शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

मानव विकास निर्देशांकात भारत एका पायरीने वर; संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 01:42 IST

१८९ देशांत भारत १२९ व्या स्थानावर

नवी दिल्ली : भारत २०१९ वर्षामध्ये मानव विकास निर्देशांकात (एचडीआय) १८९ देशांत एक पायरी वर चढून १२९ व्या स्थानी आला आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या विकास कार्यक्रमाच्या (यूएनडीपी) सोमवारी जाहीर झालेल्या अहवालात म्हटले आहे.

गेल्यावर्षी भारताचे हे निर्देशांक मूल्य ०.६४७ होते व त्यामुळे भारत १३० व्या स्थानी होता. २००५-२००६ ते २०१५-२०१६ या कालावधीत भारतात दारिद्र्यातून २७.१ कोटी लोकांना वर काढण्यात आले, असे यूएनडीपीच्या भारताच्या निवासी प्रतिनिधी शोको नोदा यांनी हा अहवाल (बियोंड इन्कम, बियोंड अ‍ॅव्हरेजेस, बियोंड टुडे : इनइक्वालिटिज इन ह्यूमन डेव्हलपमेंट इन द टष्ट्वेन्टिफर्स्ट सेंच्युरी) प्रकाशित करताना म्हटले.

या कालावधीत संपूर्ण दारिद्र्यात नाट्यमय घट झाली, त्याचसोबत जीवनमान, शिक्षण वाढले आणि आरोग्यसेवा उपलब्ध झाली. या निर्देशांकानुसार मानव विकासाच्या प्रगतीत इतर कोणत्याही प्रांताचा असा अनुभव नाही, असे त्या म्हणाल्या.१९९० ते २०१८ या कालावधीत दक्षिण आशियाची वेगाने (४६ टक्के) वाढ झाली. त्यानंतर पूर्व आशिया आणि पॅसिफिकची ४३ टक्क्यांनी वाढ झाली.

तीन दशकांपासून वेगाने विकास

भारताने विकासासाठी आर्थिक समावेशन (प्रधानमंत्री जन धन योजना), सर्वांसाठी आरोग्य सेवा (आयुष्मान भारत) आदींत घेतलेला पुढाकार हा कोणीही मागे राहू नये आणि पंतप्रधानांचा सर्वांसाठी विकास हा दृष्टिकोन साकारण्याचे जे आश्वासन दिले गेले होते ते पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचे होते, असे शोको नोदा म्हणाल्या. त्यांनी म्हटले की, भारताची सतत सुरू असलेली प्रगती ही जवळपास तीन दशकांच्या वेगाने झालेल्या विकासामुळे आहे.

टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारत