे.

ते म्हणाले की, चीनने पूर्व लडाखमध्ये केलेला घुसखोरीचा प्रयत्न रोखण्यासाठी भारतीय लष्कराच्या २० जवानांनी बलिदान दिले. चीनलगतच्या सीमेवर भारताने स्वत:च्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी अतिरिक्त फौजही तैनात केली आहे. कोरोनाने मरण पावलेले माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी व सहा खासदारांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले की, कोरोना साथ नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने वेळीच योग्य उपाययोजना केल्याने असंख्य लोकांचे प्राण वाचले आहेत. जगातील  सर्वांत मोठी लसीकरण मोहीम भारतात राबविली जात असल्याचा प्रत्येक नागरिकाला सार्थ अभिमान आहे. कोरोनाकाळात देशातील ८० कोटी गरीब लोकांना आठ महिने पुरेल इतके मोफत अन्नधान्य केंद्र सरकारने दिले आहे. आत्मनिर्भर भारतासाठी चाललेले प्रयत्न यशस्वी होत आहेत. हवामान बदलासंदर्भात झालेल्या पॅरिस कराराची अंमलबजावणी करणाऱ्या आघाडीच्या देशांमध्ये भारतही सामील आहे.

३७० कलम रद्द केल्याने काश्मिरी जनतेला फायदाराष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले की, ३७० कलम रद्द केल्याच्या निर्णयाचे जम्मू-काश्मीरच्या जनतेने स्वागत केले आहे. हे कलम हटविल्याने जम्मू-काश्मीरमधील लोकांना अधिक अधिकार मिळाले आहेत. आता हा केंद्रशासित प्रदेश नक्कीच मोठी प्रगती करू शकेल.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदchinaचीनindia china faceoffभारत-चीन तणाव