शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

'...तर स्वत:च्या रक्षणासाठी भारत आपली ताकद दाखविण्यात मागे हटणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 08:22 IST

भारताचा इतिहास पाहिला तर आजपर्यंत भारताने कोणावर हल्ला केला नाही,

नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव पाहता केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. देशाच्या रक्षणासाठी भारत आपली ताकद दाखविण्यासाठी मागे हटणार नाही. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. अनेकदा पाकिस्तानने काश्मीर मुद्द्यावरून भारतासोबत युद्ध लढण्याची भाषादेखील केली आहे. 

संरक्षण मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, भारताचा इतिहास पाहिला तर आजपर्यंत भारताने कोणावर हल्ला केला नाही, यापुढेही करणार नाही. मात्र याचा हा अर्थ नाही की, भारत आपल्या रक्षणासाठी स्वत:ची ताकद दाखविण्यास कमी पडेल. सोलमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या पत्रकार परिषदेत दक्षिण कोरियाचे वरिष्ठ सैन्याचे अधिकारीही उपस्थित होते. 

यावेळी राजनाथ सिंह यांनी दहशतवाद आणि दहशतवादी यांना खतपाणी देणाऱ्यांविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर सामुहिक कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे. दहशतवाद्यांचे समर्थन आणि दहशतवाद्यांना फंडिंग करणाऱ्यांविरोधात ठोस कारवाई केली पाहिजे. सध्या संपूर्ण जग अनेक आव्हानांना तोंड देत आहे. या आव्हानांमध्ये सर्वात गंभीर समस्या दहशतवादाची आहे. 

जगातील कोणताही देश दहशतवादापासून सुरक्षित नाही. भारत, यूएन आणि अन्य माध्यमातून दहशतवादाची लढण्याचा द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक स्तरावर सहाय्य करेल. जागतिक रणनीतीमध्ये उद्भवलेल्या समस्येचा उल्लेख करत जगात शांती आणि सुरक्षा यांच्यासमोरील आव्हानं वाढत आहे असंही राजनाथ सिंह यांनी सांगितले. 

याआधी काश्मीर हा नेहमी भारताचा भाग राहिलेले आहे. काश्मीर पाकिस्तानचा भाग होतेच कधी? पाकिस्तानचा काश्मीरवर काहीही हक्क नाही, असे राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला ठणकावले होते. तसेच ज्याच्यासाठी तुम्ही नेहमी रडगाणे गात असता. पाकिस्तानचा काश्मीरवर काहीही हक्क नाही.'' पाकिस्तानने त्यांच्या ताब्यातील काश्मीरमध्ये होत असलेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाकडे लक्ष द्यावे. यापुढे काश्मीरबाबत चर्चा झाली तर ती केवळ पाकिस्तानने बळकावलेल्या काश्मीरबाबतच होईल. तसेच पीओकेच नाही तर गिलगिट-बाल्टिस्थान हासुद्धा भारताचाच भाग आहे असंही त्यांनी सांगितले होते. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान