शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 06:27 IST

राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर झालेल्या विशेष चर्चेत एस. जयशंकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून कोणतीही चर्चा झालेली नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली :ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानसोबत शस्त्रसंधी घडवून आणण्यासाठी कोणत्याही तिसऱ्या देशाने हस्तक्षेप केला नाही. ही लष्करी कारवाई स्थगित करण्याचा व व्यापारी संबंधांच्या मुद्द्याचा काहीही संबंध नव्हता, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत बुधवारी स्पष्टपणे सांगितले. भारत व पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी घडवून आणण्यात अमेरिकेचा महत्त्वाचा सहभाग होता हा त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक वेळा केलेला दावा अशा रीतीने केंद्र सरकारने खोडून काढला आहे. 

राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर झालेल्या विशेष चर्चेत एस. जयशंकर म्हणाले की, २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तसेच १६ जूनदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी व ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून कोणतीही चर्चा झालेली नाही. 

‘ट्रम्प यांना खोटे ठरविल्यास ते सत्य उघड करतील ही केंद्राला भीती’

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प खोटे बोलत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजूनही स्पष्टपणे सांगितलेले नाही. कारण त्यांनी तसे म्हटले तर ट्रम्प खरे काय घडले ते उघडपणे सांगतील, अशी भीती केंद्र सरकारला वाटते, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ट्रम्प खोटे बोलत आहेत असे मोदी यांनी म्हटलेले नाही. ते असे का करत आहेत याचे कारण सर्वांनाच माहीत आहे. टॅरिफमध्ये दबाव आणण्यासाठी ट्रम्प अशी वक्तव्ये करत आहेत. 

हल्ल्याने अनेक महिलांचे सिंदूर पुसले गेले, पण…

पहलगाम हल्ल्यामध्ये अनेक महिला विधवा झाल्या. त्यांचे सिंदूर पुसले गेले. तरीही पाकवर केलेल्या कारवाईला केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूर असे नाव का दिले असा सवाल समाजवादी पक्षाच्या खासदार व अभिनेत्री जया बच्चन यांनी राज्यसभेत बुधवारी विचारला. ऑपरेशन सिंदूरवर या सभागृहात सुरू असलेल्या विशेष चर्चेत त्यांनी हे वक्तव्य केले.

महाराष्ट्रातील खासदार…

डॉ. मेधा कुलकर्णी (भाजप ) : जवानांनी पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला. मात्र, विरोधक त्यांच्या पराक्रमावर प्रश्न उपस्थित करीत आहेत. 

संजय राऊत (उद्धवसेना) : 'ऑपरेशन सिंदूर'ची कारवाई थांबविण्याच्या बदल्यात पाकच्या तुरूंगात बंद कुलभूषण जाधव यांची सुटका करून घ्यायला हवी होती.

फौजिया खान (श.प. गट) : सरकारकडे हल्ला होण्याची गुप्त सूचना होती. यानंतरही हल्ला झाला. 

अशोक चव्हाण (भाजप) : विरोधकांना सैन्याच्या जवानांवर विश्वास नाही. विरोधक नेमका कोणता संदेश जगाला देण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

 

टॅग्स :Monsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनRajya Sabhaराज्यसभाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाS. Jaishankarएस. जयशंकरParliamentसंसद