शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 06:27 IST

राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर झालेल्या विशेष चर्चेत एस. जयशंकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून कोणतीही चर्चा झालेली नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली :ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानसोबत शस्त्रसंधी घडवून आणण्यासाठी कोणत्याही तिसऱ्या देशाने हस्तक्षेप केला नाही. ही लष्करी कारवाई स्थगित करण्याचा व व्यापारी संबंधांच्या मुद्द्याचा काहीही संबंध नव्हता, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत बुधवारी स्पष्टपणे सांगितले. भारत व पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी घडवून आणण्यात अमेरिकेचा महत्त्वाचा सहभाग होता हा त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक वेळा केलेला दावा अशा रीतीने केंद्र सरकारने खोडून काढला आहे. 

राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर झालेल्या विशेष चर्चेत एस. जयशंकर म्हणाले की, २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तसेच १६ जूनदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी व ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून कोणतीही चर्चा झालेली नाही. 

‘ट्रम्प यांना खोटे ठरविल्यास ते सत्य उघड करतील ही केंद्राला भीती’

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प खोटे बोलत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजूनही स्पष्टपणे सांगितलेले नाही. कारण त्यांनी तसे म्हटले तर ट्रम्प खरे काय घडले ते उघडपणे सांगतील, अशी भीती केंद्र सरकारला वाटते, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ट्रम्प खोटे बोलत आहेत असे मोदी यांनी म्हटलेले नाही. ते असे का करत आहेत याचे कारण सर्वांनाच माहीत आहे. टॅरिफमध्ये दबाव आणण्यासाठी ट्रम्प अशी वक्तव्ये करत आहेत. 

हल्ल्याने अनेक महिलांचे सिंदूर पुसले गेले, पण…

पहलगाम हल्ल्यामध्ये अनेक महिला विधवा झाल्या. त्यांचे सिंदूर पुसले गेले. तरीही पाकवर केलेल्या कारवाईला केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूर असे नाव का दिले असा सवाल समाजवादी पक्षाच्या खासदार व अभिनेत्री जया बच्चन यांनी राज्यसभेत बुधवारी विचारला. ऑपरेशन सिंदूरवर या सभागृहात सुरू असलेल्या विशेष चर्चेत त्यांनी हे वक्तव्य केले.

महाराष्ट्रातील खासदार…

डॉ. मेधा कुलकर्णी (भाजप ) : जवानांनी पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला. मात्र, विरोधक त्यांच्या पराक्रमावर प्रश्न उपस्थित करीत आहेत. 

संजय राऊत (उद्धवसेना) : 'ऑपरेशन सिंदूर'ची कारवाई थांबविण्याच्या बदल्यात पाकच्या तुरूंगात बंद कुलभूषण जाधव यांची सुटका करून घ्यायला हवी होती.

फौजिया खान (श.प. गट) : सरकारकडे हल्ला होण्याची गुप्त सूचना होती. यानंतरही हल्ला झाला. 

अशोक चव्हाण (भाजप) : विरोधकांना सैन्याच्या जवानांवर विश्वास नाही. विरोधक नेमका कोणता संदेश जगाला देण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

 

टॅग्स :Monsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनRajya Sabhaराज्यसभाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाS. Jaishankarएस. जयशंकरParliamentसंसद