शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

मानव विकास निर्देशांकात भारत एका पायरीने वर; संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 01:42 IST

१८९ देशांत भारत १२९ व्या स्थानावर

नवी दिल्ली : भारत २०१९ वर्षामध्ये मानव विकास निर्देशांकात (एचडीआय) १८९ देशांत एक पायरी वर चढून १२९ व्या स्थानी आला आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या विकास कार्यक्रमाच्या (यूएनडीपी) सोमवारी जाहीर झालेल्या अहवालात म्हटले आहे.

गेल्यावर्षी भारताचे हे निर्देशांक मूल्य ०.६४७ होते व त्यामुळे भारत १३० व्या स्थानी होता. २००५-२००६ ते २०१५-२०१६ या कालावधीत भारतात दारिद्र्यातून २७.१ कोटी लोकांना वर काढण्यात आले, असे यूएनडीपीच्या भारताच्या निवासी प्रतिनिधी शोको नोदा यांनी हा अहवाल (बियोंड इन्कम, बियोंड अ‍ॅव्हरेजेस, बियोंड टुडे : इनइक्वालिटिज इन ह्यूमन डेव्हलपमेंट इन द टष्ट्वेन्टिफर्स्ट सेंच्युरी) प्रकाशित करताना म्हटले.

या कालावधीत संपूर्ण दारिद्र्यात नाट्यमय घट झाली, त्याचसोबत जीवनमान, शिक्षण वाढले आणि आरोग्यसेवा उपलब्ध झाली. या निर्देशांकानुसार मानव विकासाच्या प्रगतीत इतर कोणत्याही प्रांताचा असा अनुभव नाही, असे त्या म्हणाल्या.१९९० ते २०१८ या कालावधीत दक्षिण आशियाची वेगाने (४६ टक्के) वाढ झाली. त्यानंतर पूर्व आशिया आणि पॅसिफिकची ४३ टक्क्यांनी वाढ झाली.

तीन दशकांपासून वेगाने विकास

भारताने विकासासाठी आर्थिक समावेशन (प्रधानमंत्री जन धन योजना), सर्वांसाठी आरोग्य सेवा (आयुष्मान भारत) आदींत घेतलेला पुढाकार हा कोणीही मागे राहू नये आणि पंतप्रधानांचा सर्वांसाठी विकास हा दृष्टिकोन साकारण्याचे जे आश्वासन दिले गेले होते ते पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचे होते, असे शोको नोदा म्हणाल्या. त्यांनी म्हटले की, भारताची सतत सुरू असलेली प्रगती ही जवळपास तीन दशकांच्या वेगाने झालेल्या विकासामुळे आहे.

टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारत