शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

भारताने दरवर्षी एका 'शिकागो'ची निर्मिती करण्याची गरज- हरदीप पुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 13:23 IST

भारतात सध्या वेगाने शहरीकरण होत आहे. 2030 पर्यंत भारतातील 40 टक्के लोकसंख्या शहरात राहात असेल.

न्यू यॉर्क- भारतामध्ये शहरीकरणाचा वेग अत्यंत जास्त असून दिवसेंदिवस हा वेग वाढतच आहे. 2030 साली भारतातील 40 टक्के लोकसंख्या शहरामध्ये स्थायिक झालेली असेल. त्यामुळे 2030 पर्यंत भारताला दरवर्षी एका शिकागो शहराएवढ्या शहराची निर्मिती करावी लागेल असे मत केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी व्यक्त केले.

शाश्वत विकास या विषयावर हाय लेवल पॉलिटिकल फोरमने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी आरले मत व्यक्त केले. हरदीप पुरी गृहनिर्माण व शहरविकास खात्याचे राज्यमंत्री आहेत. शहरीकरणाबाबत बोलताना ते पुढे म्हणाले, भारतातील 60 कोटी लोक 2030 पर्यंत शहरांमध्ये राहायला लागतील. त्याचा अंदाज घेऊन भारताला आतापासूनच 2030 पर्यंत प्रत्येकवर्षी 70 कोटी ते 40 कोटी चौरस मीटर आकाराची अर्बन स्पेस म्हणजे शहरीकरणासाठी भूमी तयार ठेवावी लागेल. दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचे झाल्यास भारताला 2030 पर्यंत शहरीकरणाची गरज पूर्ण करण्यासाठी एका शिकागो शहराची निर्मिती करावी लागेल. या कार्यक्रमात संयुक्त राष्ट्राचे अधिकारी, नागरिक, नगर नियोजनकार आणि इतर अनेक अधिकारी उपस्थित होते.

2030 साली आवश्यकता भासेल अशा शहरांसाठी 70 टक्के पायाभूत व्यवस्थांची निर्मिती भारताने करणे गरजेचे आहे. संयुक्त राष्ट्राने जगभरातील विकासासाठी 2030 हे लक्ष्य ठेवले आहे. जर भारताला आपले लक्ष्य साध्य करण्यात यश आले तर संयुक्त राष्ट्राचे लक्ष्य साध्य होईल असे मत पुरी यांनी व्यक्त केले. जगभरामध्ये विकसनशील देशांमध्ये शहरीकरण वेगाने होत आहे. 2018-2050 या काळामध्ये भारत, नायजेरिया आणि चीन या देशांचा जागतिक शहरीकरणाच्या वृद्धीतील 35 टक्के वाटा असेल. 

टॅग्स :Indiaभारत