शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 10:03 IST

India Pakistan War : भारतीय लष्काराने 'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केले.

India Pakistan War ( Marathi News ) : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला करुन बदला घेतला, या हल्ल्यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या हल्ल्यात मुरीदके येथील दहशवाद्यांचाही खात्मा झाला. येथील दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला पाकिस्तानी लष्करही उपस्थित असल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. 

हल्ल्यानंतर, मुरीदके येथे मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण हाफिज अब्दुल रौफ याने केले, त्याला दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. हे फोटो समोर आल्यानंतर, पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांनी तो स्थानिक धर्मगुरू असल्याचे सांगत या प्रकरणापासून हात झटकले. मात्र, आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओतून पाकिस्तानी लष्कर खोटे बोलत असल्याचे उघड झाले आहे.

...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार

पत्रकार तल्हा सिद्दीकी यांनी अब्दुल रौफचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या पोस्ट त्यांनी एक कॅप्शन दिली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले की, 'आपल्या शिष्याच्या अंत्यसंस्काराचे नेतृत्व करणारे हाफिज अब्दुल रौफ काश्मीरमधील दहशतवादाचे गौरव करत आहे", हा व्हिडीओ पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीगच्या सोशल मीडिया पेजवर  शेअर केला. पाकिस्तानी सैन्य अजूनही रौफला स्थानिक धर्मगुरू म्हणेल का? , असा सवाल उपस्थित होत आहे. 

व्हिडीओमध्ये काय आहे?

अब्दुल रौफ याच्या  शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तो मुस्लिमांना एकत्र येण्याचे आवाहन करत आहेत. मुस्लिमांना उद्देशून तो म्हणत आहे की, 'आम्ही पाहिले आहे की अमेरिका किती शक्तिशाली आहे. आपण रशियन योद्ध्यांना अफगाणिस्तानातून पळून जाताना देखील पाहिले आहे. १९६५ मध्ये भारताची वाईट अवस्था आपण पाहिली आहे. काश्मीरमध्ये आपल्या दोन मुजाहिदीनना दोन हजार लोकांशी लढताना पाहिले आहे. आमच्या सैनिकांनी श्रीनगरमधील लष्कराच्या मुख्यालयावरही हल्ला केला आहे.'

भारतासह जगातील अनेक देश दहशतवाद रोखण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणत आहेत, पण पाकिस्तान आपल्या भूमीवर कोणत्याही दहशतवादी कारवाया होत असल्याचे नाकारत आहे. मात्र, पहलगाम हल्ल्यानंतर या प्रकरणात पाकिस्तानचा पर्दाफाश झाला आहे. अब्दुल रौफ सारख्या दहशतवाद्यांना पाकिस्तानात सन्मानित केल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतIndian Armyभारतीय जवान