शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

'...तर स्वत:च्या रक्षणासाठी भारत आपली ताकद दाखविण्यात मागे हटणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 08:22 IST

भारताचा इतिहास पाहिला तर आजपर्यंत भारताने कोणावर हल्ला केला नाही,

नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव पाहता केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. देशाच्या रक्षणासाठी भारत आपली ताकद दाखविण्यासाठी मागे हटणार नाही. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. अनेकदा पाकिस्तानने काश्मीर मुद्द्यावरून भारतासोबत युद्ध लढण्याची भाषादेखील केली आहे. 

संरक्षण मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, भारताचा इतिहास पाहिला तर आजपर्यंत भारताने कोणावर हल्ला केला नाही, यापुढेही करणार नाही. मात्र याचा हा अर्थ नाही की, भारत आपल्या रक्षणासाठी स्वत:ची ताकद दाखविण्यास कमी पडेल. सोलमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या पत्रकार परिषदेत दक्षिण कोरियाचे वरिष्ठ सैन्याचे अधिकारीही उपस्थित होते. 

यावेळी राजनाथ सिंह यांनी दहशतवाद आणि दहशतवादी यांना खतपाणी देणाऱ्यांविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर सामुहिक कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे. दहशतवाद्यांचे समर्थन आणि दहशतवाद्यांना फंडिंग करणाऱ्यांविरोधात ठोस कारवाई केली पाहिजे. सध्या संपूर्ण जग अनेक आव्हानांना तोंड देत आहे. या आव्हानांमध्ये सर्वात गंभीर समस्या दहशतवादाची आहे. 

जगातील कोणताही देश दहशतवादापासून सुरक्षित नाही. भारत, यूएन आणि अन्य माध्यमातून दहशतवादाची लढण्याचा द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक स्तरावर सहाय्य करेल. जागतिक रणनीतीमध्ये उद्भवलेल्या समस्येचा उल्लेख करत जगात शांती आणि सुरक्षा यांच्यासमोरील आव्हानं वाढत आहे असंही राजनाथ सिंह यांनी सांगितले. 

याआधी काश्मीर हा नेहमी भारताचा भाग राहिलेले आहे. काश्मीर पाकिस्तानचा भाग होतेच कधी? पाकिस्तानचा काश्मीरवर काहीही हक्क नाही, असे राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला ठणकावले होते. तसेच ज्याच्यासाठी तुम्ही नेहमी रडगाणे गात असता. पाकिस्तानचा काश्मीरवर काहीही हक्क नाही.'' पाकिस्तानने त्यांच्या ताब्यातील काश्मीरमध्ये होत असलेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाकडे लक्ष द्यावे. यापुढे काश्मीरबाबत चर्चा झाली तर ती केवळ पाकिस्तानने बळकावलेल्या काश्मीरबाबतच होईल. तसेच पीओकेच नाही तर गिलगिट-बाल्टिस्थान हासुद्धा भारताचाच भाग आहे असंही त्यांनी सांगितले होते. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान