शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

भारताने दरवर्षी एका 'शिकागो'ची निर्मिती करण्याची गरज- हरदीप पुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 13:23 IST

भारतात सध्या वेगाने शहरीकरण होत आहे. 2030 पर्यंत भारतातील 40 टक्के लोकसंख्या शहरात राहात असेल.

न्यू यॉर्क- भारतामध्ये शहरीकरणाचा वेग अत्यंत जास्त असून दिवसेंदिवस हा वेग वाढतच आहे. 2030 साली भारतातील 40 टक्के लोकसंख्या शहरामध्ये स्थायिक झालेली असेल. त्यामुळे 2030 पर्यंत भारताला दरवर्षी एका शिकागो शहराएवढ्या शहराची निर्मिती करावी लागेल असे मत केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी व्यक्त केले.

शाश्वत विकास या विषयावर हाय लेवल पॉलिटिकल फोरमने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी आरले मत व्यक्त केले. हरदीप पुरी गृहनिर्माण व शहरविकास खात्याचे राज्यमंत्री आहेत. शहरीकरणाबाबत बोलताना ते पुढे म्हणाले, भारतातील 60 कोटी लोक 2030 पर्यंत शहरांमध्ये राहायला लागतील. त्याचा अंदाज घेऊन भारताला आतापासूनच 2030 पर्यंत प्रत्येकवर्षी 70 कोटी ते 40 कोटी चौरस मीटर आकाराची अर्बन स्पेस म्हणजे शहरीकरणासाठी भूमी तयार ठेवावी लागेल. दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचे झाल्यास भारताला 2030 पर्यंत शहरीकरणाची गरज पूर्ण करण्यासाठी एका शिकागो शहराची निर्मिती करावी लागेल. या कार्यक्रमात संयुक्त राष्ट्राचे अधिकारी, नागरिक, नगर नियोजनकार आणि इतर अनेक अधिकारी उपस्थित होते.

2030 साली आवश्यकता भासेल अशा शहरांसाठी 70 टक्के पायाभूत व्यवस्थांची निर्मिती भारताने करणे गरजेचे आहे. संयुक्त राष्ट्राने जगभरातील विकासासाठी 2030 हे लक्ष्य ठेवले आहे. जर भारताला आपले लक्ष्य साध्य करण्यात यश आले तर संयुक्त राष्ट्राचे लक्ष्य साध्य होईल असे मत पुरी यांनी व्यक्त केले. जगभरामध्ये विकसनशील देशांमध्ये शहरीकरण वेगाने होत आहे. 2018-2050 या काळामध्ये भारत, नायजेरिया आणि चीन या देशांचा जागतिक शहरीकरणाच्या वृद्धीतील 35 टक्के वाटा असेल. 

टॅग्स :Indiaभारत