शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

'...तर स्वत:च्या रक्षणासाठी भारत आपली ताकद दाखविण्यात मागे हटणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 08:22 IST

भारताचा इतिहास पाहिला तर आजपर्यंत भारताने कोणावर हल्ला केला नाही,

नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव पाहता केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. देशाच्या रक्षणासाठी भारत आपली ताकद दाखविण्यासाठी मागे हटणार नाही. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. अनेकदा पाकिस्तानने काश्मीर मुद्द्यावरून भारतासोबत युद्ध लढण्याची भाषादेखील केली आहे. 

संरक्षण मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, भारताचा इतिहास पाहिला तर आजपर्यंत भारताने कोणावर हल्ला केला नाही, यापुढेही करणार नाही. मात्र याचा हा अर्थ नाही की, भारत आपल्या रक्षणासाठी स्वत:ची ताकद दाखविण्यास कमी पडेल. सोलमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या पत्रकार परिषदेत दक्षिण कोरियाचे वरिष्ठ सैन्याचे अधिकारीही उपस्थित होते. 

यावेळी राजनाथ सिंह यांनी दहशतवाद आणि दहशतवादी यांना खतपाणी देणाऱ्यांविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर सामुहिक कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे. दहशतवाद्यांचे समर्थन आणि दहशतवाद्यांना फंडिंग करणाऱ्यांविरोधात ठोस कारवाई केली पाहिजे. सध्या संपूर्ण जग अनेक आव्हानांना तोंड देत आहे. या आव्हानांमध्ये सर्वात गंभीर समस्या दहशतवादाची आहे. 

जगातील कोणताही देश दहशतवादापासून सुरक्षित नाही. भारत, यूएन आणि अन्य माध्यमातून दहशतवादाची लढण्याचा द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक स्तरावर सहाय्य करेल. जागतिक रणनीतीमध्ये उद्भवलेल्या समस्येचा उल्लेख करत जगात शांती आणि सुरक्षा यांच्यासमोरील आव्हानं वाढत आहे असंही राजनाथ सिंह यांनी सांगितले. 

याआधी काश्मीर हा नेहमी भारताचा भाग राहिलेले आहे. काश्मीर पाकिस्तानचा भाग होतेच कधी? पाकिस्तानचा काश्मीरवर काहीही हक्क नाही, असे राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला ठणकावले होते. तसेच ज्याच्यासाठी तुम्ही नेहमी रडगाणे गात असता. पाकिस्तानचा काश्मीरवर काहीही हक्क नाही.'' पाकिस्तानने त्यांच्या ताब्यातील काश्मीरमध्ये होत असलेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाकडे लक्ष द्यावे. यापुढे काश्मीरबाबत चर्चा झाली तर ती केवळ पाकिस्तानने बळकावलेल्या काश्मीरबाबतच होईल. तसेच पीओकेच नाही तर गिलगिट-बाल्टिस्थान हासुद्धा भारताचाच भाग आहे असंही त्यांनी सांगितले होते. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान