शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

भारत सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी सज्ज; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा चीनला खणखणीत इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 06:26 IST

आत्मनिर्भर भारतासाठी चाललेले प्रयत्न यशस्वी होत आहेत. हवामान बदलासंदर्भात झालेल्या पॅरिस कराराची अंमलबजावणी करणाऱ्या आघाडीच्या देशांमध्ये भारतही सामील आहे.

नवी दिल्ली : भारत आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी सदैव सज्ज आहे, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या अभिभाषणात शुक्रवारी सांगितले. चीनने सीमेवर केलेल्या कुरापतींमुळे त्या देशासोबत भारताचे संबंध तणावाचे बनले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी चीनला इशारा दिला आहे.

ते म्हणाले की, चीनने पूर्व लडाखमध्ये केलेला घुसखोरीचा प्रयत्न रोखण्यासाठी भारतीय लष्कराच्या २० जवानांनी बलिदान दिले. चीनलगतच्या सीमेवर भारताने स्वत:च्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी अतिरिक्त फौजही तैनात केली आहे. कोरोनाने मरण पावलेले माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी व सहा खासदारांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले की, कोरोना साथ नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने वेळीच योग्य उपाययोजना केल्याने असंख्य लोकांचे प्राण वाचले आहेत. जगातील  सर्वांत मोठी लसीकरण मोहीम भारतात राबविली जात असल्याचा प्रत्येक नागरिकाला सार्थ अभिमान आहे. कोरोनाकाळात देशातील ८० कोटी गरीब लोकांना आठ महिने पुरेल इतके मोफत अन्नधान्य केंद्र सरकारने दिले आहे. आत्मनिर्भर भारतासाठी चाललेले प्रयत्न यशस्वी होत आहेत. हवामान बदलासंदर्भात झालेल्या पॅरिस कराराची अंमलबजावणी करणाऱ्या आघाडीच्या देशांमध्ये भारतही सामील आहे.

३७० कलम रद्द केल्याने काश्मिरी जनतेला फायदाराष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले की, ३७० कलम रद्द केल्याच्या निर्णयाचे जम्मू-काश्मीरच्या जनतेने स्वागत केले आहे. हे कलम हटविल्याने जम्मू-काश्मीरमधील लोकांना अधिक अधिकार मिळाले आहेत. आता हा केंद्रशासित प्रदेश नक्कीच मोठी प्रगती करू शकेल.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदchinaचीनindia china faceoffभारत-चीन तणाव