शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
3
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
4
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
5
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
7
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
8
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
9
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
10
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
11
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
12
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
13
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
14
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
15
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
16
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
17
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
18
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
19
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
20
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा

भारताने दरवर्षी एका 'शिकागो'ची निर्मिती करण्याची गरज- हरदीप पुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 13:23 IST

भारतात सध्या वेगाने शहरीकरण होत आहे. 2030 पर्यंत भारतातील 40 टक्के लोकसंख्या शहरात राहात असेल.

न्यू यॉर्क- भारतामध्ये शहरीकरणाचा वेग अत्यंत जास्त असून दिवसेंदिवस हा वेग वाढतच आहे. 2030 साली भारतातील 40 टक्के लोकसंख्या शहरामध्ये स्थायिक झालेली असेल. त्यामुळे 2030 पर्यंत भारताला दरवर्षी एका शिकागो शहराएवढ्या शहराची निर्मिती करावी लागेल असे मत केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी व्यक्त केले.

शाश्वत विकास या विषयावर हाय लेवल पॉलिटिकल फोरमने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी आरले मत व्यक्त केले. हरदीप पुरी गृहनिर्माण व शहरविकास खात्याचे राज्यमंत्री आहेत. शहरीकरणाबाबत बोलताना ते पुढे म्हणाले, भारतातील 60 कोटी लोक 2030 पर्यंत शहरांमध्ये राहायला लागतील. त्याचा अंदाज घेऊन भारताला आतापासूनच 2030 पर्यंत प्रत्येकवर्षी 70 कोटी ते 40 कोटी चौरस मीटर आकाराची अर्बन स्पेस म्हणजे शहरीकरणासाठी भूमी तयार ठेवावी लागेल. दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचे झाल्यास भारताला 2030 पर्यंत शहरीकरणाची गरज पूर्ण करण्यासाठी एका शिकागो शहराची निर्मिती करावी लागेल. या कार्यक्रमात संयुक्त राष्ट्राचे अधिकारी, नागरिक, नगर नियोजनकार आणि इतर अनेक अधिकारी उपस्थित होते.

2030 साली आवश्यकता भासेल अशा शहरांसाठी 70 टक्के पायाभूत व्यवस्थांची निर्मिती भारताने करणे गरजेचे आहे. संयुक्त राष्ट्राने जगभरातील विकासासाठी 2030 हे लक्ष्य ठेवले आहे. जर भारताला आपले लक्ष्य साध्य करण्यात यश आले तर संयुक्त राष्ट्राचे लक्ष्य साध्य होईल असे मत पुरी यांनी व्यक्त केले. जगभरामध्ये विकसनशील देशांमध्ये शहरीकरण वेगाने होत आहे. 2018-2050 या काळामध्ये भारत, नायजेरिया आणि चीन या देशांचा जागतिक शहरीकरणाच्या वृद्धीतील 35 टक्के वाटा असेल. 

टॅग्स :Indiaभारत