शहरं
Join us  
Trending Stories
1
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
2
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
3
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
4
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
5
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
6
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
7
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
8
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
9
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
10
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
11
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
12
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
13
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
14
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
15
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
16
भोजपुरी स्टार पवन सिंहची पत्नी ज्योती यांनी भरला नामांकन अर्ज, कुठल्या पक्षाकडून लढणार?
17
EDला सापडले २५० पासपोर्ट, ७ पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू, बंगाल कनेक्शन समोर   
18
"गेल्या १० वर्षात साबणाला हातही लावला नाही"; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं 'बाथरूम सीक्रेट'
19
१५ वर्षांनी लहान पुतण्यावर जडला २ मुलांच्या आईचा जीव; नकार देताच पोलिसांसमोर भयंकर कृत्य
20
दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या

Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 16:58 IST

India Pakistan Conflict:पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच दोन्ही देशांकडून एकमेकांवर विविध हत्यारांद्वारे हल्ले केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Act of War: गेल्या काही वर्षांपासून  सातत्याने होत असलेल्या दहशतवादी कारवाया हे आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी गंभीर आव्हान ठरले आहे. हल्लीच २२ एप्रिल २०२५ रोजी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे हल्ला करून २६ पर्यटकांची हत्या केली होती. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच दोन्ही देशांकडून एकमेकांवर विविध हत्यारांद्वारे हल्ले केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

यापुढे भारताच्या भूमीवरही कुठलाही दहशतवादी हल्ला हे भारताविरोधातील युद्धाची कारवाई मानली जाईल, तसेच त्याला त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले जाईल, अशी माहिती केंद्र सरकारमधील वरिष्ठ सुत्रांनी दिली आहे.

गेल्या महिन्यात पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यंटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधी दहशतवादी तळांवर हल्ले करत पाकिस्तानला जबर दणका दिला होता. तेव्हापासून आतापर्यंत दोन्ही देशांकडून एकमेकांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून हल्ले केले जात आहेत. त्यात भारताच्या सक्त कारवाईमुळे बिथरलेला पाकिस्तान भारतातील नागरी वस्त्यांनाही लक्ष्य करत आहे. तर भारताने मात्र पाकिस्तानमधील हवाई तळ, दहशतवाद्यांचे अड्डे आणि लष्करी केंद्रांना लक्ष्य केले आहे.  

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार