शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

भारताने चीनला खडसावले; काश्मीरप्रकरणी लुडबूड करू नका; तुम्हीच आमचा प्रदेश बळकावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 04:03 IST

जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे व त्याची प्रशासकीय फेररचना करणे हा पूर्णपणे भारताचा अंतर्गत विषय आहे.

नवी दिल्ली/ बीजिंग : जम्मू-काश्मीर राज्याचे दोन केेंद्रशासित प्रदेशांमध्ये केलेले विभाजन ‘बेकायदा’व ‘अवैध’ आहे व हे करीत असताना भारताने आमचा प्रदेश त्यात समाविष्ट केला आहे, या चीनच्या वक्तव्यास भारताने गुरुवारी जोरदार प्रत्युत्तर दिले. हा आमचा पूर्णपणे अंतर्गत विषय असल्याने चीनने त्यात लुडबूड करू नये, अशी स्पष्ट समजही भारताने चीनला दिली.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी बीजिंगमध्ये केलेल्या वक्तव्यास प्रत्युत्र देताना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले की, उलट जम्मू-कामीर व लडाखमधील बराच मोठा प्रदेश चीननेच बळकावला आहे. एवढेच नव्हे तर सन १९६३ मध्ये पाकिस्तानशी केलेल्या सीमा कराराच्या नावाखाली चीनने पाकव्याप्त काश्मीरमधील मोठा भागही पाकिस्तानकडून स्वत:च्या ताब्यात घेतला आहे.

रवीश कुमार असेही म्हणाले की, जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे व त्याची प्रशासकीय फेररचना करणे हा पूर्णपणे भारताचा अंतर्गत विषय आहे. त्यामुळे आम्हाला सांगण्याऐवजी चीनने भारताच्या प्रादेशिक सार्वभौमत्वाचा स्वत: आदर करावा. भारत इतर देशांच्या अंतर्गत बाबींवर भाष्य करत नाही. तसेच इतरांनीही भारताच्या अंतर्गत विषयात नाक खुपसू नये, अशी अपेक्षाआहे. काय म्हणाले होते गेंग शुआंग?भारताच्या निर्णयास ‘बेकायदा व अवैध’ असे संबोधताना गेंग शुआंग म्हणाले होते की, भारताने जम्मू-काश्मीर व लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांत चीनचाही काही प्रदेश समाविष्ट करून तो आपल्या प्रशासनाखाली घेतला आहे. चीन याचा धिक्कार व तीव्र विरोध करतो.  भारताने आपल्या अंतर्गत कायद्यात बदल करण्याच्या व प्रशासकीय निर्णय घेण्याच्या नावाखाली चीनच्या सार्वभौमत्वावर आघात केला आहे. ते असेही म्हणाले की, भारताची ही कृती बेकायदा व अवैध असल्याने ती आमच्या दृष्टीने एरवीही बंधनकारक नसल्याने आमचा प्रदेश अजूनही चीनच्याच प्रत्यक्ष नियंत्रणाखाली असण्याची वस्तुस्थिती कायम आहे. भारताने चीनच्या क्षेत्रीय सार्वभौमत्वाचा आदर करावा, दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारांचे पालन करावे आणि सीमाभागांमध्ये शांतता व सौहार्द कायम ठेवून सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करावी, असे गेंग यांनी आवाहन केले.

टॅग्स :Indiaभारतchinaचीन