शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

अखेर भारत-पाक युद्ध ठरलं? पाकिस्तानी मंत्र्याने टीव्ही मुलाखतीत सांगितला दिवस  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 16:00 IST

पाकिस्तानी लष्कराकडे जी हत्यारे आहेत ती फक्त दाखविण्यासाठी नाही तर त्याचा वापर करण्यासाठी आहे असा इशारा शेख रशीद यांनी भारताला दिला. 

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तान बिथरलेला आहे. त्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांचे मंत्री यांच्यात भारताला पोकळ धमक्या देण्यासाठी चढाओढ लागल्याचं पाहायला मिळालं आहे. इम्रान खान यांनी भारताला अण्वस्त्र युद्धाची धमकी दिल्यानंतर पाकिस्तानचे मंत्री शेख रशीद यांनी पुन्हा एकदा युद्धाची भविष्यवाणी केली आहे. यावेळी त्यांनी युद्धाची तारीखही सांगितली आहे. 

पाकिस्तानच्या एका न्यूज चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तीन मंत्री शेख रशीद यांनी सांगितले की, ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या महिन्यात भारत-पाकिस्तान यांच्या युद्ध होण्याची शक्यता आहे. त्यासाठी जनतेला सतर्क करण्यासाठी मी याठिकाणी आलो आहे. पाकिस्तानी लष्कराकडे जी हत्यारे आहेत ती फक्त दाखविण्यासाठी नाही तर त्याचा वापर करण्यासाठी आहे असा इशारा शेख रशीद यांनी भारताला दिला. 

संयुक्त राष्ट्र संघात पुन्हा एकदा पाकिस्तान काश्मीरचा मुद्दा उचलणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आम्ही पुन्हा एकदा पाकिस्तान व्याप्त काश्मीरचा दौरा करणार असून शेवटच्या श्वासापर्यंत पाकिस्तान काश्मीरसाठी लढत राहणार असल्याचा दावा शेख रशीद यांनी केला. 

काही दिवसांपूर्वी शेख रशीद यांच्यावर लंडनमध्ये हल्ला झाला होता. त्यांच्या अंडे फेकण्यात आले होते. रशीद शेखने भारत-पाकिस्तान यांच्यात अण्वस्त्र युद्ध होईल असं भाष्य केलं होतं. यानंतर जेव्हा ते लंडन येथे गेले होते तेव्हा लोकांनी त्यांना मारहाण करत त्यांच्या अंडे फेकले होते. शेख रशीद नेहमी अशा वक्तव्यांनी चर्चेत येतात. दोन दिवसांपूर्वी त्यांनी विधान केलं होतं की, जर भारताने पाकव्याप्त काश्मीरवर हल्ला केला तर भारतीय उपखंडातील ते सर्वात मोठं युद्ध असेल आणि त्यामुळे याचा पूर्ण नकाशा बदलेल असा इशारा दिला होता. 

अशातच आज शेख रशीद यांनी सांगितल्यानुसार पाकिस्तानने राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा हवाला देत पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्र संघात काश्मीर मुद्दा उचलला आहे. काश्मीरमधील लोकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र यावरून राहुल गांधी यांनी ट्विट करत पाकिस्तानला फटकारले आहे. काश्मीर हा भारताचा अंतर्गत मामला आहे. पाकिस्तान अथवा कोणत्याही इतर देशांनी काश्मीर प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा काहीही संबंध नाही, काश्मीरात जो काही हिंसाचार सुरू आहे त्याच्यामागे पाकिस्तानच आहे असं राहुल गांधींनी सांगितले आहे.   

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान