शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शरद पवार यांच्या निवासस्थानी उद्या बैठक, इंडिया आघाडीच्या जागावाटपाबाबत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 12:32 IST

INDIA Opposition Alliance: जागावाटपाबाबत १३ सप्टेंबर रोजी शरद पवार यांच्या निवासस्थानी समन्वय समितीची बैठक होणार आहे. मुंबईतील तिसऱ्या बैठकीनंतर आता इंडिया आघाडीचे खरे आव्हान सुरू झाले आहे. 

- आदेश रावल नवी दिल्ली - जागावाटपाबाबत १३ सप्टेंबर रोजी शरद पवार यांच्या निवासस्थानी समन्वय समितीची बैठक होणार आहे. मुंबईतील तिसऱ्या बैठकीनंतर आता इंडिया आघाडीचे खरे आव्हान सुरू झाले आहे. 

राज्यांतील जागा वाटपाचा फॉर्म्युला आघाडीतील पक्षांना ठरवायचा आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये १८-२० जागा हव्या आहेत. त्यावर अखिलेश यादव तयार नाहीत, तर दुसरीकडे चंद्रशेखर रावण यांनाही निवडणूक लढवायची आहे.  चंद्रशेखर यांना नगीना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे. परंतु, समाजवादी पक्ष त्यांना त्यांच्या कोट्यातून जागा देऊ इच्छित नाही. याशिवाय जयंत चौधरी यांच्या जागांच्या संख्येबाबतही अंतिम निर्णय होणार आहे.  

बिहारमध्ये काँग्रेसला लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार यांच्याकडून दहा जागा हव्या आहेत, तर आरजेडी आणि जेडीयू काँग्रेसला सहा जागा देण्यास तयार आहेत. त्याचवेळी आम आदमी पक्षाच्या वाढत्या महत्त्वाकांक्षाही आघाडीसाठी अडचणी निर्माण करत आहेत. दिल्ली आणि पंजाबमध्ये दोन्ही पक्षांचे राज्यातील नेते एकमेकांच्या विरोधात आहेत. 

विविध राज्यातील सर्वपक्षीय आव्हानेआम आदमी पार्टीला दिल्ली - पंजाबच्या बदल्यात गुजरात आणि हरयाणामध्ये जागा हव्या आहेत. हा निर्णय कठीण असेल, तर महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसला अधिक जागा हव्या आहेत. महाराष्ट्रात तीन पक्षांची आघाडी असताना काँग्रेस हा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि डावे कोणत्याही परिस्थितीत सोबत येण्यास तयार नाहीत. प. बंगालमध्ये मार्ग शोधणे, हे आघाडीसमोरचे मोठे आव्हान असेल. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी